दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी, शंकाराचार्य़ न्यास, नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत व्दारे गोसेवा गतिविधी यावर एक दिवसीय कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात दुपारच्या सत्रात गच्चीवरची बाग अर्थात शहरी शेती व गायीचे महत्व या विषयावर आधारित स्लाईड शो प्रदर्शन होत आहे.
या एक दिवसीय कार्यशाळेत देशी गायीचे अर्थव्यवस्थेतील, दैंनदिन आरोग्यातील महत्व, तसेच शेतीतील महत्व, तिचे फायदे व संगोपन या विषयावर विविध मान्यवरांची विचार मांडणी होणार आहे.
गच्चीवरील बाग फुलवता फुलवता आम्ही किचन गार्डन व त्या अनुषंगाने शेती संबधीही मार्गदर्शन करत असतो. बरेचदा विषमुक्त शेती कशी करावी या संबधी विचारणा होत असते.
शक्य असल्यास प्रत्यक्ष फार्मवर भेट देवून त्यांना सांगत असतो किंवा त्यांना दूरध्वनीवर मार्गदर्शन करत असतो. यातील नेहमीचा व कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे शेती करायची तर एकादी देशी गाय पाळणे फार गरजेचे आहे. मग ती दुध देणारी नसली तरी चालेल अगदी भाकड गाय असली तरी चालेल. पण लोक नेहमी दावा करतात की आम्ही त्यांना सांभाळू शकलो नाही तर, त्यांना त्रास झाला तर, त्यांची सेवा नाही करता आली तर…
अशा मंडळीना एक सांगायचे आहे की आपण आहे त्या परिस्थितीत आपल्या आईला, वडीलांना सांभाळतोच ना. आपण जे खातो ते पण तेच खातात. आपण जेथे राहतो तेथेच ते पण राहतात. त्यावेळेस आपण म्हणतो का की त्यांची सेवा करता येत नाही म्हणून त्याची वृध्दाश्रमात पाठवणी करतो. नाही ना.. कारण ते आपल्याजवळ अधिक आनंदी व सुखी असणार आहेत.
तसेच गायीचे आहे. तुम्ही आहात तसे आहे त्या परिस्थितीत त्यांना सांभाळा तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा. खूप काही खर्चाची गरज नाही. कारण आज त्यांना सांभाळू शकलो नाही तर ती उद्या कत्तल खाण्यात जाणारचं आहे. त्यांना दत्तक घेवून होईल तेवढी सेवा करायची हे योग्य की त्यांना दत्तक न घेताच वार्यावर सोडणे योग्य. ते तुम्हीच ठरवा. अर्थात गो पालन तुम्हाला कोणतेही उत्पन्न नको असेल तरी करू शकता पण शेती असेल तर नक्की करा. मग ति रासायनिक असो की विषमुक्त शेती. कारण गायीचे शेण व गोमुत्र हे जमीनीच्या स्वास्थासाठी फार गरजेचे आहे. तिच्या चारापाण्याचा होणारा खर्च हा सहजतेने तिच्या शेण व गोमुत्रातून निघू शकतो एवढी ती लाभदायी असते. थोडक्यात परवडत असते. मग आणखी काय हवयं.
गायीला काय लागते. दोन वेळेस चारा पाणी, एक डोक्यालर सावली मिळावी म्हणून छप्पर असलेला गोठा व स्वच्छ जागा. शक्य असल्यास गुंठा दोन गुठ्यांची मोकळी जागा. रात्रनिवासासाठी तिचा गोठा हा जागा योग्य उतार देवून सिमेंटचा कोबा केलेला असावा. त्यांना मातीच्या गोठ्यात ठेवू नका. कारण चिखलात तिच्या पायाला इजा होण्याची शक्यता असते. आजही आदीवासी भागात महिना महिना पाऊस चालू असतो तेव्हा त्यांना गोठ्यात बांधून ठेवतात. वरून छप्पर गळके असते. त्यात खाली चिखल शेण, मुत्राचा चिखल असतो. शक्यतो असे टाळा. गोठ्याची जमीन ही हजार बाराशे पेक्षा अधिक खर्च येत नाही. तसेच छप्परसाठीही एवढा खर्च येत नाही. फक्त ईच्छा शक्ती हवी. गायीचा गोठा कसा करायचा या बद्दल तुम्हाला फोनवर मार्गदर्शन करू. शहरात असाल तर गायीसाठी चार्यांचा संग्रह करायची गरज नाही. त्यांच्यासाठी उसाची कुट्टी मिळते. घरचा भाजीपाल्याच्या काड्या मिळतात. नाहीच मिळाल्यातर फळांच्या दुकानावरची फळे, भाजीपाल्याच्या दुकानावरचा भाजीपाला मिळतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांना चौरस आहार कसा मिळेल याचा विचार करा. जे उपलब्ध आहेच तेच भरवू नका. त्यात समतोल असला पाहिजे. गायीसाठी धान्यांचे कुट्ट्यारही मिळते. ज्यात गव्हाचा कोंडा, तुरीचा भूसा, कापसाची पेंड, शेंगदाणा ढेप मिळते. त्यांचाही वापर करा.
