Insects Control: कीडनियंत्रण

तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल. 


catapillar-664250_1280.jpg

बागेत फवारणी, केव्हां, कधी..कशी.

निसर्गाला जपण्यासाठी आपण घरा, दारात फळा, फुलांची व भाजीपाल्याची बाग फुलवतो. रासायनिक खते व रासायनिक फवारणी सोडून देणे हे तर सर्वात्तम अशी निसर्गाची सेवा म्हटली पाहिजे. त्याएवजी आपण नैसर्गिक किडनियंकं फवारणे सर्वात्तम आहे. रासायनिक खतं ही कीडनाशक आहेत तर नैसर्गिक औषधे फवारणे हे कीडनियंत्रक म्हणून वापरता येतात.

कीड नियंत्रक व कीड नाशक यात दोन टोकांचे अंतर आहे. कीडनियंत्रण म्हणजे कीडीला पळवून लावणे, तिच्या प्रजनन चक्राच्या गतीत बाधा आणणे किंवा गती कमी करणे होय. तर कीड नाशक म्हणजे कीड संपवून टाकणे, मारून टाकणे, तिचा नाश करणे. कीडीचा नाश करणे एका अर्थाने जैवविवधतेत केवळ बाधाच नाही तर ती साखळीच तोडून टाकण्यासारखे आहे. जीव जीवस्य जीवनम् ही आपली संस्कृती आहे. ती रासायनिक फवारण्याने नष्ट होते. त्याने मातीतील सुक्ष्म जीवांणूचाही नाश होतो. व माती नापिक बनते.

तर कीड नियंत्रणात त्यांना ठराविक पिकावरून हाकलून लावले जाते. त्यांची घरे ही मोठ्या झाडांवर, जंगली झुडुपांवर आहे. त्यांना आमच्या बागेत लुडबुड करू नये म्हणून मारलेले उग्र वासाचे, गंधाचे द्रव म्हणजे कीड नियंत्रक होय. कीड ही उग्र गंधाला धोका समजते. उग्र गंधामुळे त्याच्या प्रजनन चक्रात बिघाड होतो. तर अशी उग्रवासाची कीड नियंत्रकं हो घरच्या घरी तयार करता येतात.

तर आपण कीड नियंत्रकांची माहिती घेवू या..

गोमुत्र हे उग्र, तिव्र गंधाचे नैसर्गिक द्रव्य आहे. जीवामृत हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले उच्च जीवाणू युक्त द्रावण आहे. दशपर्णी सुध्दा हे उग्र व विविध गंधाचे कडवट द्रावण आहे. या सार्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्याला धोका पोहचत नाही. जेवढा रासायनिक फवारणीमुळे पोहचतो.

आज रासायनिक कीडनाशकांची तिव्रता वाढत चाललीय पण कीड मरत नाही. उलट ती वाढत जाते. याचे कारण म्हणजे कीडींचे आयुष्य हे अल्पकाळ असते. पहिल्या पिढीने पचवलेले थोडेफार विष हे पुढील पिढी जास्त प्रमाणात पचवू लागते. म्हणूनच एन्डोसंल्फान, राऊंडअप सारखी इतर कीड व तण नाशकांची तिव्रता वाढवूनही कीड जात नाही. माणसं नुसती गंधाने मरतात पण कीड नाही. हे सत्य समोर आले आहे.

याच तंत्रात कीड नियंत्रक हे प्रभावी ठरतात. पण त्यातही विविधता असणं गरजेचं आहे. आपण फक्त बागेला एकच प्रकारचे कीड नियंत्रक वापरत असाल तर ते चूकीचे आहे. कारण काही काळ कीड त्याला प्रतिसाद देईलही पण पुन्हा ती वाढू लागेल. कारण आधीच्या पिढीने ते पचवायची क्षमता मिळवलेली असते. अशा वेळेस आपणास दर पंधरा दिवसांनी वेगवेगळी फवारणी केली पाहिजे.

