आम्ही गच्चीवर बाग फुलवून देतो. पण हे सर्वच खरचं रसायमुक्त असते का… या साठी कोणतेच रासायनिक औषधे वापरली जात नाही का असे प्रश्न विचारली जातात.
हो हे खरयं. आम्ही वाफे भरण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो. त्यात सुरवातीला कुठेही व नंतरही भाज्या उगवतांना रासायनिक खताचा, औषधांचा वापर ही केला जात नाही. एक वेळ भाज्या कमी आल्या (खरे तर असे होत नाही) किंवा नाहीच आल्या तरी त्यात रसायनांचा वापर आम्ही करत नाही व करू देत नाही. कारण सुंगधी माती तयार होणे खूप गरजेचे असते. बरेचदा कीड वाढते अशा वेळेसही आम्ही गोमय आधारीत औषधांचा, किड वेचण्याचा, मानवी हस्तक्षेपाचा पर्याय निवडला जातो पण रासायनिक अंश कुठेही वापरली जात नाही. आम्ही पंचस्तरीय पध्दतीने भाज्याचे प्रकारांचे लागवड करतो. तसेच Vegetable Forest (भाजीपाल्यांचे जंगल) तयार करावयाचे तत्व वापरतो. जी पधद्त जंगलात निसर्ग वापरत असतो. तर अशा प्रकारे आम्ही नैसर्गिक पधद्तीने भाज्या उगवतो. म्हणूनच आम्ही आपल्या डोळ्यासमोर उगवून दिलेल्या भाज्या या चविष्ट व समाधान देणार्या व आरोग्यदायी असतात. ज्या आम्ही संजीवन औषध म्हणून उगवतो.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.