आपल्याकडे शेती असेल तर बघायलाच नको. मका, घास, भूईमुग, मूगाचा पाला, उगणारे गवतही त्यांचासाठी खाद्य म्हणून वापरता येते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.
8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.
आम्ही पाळलेल्या पहिल्या गायीच्या म्हणजेच आर्चीच्या पोटी प्राचू जन्माला आली. प्राचूच्या पहिल्या वहिल्या बाळंतपणाची म्हणजे तिच्या पोटी जन्माला आलेल्या बंडू ची गोष्ट आपण वाचलीय. ( आणि बंडू जन्माला आला.) त्याला खूप जणांचा प्रतिसाद मिळालाय. त्याबद्दल आपल्या वाचकांचे मनापासून धन्यवाद…
प्राचू व बंडू
आता प्राचुच्या दुसर्या बाळंतपणाची गोष्ट पहाणार आहोत. प्राचूला दोन बाळंतपणात पुरेसे अंतर रहावे म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न करत होतो. कुत्रीम पध्दतीने रेतन करणे हे मला आजही पटत नाही. म्हणून योग्य वेळेला ती माजावर आल्यानंतर तिला रात्रीच्या वेळी मोकळ्या पंटागंणात बांधून ठेवलीय. त्या रात्री वळूंचे (काही पोक्त, काही नवजात) युध्द झाल्यांनतर एकादाचे स्वयंवर पार पडले. अंधारात त्यांचा कार्यक्रम झाला. प्राचू शांत झाली.
नि प्राचू गर्भार राहिल याचा आम्ही अंदाज बांधला. प्राचूची गर्भधारणेची तारिख लिहून ठेवली. तिचे लाड करू लागलो खरे. तीन चार महिण्यात ती गोंडस दिसू लागली. डोळ्यातून प्रेम दिसू लागले. एकदाचे तिच नैसर्गिक गर्भधारणा झाली म्हणून मी बिनधासत झालो होतो. नऊ महिने उलटले तरी प्राचू काही बाळंतपणाचे नाव घेईना. दहावा महिणांही वाट पाहण्यात गेला. नि ति अखेर अकराव्या महिण्यात व्याली. या वेळेसही ती वेणा देत चारही पाय सोडून जमिनीवर पडलेली होती. कास मध्यम आकाराने सुजलेली होती. गायीच्या भोवती कुबट वास येण्यास सुरवात झाली. तिच्या पहिल्या बाळंतपणाचा अनुभव असल्यामुळे आम्ही जय्यत तयारीत होतो. तिचा जार हा कुत्र्यांच्या तोंडी लागू नये म्हणून दोन महिने आधिच खड्डा तयार करून ठेवला होता. काही कापडं हाताला लवकर सापडावीत म्हणून घेवून ठेवली होती. काही पोती बरोबर होती. कुंबट मासं जळाल्यासारखा दुर्गंध अधिकच वाढू लागला. वेळ रात्री साडेदहाची होती. आईने तर मला दोनदा जेवता जेवता बोलावून घेतले होते. पण आज ती व्याणार होती हे निश्चित होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. पिल्लाचे तोडं बाहेर येवू लागले. पिल्लू बाहेर आले खरे पण गर्भपिशवी भवती असलेले सफेद रंगाचे सेल्यूलोज हे काळपट होते. पिल्लू अकरा महिण्यांनी जन्माला आले. (अकरा महिण्यांनी जन्माला येणार्याला अकरमाशा, अकरमाशी संबोधले जाते, अकरा मासात जन्माला आलेले स्वभावाने आगावू असतात.) ठरलेल्या वेळेपेक्षा २ महिने जास्त घेतल्यामुळे गर्भपिशवी मधील पाणी हे जवळपास संपलेले होते. नि त्याचाच कुबुट गंध येत होता. मागील वेळेपेक्षा यावेळी खूप कमी कपडे लागले. बाळांतपणही लवकर आटोपले. गायीला