  • गोमुत्र पाणी २) जीवामृत पाणी ३) चुना पाणी ४) हिंग पाणी ५) साधे पाणी ६) निमार्क फवारणी ७) निमतेल-साबणाचे मिश्त्रण किंवा फक्त साबण पाणी फवारणी (पालेभाजीवर करू नये) ८) लिंबू पाणी इत्यादी.

अशारितीने फवारणीत विविधता ठेवल्यास कीड ही नियंत्रणात, आटोक्यात राहते. ठराविक कालावधीनंतर ओळखू न येणारा गंध आल्याने त्या आपले मुक्कामाचे ठिकाण इतरत्र हलवतात.

जीवामृत फवारणी ही सुर्योद्य ते सुर्यास्त दरम्यान करावी कारण ते संजीवक म्हणून काम करत असते. त्यातील जीवाणूंची संख्या ही केवळ उन्हातच वाढते. तर फवारणी ही सायंकाळी ५-६ वाजेनंतर करावी. कारण त्याचा तिव्र गंध हा उन्हाच्या प्रखरतेत सुकून जात नाही किंवा त्याचे बाष्फीभवन होत नाही. तसेच बरीचसी कीड ही निशाचर असते म्हणजे रात्रीच्या वेळेस त्या अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात.

महत्वाचे म्हणजे फवारणी हेच केवळ बागेतील कीड नियंत्रणाचे तंत्र नाही हे आवर्जून लक्षात घ्या.. आपण अर्जिणावर किंवा असीडिटी वर औषध घेताहेत नि खाणं चालूच ठेवलं तर औषधाचा परिणाम होत नाही तसेच झाडाला पाणी जास्त होणं, पाण्याची योग्य वाफसा न होणारी घट्ट माती मुळाशी असणं, पाणी योग्य रित्या निचरा न होणं हे लक्षणेही लक्षात घेवून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.

तसेच कीड नियंत्रण हे करतांना कीड कोणती आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे. रसशोषक कीड, पानं खाणारी कीड (अळी) की विषाणूजन्य कीड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांचा ठराविक असा काळ नसतो. त्यामुळे वरील कीडनियंत्रक ही आलटून पालटून फवारल्यास कीडीच्या त्रासापासून मुक्तता होते. तसेच मित्र कीटक ओळखता आली पाहिजेत. मुंग्या, मधमाशा, गांडूळ, कंपोस्ट खतातील कीडे ही आपली मित्र आहे. काही मंडळी कीडमुक्त मातीत झाडे जगवतात. अशी माती ही कालातरांने निर्जीव व नापिक बनते. सुपिक माती बनवण्यासाठी निसर्गाला हजारो वर्ष लागलीत. ही माती सुंगधी व सुपिक बनण्यासाठी हजारो सुक्ष्म जीवांचे, कीडीचे खतात रूपंतार झालेले असते. हे विसरता कामा नये.

सारीच कामे माळ्याने करावीत असे मुळीच नाही. तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल.

लेख आवडल्यास नक्कीच शेअर, कंमेट व लाईक करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४

http://www.gacchivarchibaug.in

 

snail /Slug / Rowdy worm

गोगलगाय या उभयलिंगी असतात म्हणजे प्रजोत्पादनासाठी नर किंवा मादी अशी गरज नसते. त्यामुळे यांना बागेत त्यांचे अस्तित्व सहन करू नका. वेळीच त्यांचा बंदोबस्त केलेला बरा. बरं ह्या किड्याला फक्त भारद्वाज व कोंबड्या खातात इतर कोणताही पक्षी त्यांना चोच लावत नाही.


गोगलगाय एक उपद्रवी किडा…

#Snail ‘‘गोगल गाय नि पोटात पाय’’ अशी आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे. दिसायला गरीब असली तरी तिच्या बागेतीलअस्तित्वामुळे आपल्याला काही विषारी बाधा वगैरे होत नसली तरी ती बागेसाठी बरीच उपद्रवी आहे. त्यामुळेच वरील म्हण सार्थक ठरते.

आपण मोठ्या कष्टाने बाग फुलवतो. गच्चीवर भाजीपाला लावतो आणि ह्या गोगलगायी येऊन त्यावर डल्ला मारतात. जर संख्या जास्त झाली तर फ्लावर, कॅबेज यामध्ये छोट्या छोट्या गोगलगाई जाऊन निवास करतात व अशा वेळेस हा भाजीपाला निवडणं हा मोठा वैताग होतो.

ही सुरवातीला एक असली तर तिची प्रजोत्पादनाची क्षमता बरीच असल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. बरेचदा गोगलगायीचा प्रादुर्भाव हा नर्सरीतून आणलेल्या रोपांना, प्लास्टिक बॅगच्या आत मध्ये बाहेरच्या कडेला त्यांचं अस्तित्व आढळून येते. या गोगलगायी पान खाऊन, झाडांची खोडे कुरतडून त्यांचा नाश करतात. गोगलगाय या उभयलिंगी असतात म्हणजे प्रजोत्पादनासाठी नर किंवा मादी अशी गरज नसते. त्यामुळे यांना बागेत त्यांचे अस्तित्व सहन करू नका. वेळीच त्यांचा बंदोबस्त केलेला बरा. बरं ह्या किड्याला फक्त भारद्वाज व कोंबड्या खातात इतर कोणताही पक्षी त्यांना चोच लावत नाही. त्यामुळे त्यांची संख्या वाढतच जाते. तसेच यांचा बागेत फिरण्याचा काळ हा सायंकाळी किंवा रात्री पहाटेपर्यंत असतो. त्या पाण्यात राहत नाहीत. त्या ओलावा असेल तेथे राहतात. (पुढे वाचा)

उन्हाळ्यात किंवा कोरड्या वातावरणात या गोगलगायी काळ्या रंगाच्या होतात तर पावसाळ्यात ह्या पांढऱ्या, उजळ रंगाच्या दिसतात.खरंतर आपल्या बागेत गोगलगाय होणं म्हणजे बागेतलं कॅल्शियम कमी होण्याचं दर्शक आहे. अशा वेळेस बागेत चुना पाण्याची फवारणी करावी म्हणजे गोगलगाई ही नष्ट होतात. तसेच यांचा बंदोबस्त करण्यासाठी यांना वेचून फेकून देणे , त्यांना वेचून तंबाखूच्या पाण्यात किंवा तंबाखू पावडरच्या डब्यात टाकणं हा एक उपाय आहे पण हे बरेच जण किळसवाणी वेळखाऊ काम आहे. त्यापेक्षा दिसली गोगलगाय की त्यावर तंबाखू पावडर टाकणं हा एक उत्तम पर्याय आहे.

गोगलगायीला स्थानिक भाषेत शेम्बडी असे म्हणतात ती जिथून जाते तिथे चिकट स्राव सोडतात त्यामुळे ती किळसवाणी वाटते परंतु जपान मध्ये चेहऱ्यावर फिरवून फिरवणे ब्युटी थेरपी म्हणून वापरात आणली जाते.

तंबाखू पावडर झाडांच्या मुळ्या जवळ जरी पडली तरी त्याचा अपायकारक परिणाम होत नाही उलट तंबाखू पावडर मुळे झाडांना मूळकूज होणारा रोग नष्ट होतो. एकार्थाने तंबाखू पावडर ही झाडांसाठी बूस्टर म्हणून काम करते. आपल्याला हवी असल्यास ही पावडर आमच्याकडे उपलब्ध आहे 52/- किलो प्रमाणे मिळेल. कीड नियंत्रणासाठी वाचा…

http://www.gacchivarchibaug.in WTS / Telegram 9850569644

%d bloggers like this: