जाळीच्या कुंपनावर लागवड करता येणारी वेलवर्गीय वनस्पतींची यादी…


घराला, बंगल्याला शेताला आपण तारेचे अर्थात जाळीचे कुंपन केलेले असल्यास तुमचे अभिनंदन, कारण जाळीचे कुंपन हे पर्यावरणपुरक आहे. अशा कुंपनाला एक तर आपण प्रायव्हसीसाठी ग्रीन नेट लावू शकता. किंव त्यासाठी वेलवर्गीय वनस्पतीची लागवड करू शकता.

वेलवर्गीय वनस्पती लागवडीचे फायदे पहिल्यांदा पाहूया..

हवा खेळती राहते. कमीत कमी जागा लागते. कुपनांच्या दोनही बाजूला कुंपनाला खेटून बाग फुलवता येते. तसेच नारळ आंब्याची झाडे लागवड करू शकता. तसेच याभोवती बाग फुलवल्यास आपल्याला नैसर्गिक गारवा अर्थात तापमान नियंत्रीत करता येते.

अशा जाळीच्या कुंपनावर नेहमी ऊन येत असल्यास त्या ठिकाणी कोणकोणत्या वेलवर्गीय वनस्पतींची लागवड करता येते. ते पाहूया..

  • पॅशन फ्रूट २) गोकर्ण ३) कृष्णकमल ४) मधूमालती ५) तोंडली ६) बदक वेल ७) गारवेल ८) गुळवेल ९) बोगनवेल १०) रातरानी ११) संक्रातवेल १२) जाई जूई १३) मॉर्नींग ग्लोरी १४) मायाळू १५) विड्याचे पान १६) हंगामी वेलः वाल, कारले, दुधी, चवळी, दोडके, गिलके. १७) रानजाई १८) वेली गुलाब १९) मनीप्लॅंट २०) कर्टन क्रीपर

वरील वनस्पतींचे चार प्रकारात वर्गीकरण करता येईल..

  • औषधी वनस्पतीः गुळवेल.
  • फुलांचे वेलः गोकर्ण, संक्रात वेल, मॉर्निंग ग्लोरी, बदक वेल,
  • सुंगधी फुलांचे वेलः गावठी गुलाब, मधूमालती, रानजाई, जाई जुई, रातरानी,
  • फळभाज्यांची वेलः सर्व प्रकारची फळभाज्या देणांरी वेल, तोंडली, तसेच मायाळू, विड्याची पाने.
  • शोभेचे वेलः गारवेल, कर्टन क्रीपर्स, मनीप्लांट,

बरेचदा मंडळी जाळीचे कुपनांवर वेल लावला तर ते सडून जाईल असा दावा करतात. ते काही अंशी खरेही आहे. पण वाळलेल्या फांद्या, काड्या वेळेवर स्वच्छ केल्या तर तेथे पाणी साचत नाही. त्यामुळे गंजण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच जाळीच्या सडण्यापेक्षा त्यापासून मिळणारा स्वच्छ प्राणवायू, डोळ्यांना सुखवणारी हिरवळ, पक्षांना मिळणारा आसरा तसेच त्यापासून मिळणारे पशू पक्षी व मानवासाठी मिळणारे अन्न हे अधिक सुखदायक आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

वरील वेलवर्गीयांची अधिक माहिती याच संकेतस्थळावर नावानिशी शोधा..

पाण्याचे लाड कमी करा…

दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका.


less watering to Garden…

बरेचदा आपली बाग ही आपण लेकरांसारखी वाढवत असतो. कारण लहान बाळं ही जेवढा आपल्याला निर्व्याज आनंद देतात तेवढाच आनंद आपल्या बागेतील झाडे, पाने, फुले, फळे देत असतात.

रोजचा नेम म्हणून आपण झाडांना पाणी देतो. पण हे अति पाणी हेच झाडांसाठी घातक ठरते. जसे अति लाडामुळे मुलं बिघडतात. तशीच अति पाण्यामुळे झाडांचे आरोग्य बिघडते. झाडांच्या या पाण्याच्या मानसशास्त्राला समजून घेणे फार गरजेचे आहे. कारण पाणी हे माध्यम असे आहे की ते झाडांवर परिणाम तर करतेच पण मातीचे आरोग्य ही घडवण्यात मदत करत असते.