खूप अशक्तपणा आला होतो. पिल्लाला मीच पुसले, लांबसडक होते. सेम टू सेम दुसरी प्राचूच होती. अंगावरील ठिपके व त्याचा रंग सुध्दा सारखाच होता. प्राचूने या वेळेच्या गर्भधारणेच्या वेळेस स्वतःवर प्रेम केले होते याची साक्ष पटली. जन्माला आलेले पिल्लू हे कालवड होती. तिला दुधाच्या सडाची ओळख व्हावी पिल्लू कसबंस तिच्या सडाजवळ नेत होतो पण पिल्लू काही त्याला तोंड लावत नव्हंत. ते इतकं अशक्त होत की ते पायावर उभ राहयाला त्याने दोन तास घेतले. ते धडपडून माझ्याच जवळ यायचं. माझ्याच हाताची बोट तोंडात धरू लागलं. प्राचूला उभ राहण्याची हिमंत नव्हती. सरते शेवटी प्राचू उभी राहिली, तेही उभ राहिल, धडपडत दुधाचा सडा शोधून दूध पिऊ लागलं.
तिच नामकरंण आईने सोनी ठेवलं. सोनी रात्री जन्माला आल्यामुळे रात्रीच्या बाळंपणात व कुत्र्यापासून संरक्षण मिळावे म्हणून सुरू असलेला उजेडाचा बल्ब मात्र तिचे डोळे तिरपे करून गेला. ती टेहरी म्हणजे डोळ्याने चकणी झाली. तीला आवाज दिला की ती दुसरीकडेच पाहते याचा भास व्हायचा. पण कालांतराने तिची ही नजर सुधारली. ति जन्मताच अशक्त असल्यामुळे प्राचूचं सारं दूध तिला पाजलं. दोन महिण्यात टनाटन उड्या मारू लागली. तिची तब्बेत सुधारलीय. प्राचूला एकट वाटू नये म्हणून बंडू, सोनीच्या जन्मापर्यंत बरोबर होता. आता प्राचू बंडू नि सोनी बरोबर राहणार होती. त्यामुळे प्राचू आनंदात होती. पण जागेच्या अभावी व तिघांना सांभाळणे अवघड म्हणून बंडूला शेतावर पाठवायचे ठरवले. बोलणी झाली. गोठ्यातून प्राचू व सोनीला सोडून मागील जागेवर चरण्यास सोडण्यात आले. बंडू गोठ्यातूनच गाडीमधे खालीमान घालून चुपचाप चालून गेला. त्याला बहुतेक कळालं गंतव्याचे कारण कळाले असावे. त्याला नविन जागा नविन मालक देणं गरजेचं होते.
पण झालं असं की रोज आपल्या मागे येणांरा बंडू मागे आला नाही म्हणून प्राचू गडबडली. तिच्या दुधाचा पान्हा आटला. बंडू नाही याचं आम्हाला दुखः होतं पण तिच्यासाठी धक्का होता. प्राचूचं दुध आटलं. दुध इतक आटलं की सोनीला पुरेस दुध मिळेल की नाही यांची चिंता भेडसावू लागली. पण सोनीच्या सानिध्यात दुख विसरली. दोघं आंनदाने राहू लागलीय. त्यांच्या एकत्र उड्या मारणे, सोनीच्या गायीच्या पोटात झोपणं. एकत्रच खाणं वाढू लागलं. आता सोनी मोठी होऊ लागली. प्राचूला नव्या स्वयंवराची ओढ लागू लागली. सोनीला काही दिल की तिच आधी स्वतःजवळ ओढून खावू लागली. आता सोनी वर्षभराची झालीय. अकरमाशी असल्यामुळे कोणतही वळण तिला लागल नाही. तिला आईच्या आधिच कुठेही पळायची घाई असायची. छोट्या जागेमुळे अपघात होण्याची शकयता होती. सोनीला दत्तक देण्यासाठी दुसरीकडे पाठवण्याची बोलणी झाली. या दरम्यान स्वंयवर शोधासाठी प्राचूची मोहीम असफल ठरली. ति बाहेर पडली खरी. पण घरी लवकरच परतली होती. तिची गर्भधारणा झाली असावी म्हणून आम्ही अंदाज घेतला. पण तो चूकीचा ठरला.
प्राचू व सोनी
सोनी मोठी झाली होती. तिला एका कुटुंबात पाठवले गेलं. चारा, औषध पाण्याची सोय होऊन जाते. पण जागेअभावी त्यांचे संगोपन करणे खरेच अवघड होते. अचानक गायब झालेली सोनीची वाट पाहत आजही प्राचू विट्यांच्या धक्यावर ( उंच ओट्यावरून) उभी राहून दूरवर पहात असते. की तिची सोनी परत येईन. कधी कधी एकटीच आसंव गाळतें. पण नाईलाज आहे. तिचे अश्रू पुसणे एवढेच हाती आहे. आता ति एकटीच आहे. खरोखर एकटीच आहे. काळजी घेण्यासाठी, व्यस्त राहण्यासाठी तिच्या पोटात बाळपण नाही. महिना पंधरा दिवसात माजावर आली असतांना बाहेर बांधतो खरे पण वळूही फिरकत नाही. शहरातील गोपालान हे खरंच आव्हानात्म असते. तिचे दोनही वंश सांभाळण्याची फार इच्छा होती. पण जागेअभावी ते साध्य होत नाही. जागा मिळालीच तर कोणत्याही किमतीला बंडूला व सोनूला परत आणीन.
प्राचू विट्यांच्या धक्यावर उभी राहून सोनीची वाट पहातेय नि मी गच्चीवरची बागे पर्यावरणीय कामाच्या माचीवरून गोवंश पालनासाठी नाशिकमधे कुणी जागा देतय का जागा अशा दैवताची वाट पाहतोय…
गच्चीवरची बाग या विषयात पूर्णवेळ काम करण्याचे ठरवले. त्यावेळेस आपले काम हे गारबेज टू गार्डन व विषमुक्त असेन हे त्तत्व व सत्य पहिल्या दिवासापासूनच स्विकारले होते. त्यामुळे रसायनांच्या कोणत्याही अभ्यासात पडायचे नाही अशी शेंडीला जणू गाठच मारली होती. (अजूनही ती गाठ तशीच आहे म्हणा किंबहूना ती घट्ट झाली अगदी शेंडी तुटली चालेल पण शेंडीची गाठ सुटता कामा नये अशी) तर आपले पूर्वज कशी शेती करायचे हा विचार व अभ्यास केला तेव्हां लक्षात आले की गायीचे शेण व गोमुत्र या शिवाय खत काय वापरली असणार…
झालं..प्रयोग करणे सुरू झाले. (आजच्या एवढी भरमसाठ माहिती तेव्हा मोबाईलला येत नव्हती.. तसले टचकन दाबलं की माहिती देणारं यंत्र खरेदी करणचं दूर होत..) गायीचे गोमुत्र हे संजीवक व कीडनियंत्रण म्हणून वापरावयास सुरवात झाली. अर्थातच एका गोशाळेतून ते विकत आणू लागलो. त्यांना माझा उद्देश आवडला. पण मी येथून गोमूत्र नेवून तेथे कुठेतरी (नक्कीच जास्त पैशात) विकत असणार असा त्यांचा ग्रह झाला. फेरी वाया जावू लागली. नकार मिळू लागला. मग काय…
देशी गायच पाळायचं ठरवलं.. गायीचा शोध घेतला.. गावातलीच हवी म्हणून खेड्यातील गाय आणली.. मला त्यावेळी सैराटसारखं भरून आलं. तिच नाव आर्ची (आरची) ठेवलं. फेसबूकवर नावाचं बारसं झालं. माझ व गायीच जाम कौतुक झालं. गाय गाभण होती म्हणून तिच्या पिल्लाची वाट पाहत होतो. तिच बाळंत झालं, कालवड झाली (नाव प्राचू ठेवलं) पण आईला काही प्राचू नि ब्रिचू तिनं तिच घरचं नाव मोन्टीं ठेवलं. (तिच्या भाचीचं नाव) मी काही तिला कोणत्याच नावानं हाक मारली नाही… सारं दूध तिलाच पिवू दिल.. प्राचू अशी तगडी झाली की वर्षभरातच ति आई पेक्षा पहिलवान वाटू लागली.
मला आता तिची चिंता वाटू लागली.. तसं याला दोन अडीच वर्षाची होईपर्यंत तिआता प्राचू उर्फ मोंन्टीला उपवर शहरात कसा शोधायचा.. इंजेक्शन देवून तिला इतक्या कमी वयात दिवस जावू देणं मला पटतं नव्हत… दिवस सरत होते. प्राचू आता हाडामासाने मोठी दिसू लागली. आम्हाला ही कौतुक वाटू लागलं. कधी पातळ शेण दिल तरी मला हादरायला व्हायचं. आपल्याला म्हणजे मोठ्यांना काही झालं तर सांगता येतं पण लहान बाळ व जनावर हे काही सांगू शकत नाही. त्यात आपल्याला गाय पाळण्याचा कवडीचा अनुभव नाही. त्यामुळे डाक्टर मित्राला फोन करून औषधं मागवून घ्यायची…
तर प्राचूसाठी उपवर शोध चालू होता. त्याला इकडे आणायचे किंवा हिला काही महिने त्याच्याकडे सोडायचे असा सगळा पैशाचा, वेळेचा, विश्वासाचा ताळमेळ बघणं, अंदाज बांधण चालू होता. ( video पहा)
आक्टोबर महिण्याची पाच तारीख उगवली. प्राचूचं मायागं व कास बरीच सुजली. डॉक्टरांना बोलावतो तर कुणीच येईना. असे चार दिवस गेले. गोठा तर स्वच्छ ठेवत होतो. विषाणूंची बाधा होणं दूरच होत.
अशातच एका ओळखीतून डॉक्टर घरी आले. म्हणाले गायीला दिवस गेले आहेत. पोटात हात घालून तपासावे लागेल. आईनं डॉक्टरांनावे ड्यात काढलं, गाय कुठं गेलीच नाही तर दिवस जातीलच कसे. गाय मागील बंधीस्त कंपाऊंड मधेच मुक्त फिरू देतो. पण. मी पण आईच्या मताशी सहमत होतो. तिला दिवस जाणं शक्यच नव्हतं. प्राचूला काही तरी भयंकर झालं आहे या चिंतेने आई हळवी झाली नि माझी झोप उडाली.. गुगलवर माहिती शोधली पण काही तपास लागत नव्हता.. जेमतेम २६ महिण्याची गाय आता जिवाशी जाणार, माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. तसाच सकाळी कामासाठी बाहेर गेलो. कामावरून येतांना सहा वाजत होते. रस्त्याने गायी विषयी चिंता होतीच. आईन फोन केला. लवकर ये… आपली गाय… पुढचं काही ऐकू आलं नाही.( नो आयडीयची कमाल .. अवघं आयुष्य बदलून नाही बुकलून काढलयं …. ल्यांनी) गाडीची स्टेंअरिंग हाताच्या घामानं ओली झाली होती. कपाळावर दरदरून घाम फूटला.. घरी अंगणात गाडी कशी तरी पार्क केली. मला तर श्वास घेता येत नव्हता. गाय गोठ्यात आडवी पडली होती. अशातच आई मागच्या दारून पुढ येऊन थोडं हसू संमिश्त्र भितीच्या भावाने सांगीतल गायीला पिल्लू होतय…मी गायीच्या मायांगाकडे पाहिलं खरचं तिथे पिल्लाचे खूर बाहेर येतं होतं.
