पपई लागवड

पपई ही फळझाड आहे. फळझाड असले तरी हंगामी आहे. म्हणजे त्याचे वय दीड –दोन वर्ष असते. तसेच जगवली तर ती उंच उंच होत तीचे फळे लहान लहान होत जातात. या झाडांची मुळे ही दुधाळ असतात. वड पिपंळासारखी आक्रमक नसतात. तसेच आंबे व नारळासारखी पसारा वाढवणारी नसतात. त्याचे खोड हे मऊ असल्यामुळे त्यास कधीही काढून टाकणेही सोपे असते. पण शक्यतो पपई उपयोगाची नसली तरी त्यास आपणहून कधीही काढू नये. कारण तिच्या दुधाळ गुणधर्मामुळे जमानीतील विशिष्ट घटक विलगीकरणास मदत करतात. व ती इतर झाडांना पोषकतेस मदत करतात. बरेचदा नर पपई असल्यास लोक त्यास निरुपयोगी समजून ती काढून टाकतात. पण तसे करू नये कारण नर पपई मुळे मादी पपईच्या फुंलासोबत परागीभवन झाल्यातरच पपया येतात म्हणजे आपल्याकडे नर पपई असल्यास परिसरातल्या पपईस फळे येतात नर पपईस प्रत्येक पानाच्या देठाजवळ फुलांचा गुच्छ येतो तर मादी पपई ही एकच कळी येते.

घराच्या, बंगल्याच्या, शाळेच्या, आवारात किंबहूना गच्चीवरसुध्दा नऊ इंच वाफेच्या उंचीत ही झाडे जगवू शकतात. त्यास फळेही मिळतात. पपईच्या फळांतून मिळणारे जिवनसत्व ही डोळ्यांसाठी फार महत्वाची असतात. कमी श्रमात व कमी देखभाल केल्यास आपल्याला भरपूर पपया मिळतात.

बाजारातून आणलेल्या पपईमधे भरपूर बिया असल्यास त्या बियापांसून पपईची लागवड केल्यास त्यास हमखास पपया येतात. तर ज्या पपई मधे कमी बियाणं असतं. त्यापासून पपयांच्या झाडांन पपया येणे जर अवघड असते.

तर अशा भरपूर आलेल्या बिया.. सावलीत वाळवाव्यात. त्यानंतर त्याची रोपे तयार करावीत.  त्यास पूर्नलागवड करता येते. किंवा बिया फेकून जागेवरच उगललेली पपईला पण पपया येतात.

पपईला आजार होतात. उदाः पपईची पाने ही आखडतात. किंवा चिरल्यासारखी होतात. पपईच्या झाडाला पांढरा मावा हा जास्त लागतो. याची कारणे म्हणजे पपईच्या मुळांना अधिक पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे हे आजार होतात. पपईचे झाडं हे तीन चार महिण्याचे होईपर्यंत अगदी कमी पाणी द्यावे. त्याचा बुंधा हा मनगटाएवढा जाड झाला की त्यास पाणी देणे बंद करावे. नैसर्गिक पाण्यापासून तसे फार आजार होत नाही. बरेचदा ईमारतीचे डेब्रिजची भर टाकलेल्या जागेवर पपई वाढत नाही. वाढली तरी तिला पाण्याचा संसर्ग होऊन झाड संपून जाते.

पपईच्या झाडांना दूरवर पाणी द्यावे. जिवामृताचा वापर केल्यास पपया हा पाच पाच किलोच्या होतात.

नैसर्गिक पध्दतीने वाढवलेली पपईच्या पानांचा रस हा शरिरातील पांढर्या पेशी वाढीसाठी सेवन केला जातो.पपईला पाण्याचा निचरा होणारी मुरमाड जमीन चालते. तसेच काळी जमीन पण चालते पण पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते.

लेख ःवाचा उंच पपईच्या पपई काढण्याची सोपी पधद्त..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.