Advertisements

कुंडीतील झाडांना मिलीबग येणे, पाने कर्ली होणे (मुरडा, बोकड्या रोग) येणे, अकाली झाडं कोमेजून जाणे, हे अतिपाण्यामुळेच होतात. तर कधी कधी अति पाण्यामुळे झाडांना योग्य मोसमात फुले, फळे न लागणे हे सुध्दा घडते.

पाण्यात नत्राचे प्रमाण अधिक असते. पाण्याव्दारे नत्र हे अधिक झाडांच्या पानांमधे साचलं की त्यांच्या अन्न वाहून नेणार्या नसात नत्र साठते. (Saturate) होते. तेथे पुढील प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्या गाठी, अडथळा काढून टाकण्यासाठी मिलीबग, पिठ्या ढेकून येतात. जर यांची वाणवा असल्यास तेथे पाने मुरडतात. पाने आकसली गेली की त्यांची अन्न प्रक्रिया होत नाही. मग पुढे झाड आजारांना बळी पडते.

पाण्याचा योग्य ताण दिल्यास झाडांमधे असुरक्षतेची भावना तयार होते अशा वेळेस ते साहजिकच त्यांचा वंश वाढण्यासाठी फळांची उत्पत्ती करतात. त्यामुळे झाडांना आठवड्यातून एकदा पाणी देवू नये. जसे आपण आपली पचनसंस्था स्वच्छ व जोमाने कार्यरत व्हावी यासाठी उपवास पकडतो त्याप्रमाणे झाडांना अर्थात बागेला पाण्याचा उपवास घडवावा.

अधिक पाण्यामुळे कुंडीतील माती नेहमी ओली राहते. त्यामुळे तेथे विषाणूंची वाढ होते. खरंतर वर्षातून एकदा माती संपूर्णतः वाळवून घेणे फार गरजेचे असते. म्हणून तर आपले पूर्वज हे उन्हाळयात शेती नांगरून ठेवत असे. तसेच वर्षा दोन वर्षातून एकदा कुंडी रिपॉटींग करणे अर्थात माती बदलवणे (म्हणजे नवीन नाही पण आदला बदल करणे) गरजचे असते.

पाण्याच्या अति वापरामुळे कुंडीत अथवा मातीतील अन्न घटकांचे विषमतेने विभाजन होते. त्यातून निर्माण होणारे वायू अर्थात वाफसा पध्दतीतील गंध हा विपरीत पणे अन्न पुरवठा करत असतो. जसे की आपल्याला करपट ढेकर येणे हे अन्न व पाण्याचे विषम प्रमाण झाले की होते त्या प्रमाणे झाडांनाही होते. आपण जड आहार घेतला ( पुरणपोळी, रव्याचे लाडू, मासांहार) व त्यावर पुरेसे पाणी न पिले तर अपचन होणे तसेच त्याच्या विरोधात की आपण सुपच पिले व भरपूर पाणी पिले तर भूक लागणे पुढे कमजोरी जाणवणे असा प्रकार झाडांच्या बाबतीत होत असतो.

झाडांना रोज पाणी देत असल्यास त्यात खंड पाडा. बरेचदा मंडळी सांयकाळ झाली की झाडे (मरगळलेली असतात) मेली की काय घाबरून जातात.  आजारी आहेत असे सागंतात. एक सांगा, आपण रोज दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका. त्यांना सारखं सारखं पाणी देवू नका. वातावरणातील उष्मा कमी झाला की ते पुन्हा टवटवीत होतात.

कुंड्या योग्य प्रकारे भरा. बरेचदा मंडळी कुंडी भरताना माती व खत टाकतात.

खताचे अवशेष वापरून झाले की उरते फक्त माती. ही माती कालातंराने दगडासारखी टणक, जड होते. त्यात एकतर पाणी साचून राहते. मुळांना श्वास घ्यायला जागा उरत नाही. अशा वेळेस कुंडी भरताना पालापाचोळा, किंवा बिशकॉमचा वापर करावा. 

कुंडीत जेवढी हवा खेळती राहिल तेवढे कुंडीतील झाडं अधिक टवटवीत राहते. कारण मुळंसुध्दा श्वास घेतात. बरेचदा मुळं हे हवेतून पाणी ग्रहण करत असतात. म्हणूनच इस्त्राईल सारखा देश थेंब न थेंब पाण्याचे नियोजन करून जगाला पोसण्याची धमक दाखवतो त्याचे कारण म्हणजे त्यांनी पाण्याचे ओळखलेले महत्व. व आपल्याकडे शेतीसाठी पाण्यााच अधिकचा होणारा वापर हा जमीनी खारपट, नापिकी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. अर्थात त्यात रासायनिक खतांचाही वाटा आहेच.

पाण्याच्या अधिक ताणामुळे किंवा अधिकच्या पुरवठ्यामुळे फळगळती होत असते. त्यामुळे योग्य पाणी कसे द्यावे याचा संभ्रम निर्माण होईल. आता हे अनेक कारणांवर अवलंबून आहे. मातीचा पोत कसा आहे, पाण्याचे बाष्पीभवन कसे होते. वाहणारा वारा किती व वेग कसा आहे. झाडाची प्रकृती नेमकी कोणती आहे या सार्यांचा विचार करूनच पाणी देणं गरजेचे आहे. आईला सांगावे लागते का बाळाला कधी, केव्हां, किती पाणी द्यावे. हे तिला हद्यापासून समजते. त्याचे कुठेही पुस्तक नाही, गाईडलाईन नाही. कारण ती मनापासून बाळाशी जुळलेली असते. तशीच आपली नाळ सुध्दा बागेशी जुळली पाहिजे. म्हणून तर बाळ व बाग ही या शब्दांची सुरवात एकाच अक्षराने तर होतेच शिवाय त्यांची संख्या सुध्दा सारखीच आहेत.

तसेच बागेत झाडांवर मिलीबग, पिठ्या ढेकूण, मावा या सारखे आजार आल्यास त्यावर नैसर्गिक औषधांची नक्कीच फवारणी करा. पण फक्त फवारणी करून चालत नाही. त्यासाठी झाडांला नेमकं पाणी कमी पडलं की जास्त झालयं याचा विचार करा. जास्त झालं असेल तर कमी द्या. जसे रोग्याला आजारावर औषधपण देतात व पथ्थ पण पाळायला सांगतात. त्यामुळे पाण्याचे पथ्थ पाळा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

How to Grow Cauliflower at Home | फूलकोबी कशी उगवावी |

घरी फूलकोबी कशी उगवावी


Seeds Details

गच्चीवरची भाजीपाल्याची बाग फुलवण्यासाठी परवडणार्या किमंतीत बियाणे उपलब्ध


20/- per packets… Postege 40/- (All Over India)

1 गच्चीवरची बाग Bhindi Seeds copy copy भेंडी / भिंडी/ Okra/ lady Finger/ Bendi/ Bhindi

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 50 +

 

 

==========================================

8 गच्चीवरची बाग mula Seeds copy copy

मुळा / मुली/ Radish/ lady Finger/ Mula

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 100 +

============================================================

9 गच्चीवरची बाग Chavali SeedsBlack eyed beans / Cow Peas / चवळी/ Chavali

packet size – 1.5x 2 Inch  

seeds: 10+

 

 

============================================================

20 गच्चीवरची बाग Coriander Kothambir Seeds copy copy

Cilantro / Coriander leaves / कोथिंबिर /kothiMbir    

packet size – 3 x 2 Inch  

seeds: 500+ ( Multi cut)

लेखः धने लागवड कशी करावी….

============================================================

23 गच्चीवरची बाग palak Spinach Seeds copy copySpinach/ Palak/ पालक

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 100 +

 

 

============================================================14 गच्चीवरची बाग Pink Malbar Spinch Seeds copy copyRed Malabar Spinach/ लाल मायाळू/ Lal Mayalu

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 50 +

 

============================================================

13 गच्चीवरची बाग Green Malbar Spinch Seeds copy copy

Gree Malabar Spinach/ हिरवा मायाळू/Hirva Mayalu

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 20 +

 

============================================================

19 गच्चीवरची बाग Lal Math Seeds copy copyLal math/ Red Chawli leaves/ Red Amaranthus/ लाल माठ/ लाल चवली

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 200 +

 