अरे… कसे शक्य आहे.. गाय कुठे सोडलीच नाही… (कुठे शेणं खाल्लं असं असं कौतुक डोक्यात आल.. पण आता त्यावर विचार करण्याची वेळ नव्हतीच. आता खरी वेळ होती प्राचूचं पहिलं बाळतंपण स्वच्छ जागेत करण्याची, मी पुढे सरसावलो. आई भितीने थरथरली. तिचा जिव खाली वर होत होता. कारण गाय अडली तर काय करायचं. कारण पिल्लू बाहेर येतच नव्हतं. मी तिला धिर देत होतो. तिनं बाजरी शिजवायला टाकली. त्यातच गॅस संपला. पुढील दारून तो मागील दारी नेला तर ठेवतांना कचकन पायांच्या अंगठ्यावर पडला. डोक्यात सणक गेली. चक्कर आली. पण सावरलो. गायीकडे पाहणं गरजेचं होतं. जून्या साड्या कपडे, पोती गोळा केली. . डॉक्टर मित्राला फोन केला पण तो येण्याची आशा माळवली होती. पिल्लू जसे जसे बाहेर येतं होते तसे तसे चिकट द्राव्य बाहेर येत होते. मी त्याला पुसू लागलो. कारण गाय कोरड्या जागेवर व्याली पाहिजे. उभी राहिली तर पाय घसरायला नको. चार पाच पोती ओली झाली. ति दुसर्या पोत्यात भरली. जून्या साड्या फाडून फाडून गोठा पूसू लागलो. आता पूर्ण घामाने ओला झालो होतों. दोन मोठी पोती भरलं… अंधारात जावून ते ओझं दूरवर ओसाड जागी फेकून आलो. आता पिल्लू बर्यापैकी बाहेर आले होते. पण गाय निपचीतच पडून होती. पिल्लू जसं बाहेर आलं तसं त्याभोवतीची गायीचे गर्भ पिशवीचे लाल रंगाचे आवरण बाहेर आले. ते आवरणे गरजेचे असते. रक्त मिश्त्रीत असते म्हणू त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून ते पून्हा नव्या जोमाने पूसू लागलो. ते सारं एका बादलीत भरलं ते कुत्र्याच्या तोंडी लागू नये म्हणू वेगळं बादलीत भरलं. झाकूण ठेवलं. पिल्लू पूर्ण बाहेर आलं. त्याला चाटून पुसण्याची ताकद गायी मधे नव्हतीच. तिला कंठच फूटत नव्हता. तिच हे पहिलच बाळतंपण होत. पिल्लू कपड्याने पुसून काढलं. पिल्लू उठण्यासाठी धडपडू लागलं. गायं तर एका कोपर्यात होती. पिल्लूला मी दिसलो ते माझ्याकडे, माझ्या अवती भवती फिरू लागलो. त्याला बोट चाखायला दिला.. पण ते जोरातचं दाबून चोखू लागले. बोटाला गुदगुदल्या होत होत्या. गाय उठून उभी राहणं शक्यच नव्हत. कारण तिन- चार तासांची ही प्रक्रिया पहिल्यादांच तिन बिना औषधा व खुराकाशिवाय निभावली होती. पिल्लाच तोंड गायीच्या सडाशी लावू लागलो. पण त्याला ते काही उमजेना. गायीला उभं केलं पण पिल्लू तिच्या सडाकडे जाईचना… हाताने त्याचे तोंड धरून सडाकडे नेले तरी त्याला कसे प्यायचं हे कळत नव्हत. ते माझ्याच पायाखाली घुसू लागले. त्याला मी त्याची आई वाटतं होतो. तासाभराने त्याला दूध कसं प्यायचं हे कळू लागलं. सार्या गडबडीत ते वासरू मादी आहे की नर हे पाहिलंच नव्हतं. पाहिलं तर कळंतच नव्हतं. शेवटी आई व मी चर्चा केल्यानंतर तो नर आहे. यावर निदान झालं. नि त्याचं नाव बंडू ठेवलं. बंडू, बंड्या अशा नावाने तो कान हलवतो. ह्या उगाच काय… असे म्हणूत मान विशिष्ठ तर्हेने हलवून दाखवतो. तो आता बंडोपंत होण्याच्या मार्गावर आहे. तो चार महिण्यातच (एक वर्षाचा दिसू लागलाय) तो प्राचूच्या कमरेला लागू लागलाय. तर असा बंड्याचा जन्म झालाय..
आता गाय कधी लागली… यावर चर्चा रंगली. आईच्या व माझ्या विचारातून ते लक्षात आलं. आई मामाकडे गावाला गेली होती. त्यावेळेस प्राचू तिन दिवस गायब होती. शोध शोधली पण सापडली नाही. आईला गावावरून बोलावून घेतले. आईनं ती शोधून काढली. अगदी भर दुपारी मस्त पैकी झाडाच्या सावलीत महाराणीसारखी चर्वण करत बसली होती. घरी यायला तयार नव्हती. तिला मुक्तता, स्वंतत्रता, बेफिकीरी अनुभवायची होती. तिला नवीन दोर आणला. छोटा हत्तीत बसून आली.
खरं तर प्राचूनं, निसर्गाने माझी महत्वाची चिंता मिटवली होती. तिनच उपवर शोधून महत्वाचं काम केलं होतं. पण आम्हाला दुखः एवढचं की ति गर्भार आहे याची माहिती नव्हती. मी प्राचूच्या चिंतेत कितीतरी वेळ खर्च केला होता. डॉक्टरांना वेड्यात काढलं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचे औषध पाणी, विशेष खुराक न दिल्याचं, तिच कौतुक न केल्याचं मला जास्त दुखः होतं. पण आपली इच्छा व त्यामागील हेतू शुध्द असेल तर निसर्गच आपल्याला मदतीला येतो. याचा मला बरेचदा प्रत्यय आला आहे. तो याही वेळेस आला.
तर अशा रितीने मी गायीचे बाळंत करण्याला हातभार लागला. गायीच्या बाळांतपणाची छोटी जाण आली. बरंच काही शिकायला मिळालं. बंड्याअशा नावाने हाक मारली की बंडू कान हलवतो. ”ह्या उगाच काय… ?असे म्हणून मान विशिष्ठ तर्हेने हलवून दाखवतो. तो आता बंडोपंत होण्याच्या मार्गावर आहे. तो चार महिण्यातच (एक वर्षाचा दिसू लागलाय) तो प्राचूच्या कमरेला लागू लागलाय. तर असा बंड्याचा जन्म झालाय…
आवाहन: शहरात नवख्याने गाय पाळणं हे मोठं आव्हान आहे. वेळेवर डॉक्टर नसणं, चारा पाणी याची व्यवस्था करणं आणि हे सारं करण्यासाठी आर्थिक पाठबळ असणं हे खूप महत्वाचं आहे. आम्हाला किंवा आपल्या पाहण्यातील शहर किंवा खेड्यातील एकल गोपालकाला ऐच्छिक मदत करा. त्याने मोठा धिर मिळेल विशेष म्हणजे आत्मविश्वास मिळतो की आपण एकटे नाही आहोत. कारण गोशाळांचा खर्च मोठा असला तरी तो विभागला जातो किंवा त्यांच्या उत्पादनातून, इतरांच्या निशुल्क सेवेतून ते परवडतं तसे एकल गो पालकाला ते अवघड असतं.
भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध… सारवलेले अंगण तर कधी अंगणात मारलेला सडा…
विदेशी गायीपेक्षा देशी गायीला खूप महत्व आहे. त्यांचे दूध हे आरोग्यदायी व पोषक आहे. झाडांमधे जसे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. ज्याचे प्रत्येक भाग हा उपयोगी आहे. तसेच गायीचे सुध्दा… गायीच्या शेणाचा उपयोग प्राचिन काळात श्रीकृष्णांनी पहिल्यांदा केला. म्हणूनच एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला म्हणजे गाय उत्पादित पदार्थामुळे गाव स्वांवलंबन झाले.
तर शहरी परसबागेत देशी गायीच्या गोमुत्राला महत्व आहेच. त्यामुळेच आम्ही सुध्दा एक देशी गाय पाळली आहे. आता शहरात हे कसे शक्य आहे. आम्ही ते शक्य करून दाखवले आहे. अर्थात काही सुविधा असणे गरजेचे असते. मोकळी जागा, चारा पाणी, औषधे व काळजी घेण असं केल तर ते नक्कीच शक्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गायीच्या शेणांचे आम्ही वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे तिच्यापासून मिळणारे शेण व त्याचे खत हे खूपच उपयुक्त ठरते आहे.
तर गायीच्या गोमुत्राला मानवी आरोग्यात जसे अन्यन्य साधारण महत्व आहे तसेच हे शहरी परसबाग, गच्चीवरची बाग फुलवण्यासाठी उपयुक्त आहे.
गोमुत्राचे बागेसाठी फायदे…
संजीवक द्रावण…
बागेला आपण ज्या प्रमाणे जिवामृत पाणी देतो. तेसच गोमुत्र पाणी देता येते. बागेला संजीवक द्रावण देताना १५ दिवसांचे तरी अंतर असावे. म्हणजे त्याचा परिणाम दिसून येतो. एकास दहापट पाणी मिसळून झाडांना जमीनीत दिले असता त्यातून पोषण द्रव्ये मिळतात. तसेच मुळांना मुळकूज रोग होत नाही. गोमुत्राने भिजलेली किंवा अंश असलेली माती हे गांडूळांना फार आवडते. त्यामुळे गांडूळांची संख्या वाढीस मदत होते.
फवारणी…
गोमुत्र आहे तसे बागेत फवारू नये. त्यात एकास दहापट पाणी मिसळावे. व त्याची फवारणी करावी.फवारणी ही सायंकाळी ३ वाजेनंतर करावी. म्हणजे गोमुत्राच्या उग्र वासाने कीड पळून जाते. काळा मावा व सफेद मावा यावर गोमुत्रपाण्याची फवारणी फार उपयुक्त ठरते.
गोमुत्राचा रंग, गंध व स्वभाव..
गोमुत्र शक्यतो ताजे असतांना पाण्यासारखे पिवळे दिसते. तर काही कालावधी नंतर ते सोनेरी रंगाचे दिसू लागते. गोमुत्र जसे जूने होत जाते तसा त्याचा रंग तांबडा, लाल होत जातो. गोमुत्र व मध हे निसर्गातील असे पदार्थ आहेत. ते जसे जूने होत जाते त्याप्रमाणे ते उपयुक्त ठरत जाते. त्यामुळ गोमुत्राचा संग्रह हा कितीही जूना असला तरी चालतो. गोमुत्राचा गंध हा तिव्र असतो. पण तो सहन करता येतो. बागेत गोमुत्र फवारल्याने आपलीही श्वसन प्रक्रियेची क्षमता (deep Birthing) वाढते. गोमुत्र हे वातावरणातील विषाणू मारण्याचे काम करते. म्हणून पूर्वी कोंदट खोल्यामध्ये ते शिंपडले जायचे . जेणे करून श्वास घेण्यास मदत होईल.
गोमुत्र कुठे मिळेल… ध्रुवनगर बस स्टाप, सातपूर गंगापूर लिंकरोड, चुल्हीवरची मिसळ जवळ, नाशिक.
एक लिटर पॅकिंग मधे २० लिटर प्रमाणे उपलब्ध आहे. घरपोच हवे असल्यास मिळेल. अटी व शर्ती लागू.
इतर उपयोगः फरशी पुसण्यासाठी केला असता. फरशी चकचकीत व निर्जंतूक तर होतेच. शिवाय घरातील झुरळं पळून जातात. हवेतील विषाणू मरतात व वातावरण शुध्द होते.
दक्षताः बागेसाठी जमा होणारे गोमुत्र हे गोठ्याला उतार करून एका बादलीत संग्रहीत केले जाते. त्याचा उपयोग मानवी आरोग्यासाठी करू नये. मानवी आरोग्यासाठी वेगळ्या व शुध्द पध्दतीने गोमुत्र गोळा करतात. तसेच फवारणी करते वेळेस जूने गोमुत्र असल्यास पाण्याचे प्रमाणा वाढवावे.
संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,) के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।
इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।
जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है। इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।
Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20% मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।
Total amt: 150000/-(1.5 lakh)
उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।
You must be logged in to post a comment.