============================================================

22 गच्चीवरची बाग Hirava Math Seeds copy copy

Hirva math/ Hari Chawli leaves/ Green Amaranthus/ हिरवा माठ/ हरी चवली

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 200 +

 

============================================================

24 गच्चीवरची बाग Beans wal Seeds copy copy

Beans/ Wal/ वाल

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 6 

 

 

============================================================

3 गच्चीवरची बाग Ambadi Seeds copy copy

अंबाडी / Ambadi / Hibiscus Cannabinols

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 25+ 

 

 

============================================================

21 गच्चीवरची बाग Methi Seeds copy copy

Methi / मेथी / Fenugreek

packet size – 3 x 2 Inch

seeds: 250+ ( Multi Cut)

============================================================

7 गच्चीवरची बाग Chilachi Seeds copy copy

Chilachi Baji/ Ghol/  घोळ/ Purslane

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 250+ 

 

 

 

==========================================================

6 गच्चीवरची बाग Shephu Seeds copy copy

Shephu / dill leaves /suva bhaji/ शेफूची भाजी

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 150+ 

 

 

======================================

चाकवत / Goosefoot/  Fat-hen/ Chenopodium album

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 150+ 

===========================================================

करडई/ SAFFLOWER 

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 50+ 

============================================================

श्रावण घेवडा / बिनीस  / फ्रेंच बीन्स / फरसबी

packet size – 1.5x 2 Inch

seeds: 10

 

gardening course

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

How to Harvest Almonds seeds

घर परिसरात बदामाचे एकादे झाड तरी असते. तेल बी म्हणून उपयुक्त असलेले झाडाचे बदाम बी कसे मिळवाल हा सांगणारा हा लेख…


1060836_750758694956677_1130507999_nबदाम हे वेगाने वाढणारे झाडं आहे. त्याला तसे कमी पाणी लागते. तसेच त्यांचा पर्णसंभार हा अधिक असतो. त्यामुळे त्याची सावली उन्हाळ्यात खूप अल्हादायक असते. रस्त्याच्या कडेला, शेतात, घराभोवती,  मुख्यतः बंगल्या भोवती ही झाडे आवर्जून लावली जातात. हेतू हाच असतो.की त्यापासून सावली व बदाम मिळतील.

झाड हे उत्तम वाणाचे असेल तर तीन वर्षात त्याची पूर्ण वाढ होऊन त्यास बदाम लागतात. त्याच्या वाणानुसार बदाम हे भरीव, पोचट  मिळतात. बाजारात मिळणारे बदामबी व घरच्या झाडाच्या बदाम बी मधे खूप फरक असतो. बाजारातील बदाम आकाराने मोठे असतात. पण घरचे बदाम बी हे आकाराने लहान असले तर चवीला अप्रतिम असते. बदामाचे बीला टणक कवच असते. म्हणून बदाम हे बी हा मनुष्यच फोडून खाऊ शकतो. कोणताही पक्षी, माकड अजून फोडून खालेले ऐकीवात नाही. माकडांनी प्रयत्न केला तरी दोन बोटांच्या चिमटीत पकडून दगडाने फोडणे म्हणजे दिव्य कर्म… हे माणसालाच फार जपून करावे लागते. तर मर्कटाची काय मजाल…

तर बदाम बी कसे मिळावावे हे मी पुढे सांगणार आहेच. त्या आधी. बदाम बी मिळो ना मिळो पण ही फळे पिकल्यावर आबंट गोड लागतात. पिकलेली फळे पक्षी खातात. तसेच स्वच्छ करून शक्यतो माणूस प्राण्याने फांदीवरील फळे तोडून, स्वच्छ करून खावेत. बदाम फळाला व बी ला कधीही कीड लागत नाही.

छाटणीः  हे झाडांची वाढ मर्यादीत ठेवणे गरजेचे असते. कारण झपाट्याने वाढणारे, फांद्याचा पसारा वाढवणारे हे झाडं असते. तसेच ठिसूळ असते. त्यावर झोका बांधणे, चढणे हे जोखमीचे काम असते. तर त्याला वर्षातून एकदा नक्कीच त्याची छाटणी करावी.

रोगः बदामावर पांढरी माशी, व्हाईट फ्लाय या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा दाट संभव असतो. बदामाची सावली ही दाट असते. त्याची पाणी दाटीवाटीने वाढतात त्यामुळे हवा खेळती राहत नाही. तसेच त्याला अधिक पाणी दिले गेले तर  या तीन कारणामुळे पांढर्या माशीचा प्रार्दुभाव वाढतो. त्यातून चिकट, तेलकट द्रव्य पसरून मृत कीडीच्या सडण्याचा दुर्गंध पसरतो. पण घाबरून जावू नका. वर्षातून एकदा योग्य छाटणी, झाड वाढीस लागल्यावर पाणी न देणं, पाण्याने अंगोळ घातल्यास ही कीड निंयत्रणात ठेवता येते.

पानगळः पानगळीच्या दिवसात खूप पाने गळतात. बरं ही पानं मोठ मोठी लाल, हिरव्या रंगाची आकर्षक असतात. मुलायम असतात. अशा पानांचा कचरा पाहून काही लोकं कचर्याला घाबरतात. पण याचे कंपोस्ट छान व लवकर तयार होते.

बदाम कसे मिळवावेतः बरेचदा मानव प्राणी दोन बोटाच्या चिमंटीत पकडून नेमकेपणाने त्यावर हातोडी किंवा दगडाने बदाम फोडतो. असे ठेसलेले लालबुंद बदाम बरेचदा झाडांखाली पहायला मिळतात. पण यात बोटांना ईजा होण्याची शक्यता तर असतेच. तसेच बदाम बी सुध्दा आपल्या हाती येत नाही. बरेचदा त्याचा चुरा झालेला असतो.

काय करावे… पिकलेले बदाम फोडण्याचा प्रयत्न करू नये. कारण ओली बी आपल्या हाती लागत नाही. लागलीच तर तिला माती लागते. म्हणजे डोंगर फोडून उंदीर मिळणे असे होते. त्यासाठी बदाम हे एका कापडी पिशवीत महिनाभर वाळवावेत. जसे मिळतील तसे त्यात टाकत गेला तरी चालेल. एकदा बदाम वाळले की बागकामासाठी वापरली जाणारी धारदार कैची घ्यावी. बदामाच्या बरोबर मधे त्यास जोर देवून बदामाला तिरपा काप द्यावा. दोन तुकडे होतात. बरेचदा आतील बी सुकलेली असेल तर सहज बाहेर येते. काही निमओली असेल तर दाभण वा सुईने ते बाहेर काढता येतात. फक्त एक काळजी घ्यावी… बदाम कैची ने कापतांना खूप जोर द्यावा लागतो. त्यामुळे आपली बोट सांभाळावीत. पापणी लागण्याच्या आत अपघात होण्याचा दाट शक्यता असते.  मुलांना हे तंत्र शिकवू नये. मी हा प्रयोग गेल्या सातवर्षापासून आहे. नेहमी जपून करतो त्यामुळे अपघात झालेला नाही..

लेख आवडला तर नक्की शेअर, लाईक व पुढे पाठवा..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

 

 

“की फरक पैंदा”?

घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही…


<a href=”http://Image%20by Gordon Johnson from Pixabay.wordpress.com/2019/05/ekg-2069872_1280.png” target=”_blank” rel=”noopener”>

ekg-2069872_1280.png

“की फरक पैंदा”?“क्या फरक पडता है”। “काय फरक पडतो”? असे आपले रोजच्या जीवनात कुठे ना कुठे एकदा तरी म्हणत असतो. एकाद्या व्यवहारात आपण तडजोड करतो तेव्हा हे वाक्य हमखास आपल्या डोक्यात येते. आता “की फरक पैंदा है” असं आणि आपल्या गच्चीवची बागेचा येथे का संबध असं आपल्या मनात आले असणार.. आलेच पाहिजे.. कारण अत्तर सोडून आपण कुत्रिम सुंगध वापरतांना सुध्दा फरक पडत असेन तर आपल्या रोजच्या जगण्यात ज्या भाज्या बाजारातून ताटात येतात. त्याचा सुध्दा आपल्या शरिरावर नक्कीच फरक पडत असतो.गेल्या सहा वर्षापासून रसायमुक्त भाजीपाला पिकवून देण्याचे नाशिक मधे पूर्ण वेळ काम चालू आहे. त्याआधी घरच्या गच्चीवर विषमुक्त भाज्या पिकवण्याचे प्रयोग चालू होते. काही ना काही रोजची भाजी मिळत होती. रोजच्या डोळ्यासमोरच्या भाज्या खाल्यामुळे घरातल्या छोट्या छोट्या आजारावंर होणारा खर्च बराच आटोक्यात आला होता. पण मागील वर्षी घरच्या बागेकडे दुर्लक्ष केले (खर तर या काळात इतरांच्या ठिकाणी भाज्या उगवण्याचं प्रमाण वाढलं होत) त्यामुळे साहजिकच घरी उगवलेल्या भाज्या या ताटात येणं कमी झालं. (त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज होता पण प्रयोग करून पहायचं होत) आणि झाला तसचं. घरच्या भाज्या खाणं कमी म्हणजे जवळ जवळ नाहीच झालं. नि दिवाळीमधे बायकोला हायपरटेशंनमुळे आठवडा भर अडमीट कराव लागलं. नको तेवढा पाण्यासारखा पैसा दवाखान्यात खर्च झाला. मनस्ताप झाला तो वेगळाच. (कळत असूनही विषाची परिक्षा घेतली) त्या काळात काम बुडालं ते नुकसान वेगळचं. तसंच शरिरात रासायनिक औषधांचा मारा झाला तो वेगळाच. घरी भाज्या न पिकवणं हे एकूणच महागात पडलं होतं.शक्यतो रोज संध्याकाळी वरण भात हा ठरलेला असतो. इतर कडधान्याच्या भाज्याही होतातच. (बाजारातल्या ताज्या भाज्या पेक्षा कडधान्यात कमी विषतत्व असतात. कारण बाजारात आलेल्या भाज्यावर रसायनं मारून २४ तासाच्या आत त्या शिजवून पचवलेल्या असतात. रेसुड्यू फ्री नसतात) त्यामुळे घरच्या हिरव्या भाज्या आठवड्यात तीन –चार असल्यातरी पुरेशा होतात. पण त्याहीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं. याचा मला चांगलाच अनुभवाचा चटका लागलाय.

आपण बाजारातून रोजच्या भाज्या खातो त्यात कुठेना कुठे त्यात रसायनांचे अंश हे आपल्या पोटात, पचसंस्थेतून रक्तात मिसळतात. त्यातल्या त्यात आपलं रोजचा व्यायाम नसतोच. त्यातून हायपरटेशंन सारख्या गोष्टी घडतात. मी प्रयोग म्हणून केलेला हा प्रयत्न करतांना मी पण असेच म्हणालो होतो की काय फरक पडतो. पण फरक पडतो…. घरी उगवलेल्या भाज्या या मूठभर असल्यातरी तरी त्या औषधांच काम करतात. नि बाजारातल्या भाज्या स्लो पाईझनचे काम करतात. तेव्हा निवड तुमची आहे. ‘’की फरक पैंदा’’ म्हणून बेफिकीर होऊन चालणार नाही…. एकादे वस्त्र हे जसे सुक्ष्म धाग्यानीं विणून तयार होतं. तसचं आपल शरीर, आपलं जगणं सुध्दा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच समृध्द, सुदृढ होत असतं. ते आपल्या लक्षात येत नाही… घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही… हे लक्षात घेवूनच आपल्या रोजच्या जगण्यात, धडपडण्यात घरच्या भाज्या घरीच पिकवण्याचा प्रयत्न करा. हळू हळू त्यात मास्टरकी येणारच.

वरील चित्रफितीत दाखवल्या प्रमाणे आम्ही जमीनीवर किंवा गच्चीवर विटांच्या वाफे बनवून रसायनमुक्त भाज्या पिकवून देतो.लेख आवडला तर नक्की लाईक,शेअर, व कंमेट करा…संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.9850569644/ 8087475242www.gacchivarchibaug.in

जाहिरात: उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवा. गच्चीवरची बाग पुस्तक (व्दितीय आवृत्ती)
घरपोहोच by post 240/-
WTS app 9850569644 / 8087475242
http://www.gacchivarchibaug.in


संदीप चव्हाण नाशिक.

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: