Swatch Bharat Abhiyan | स्वच्छ भारत अभियान |

खर तर या कामाची सुरवात सत्यमेव जयते या अमिरखान यांनी सादर केलेल्या कामातून सुरवात झाली आहे. या सार्या कामांची आमची एक घोषणा आहे. जी नेहमी आमच्या जागृती रथावर (टेम्पो) असते… “स्वच्छमेव जयते…. “


स्वच्छ भारत अभियानात आमचे योगदान…

गच्चीवरची बाग, नाशिक या पर्यावरणपुरक कामालानऊ वर्ष पूर्ण होत आहेत. मार्च २०२१ रोजी पूर्णवेळ कामाला सुरवात करून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहोत. भाजीपाल्याची बाग छंद म्हणून सुरवात केली होती. पण नंतर त्या छंदास  पर्यावरण संवदेनशिलता, शेती, निसर्ग संवर्धन, कचरा व्यवस्थापन याची जोड मिळत आता गच्चीवरची बागेने सामाजिक उद्मशिलेतेचा आकार घेतला आहे. यात आम्ही Grow, Guide, Build, Products sale & Services पाच सुत्राव्दारे व्यवसायात बळ भरत आहोत. खरं तर या कामात अनेक बागप्रेमीचे, पर्यावरणासाठी काम करणारी मंडळीचा म्हणजे किचन वेस्ट (कचरा व्यवस्थापन) व घरी, दारी, गच्चीवर, अंगणात फुलांची वा भाज्यांची बाग फुलवणार्या मंडळीचा फार मोठा वाटा आहे. तसेच हे काम बाल्यावस्थेत असतांना हे काम लोकांपर्यंत पोहचवण्यासी विविध माध्यमांनी तोलामोलाची मदत केली आहे. आजही करत आहेत. लोकसत्ता, सकाळ मधे वर्षभर लिखाण झाले आहे.

खर तर या कामाची सुरवात सत्यमेव जयते या अमिरखान यांनी सादर केलेल्या कामातून सुरवात झाली आहे. या सार्या कामांची आमची एक घोषणा आहे. जी नेहमी आमच्या जागृती रथावर (टेम्पो) असते… “स्वच्छमेव जयते…. “

गच्चीवरची बाग नाशिक या उद्मशिलतेचा आत्मा हा गारबेज टू गार्डन असा आहे. कचरा व्यवस्थापनातून बाग फुलवावी हा आमचा मोटो आहे. गच्चीवरची बाग फुलवणे म्हणजे रसायन मुक्त भाज्या पिकवणे यासाठी तर आहेच पण त्यासोबत लोकांनी घरातील, अंगणातील, कचरा व्यवस्थापन करावे या बद्दल कौशल्य शिकवत आहोत. आमचे काम हे स्वच्छ भारत अभियानाचे महत्वाचे अंग आहे जे आम्ही पुढे नेत आहोत असे आवर्जून सांगावेसे वाटते.

स्वच्छ भारत अभियानाचे काम आम्ही पुढील पाच सुत्राव्दारे कसे पुढे नेत आहोत हे सांगण्याचा हा प्रयत्न…

 Grow: या अंतर्गत आम्ही गच्चीवर बाग फुलवतांना विटांचे वाफे तयार केले जातात. त्यासाठी आम्ही ९० टक्के पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, वाळलेल्या फांद्या वापरल्या जातात. हे अगदी २०१३ पासून आम्ही करत आहोत. हे वापरले तर भाज्या भरपूर प्रमाणात व चिवष्ट लागतात. कुंड्या भरण्यासाठी हीच पध्दत वापरली जाते. माती कमी वापरल्यामुळे जंगल परिसरातून, शेतातून येणारी लाल माती ही कमी प्रमाणात ओरबाडली जाते. त्यामुळे मृदा संवर्धन घडते. त्यातून पूर येणे, धरणक्षेत्रात गाळ साचणे याचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे.

आम्ही देशीगायीचे पालन केले आहे. घर परिसरातून निर्माण होणारा भाजीपाल्याचा कचरा आम्हाला आणून देतात. याचे गायीला खाद्य म्हणून  वापर करतो. त्याचे बारा तासात शेणात रूंपातर होते. अशा प्रकारे आम्ही भाजीपाल्याचा कचरा निर्मुलन  करत आहोत. परिसर स्वच्छ ठेवण्याचेही काम करत आहोत.

तसेच मोठ्या प्रमाणात मिळणारा पालापोचोळ्याचा चुरा करतो त्याला BISHCOM ( Biomass Sheding Compost Materil ) बनवत आहोत.

Guide:  लोकांनी 90:10 असे प्रमाण वापरून कुंड्यामधे वाफ्यामधे बाग फुलवावी यासाठी विविध समाज माध्यमांव्दारे जागृती घडवत आहोत. मार्गदर्शन करत आहोत गेल्या आठ वर्षात आम्ही साडेसात लोकांपर्यंत पोहचलो आहोत. विविध समाज माध्यमे म्हणजे प्रिन्टं मीडिया म्हणजे विविध वर्तमान पत्रात लेख, सदर प्रकाशित केले आहेत. दृक श्राव्य माध्यमांवर बातम्या प्रसारित झाल्या आहेत.  तसेच संवदेनशील युट्यूबर्सनी आमच्या कामावर व्हिडीओ बनवले आहोत. शिवाय व्हाट्स अप,  इंस्टाग्राम, लिंकीन,  या मायक्रोब्लॉगिंग व कार्यरत आहोत. यू ट्यूबवर तर १०० व्हिडीओ अपलोड केले आहेत. तसेच घरी व शॉपवर येणार्या मंडळीना प्रत्यक्ष भेटून बोलून कचरा व्यवस्थापन, कंपोस्टींग विषयी माहिती देत आहोत. दूरध्वनीवरही माहिती मार्गदर्शन केले जाते.

Build: आम्ही भाज्यांसाठी ब्रिक्स बेड तयार करून देतो शिवाय कंपोस्टींग साठी लागणारे एरो  ब्रिक्स बॉक्स  हा कंपोस्टरही तयार करून देतो. ज्यामधे ९० टक्के पालापाचोळाचा वापर केला जातो.

Products sales & Services: भाजीपाला उत्पादनासाठी लागणारा जैविक काडी कचरा हा आम्ही सातपूर या औद्योगीक क्षेत्रातून गोळा करतो. कंपन्याबाहेरील पालापाचोळा, मंदीरातील, गणेश उत्सवात निर्मल संकलनात मिळाणार्या नारळ शेंड्या गोळा करतो. नाशिक शहरात जे काही बागबगीचा देखभालीचे काम करतो. त्यात मिळणारा पालापाचोळा हा गोळा करून त्याचे खत करतो. त्याचा मोठ्या मशीन मधे दळून त्यापासून  Bishcom : Potting Mix तयार केले आहे.

घरच्या किचन वेस्टचे कंपोस्टींग करण्यासाठी कंपोस्टींग कल्चर तयार केले. जे माठ, बादली यात वापरून कंपोस्टींगची गती पाचपटीने वाढवू शकता. तसेच कंपोस्टर्सची निर्मिती करतो आहोत. तसेच जसा कचरा तसे कंपोस्टर्स याची काही डेमो तयार केले आहेत. जे विविध ठिकाणी त्याची बांधणी केली आहे.

पालापाचोळा, कचरा जाळू नका यासाठी जागृती घडवत विटांचे हौद तयार केले आहे. घरच्या खरकट्या अन्नाचे व्यवस्थापन कसे करावे. त्याचा खत म्हणून कसा वापर करावा हे लोकांना शिकवत आहोत. थोडक्यात कचरा हा डंपिग ग्रांऊडवर न जावू देता तो घरीच त्याचे व्यवस्थापन करावे यासाठी विविध समाज माध्यमांवर जागृती घडवत आहोत.

घरी गाय पाळल्यामुळे शेण आम्ही उघड्यावर न टाकता त्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही दुर्गंधी, वास येत नाही. त्याचे ब्रिक्स बॉक्स मधे छोट्या जागेत व्यवस्थापन करतो. ज्याचा आदर्श हा म्हशीचा गोठा असलेल्या ठिकाणी करता येईल.

दखलः या कामाची दखल स्थानिक सातपूर विभागीय कार्यालयात घेण्यात आली आहे. सातपूर विभागीय कार्यालयात गच्चीवरची बाग व्दारे कंपोस्टींग या विषयावर एक दिवसीय व्याख्यान सादर करण्यात आले आहे. शिवाय वार्डनुसार स्वच्छता निरिक्षकासोबत कंपोस्टींग कसे करावे या बद्दल प्रभात भेटी व चर्चा केल्या आहेत. सच्छ भारत अभियानात दर वर्षी होणार्या सर्वेक्षणात आमच्या कामाला तज्ञ व्यक्तिकडून भेट दिली जाते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

www.gacchivarchibaug.in

Are u ready for environmental contribute to Ganesha_Visarjan?

आपण फक्त एवढच करायचं… ही पोस्ट अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहचवा… हॅश टॅग वापरा… चला होऊन जावू द्या .. एका छोटेसे शेअर बटन हळूच दाबून,  खर तर दणक्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण करूया…


Hallo Nashikkar, Are u ready for environmental contribute to Ganesha_Visarjan?नाशिककर आपण गणेश विसर्जनाच्या दिवसासाठी पर्यावरणीय सहभाग देण्यासाठी तयार आहात का…गणपती उत्सव म्हटला की जाम धमाल येते. सजावटीची आरास, गणेश मूर्त्यांची भव्यता, दिव्यता आणि विविधरूपे. १० दिवस कसे आनंदात निघून जातात ते कळतच नाही. मग कातरमनाचा विसर्जनाचा दिवसही उगावतो नि त्यानंतर उगावते तीच पहाट जिचं हिडीस चित्रण विविध माध्यमांव्दारे आपल्यापर्यंत पोहचतय.. होय.. तेच मला म्हणायचय… विसर्जनाच्या दिवशी झालेला कचर्याचा ढिग, मूर्त्यांची आपल्या हातून कळत न कळत झालेली विटबंना… का आपण हा उत्सव शिस्तबध्द सुऱेख, स्वच्छ नाही करू शकत… नक्कीच करू शकतो. पण घरातील प्रत्येकाने, प्रत्येक घरातील व्यक्तिने काही पर्यावरणीय सहभाग घेतला तर ना… चला तर मग एक शपथ घेवूया… या वर्षाचा गणपती विसर्जन हे स्वच्छ, शिस्तबध्द पणे पध्दतीने करूया या…हो मला तेच म्हणायचे… आपण काही गोष्टी पाळल्यातर आपला गणेश विसर्जन कार्यक्रम हा स्वच्छ व सुंदर होवू शकतो..

  • बाप्पासाठी प्रसाद म्हणून रोज ताजी फळे ठेवेन… आदल्या दिवसाची फळे प्रसाद म्हणून वाटून खावू.. (कारण पहिल्याच दिवशी प्लास्टिक पिशवीत ठेवलेली फळे ही दहा दिवसानंतर सडून त्याचा दूर्गंध येवू लागतो. ते सफाई कामगारांना त्याचा त्रास होतोच. शिवाय कुणाच्या पोटात पडले तर त्याचा आर्शिवाद मिळेलच की…)
  • कोरडा कचरा,, ओला कचरा वेगळा करेन… बाप्पाच्या विसर्जनासाठी येतांना आपल्या प्रशासनाने कचरा संकलनाची व्यवस्था केलेलीच असते. पण यातील ओलाकचरा ( नैसर्गिक कचरा) सुका कचरा ( कागद, काच, पत्रा, लोखंड ) हे वर्गीकरणच करून देईन. म्हणजे त्याचे व्यवस्थापन करण्यास सोपे जाईल.

आपण एवढ्या दोन गोष्टी प्रत्येकाने आपआपल्या पातळीवर केल्यातरी कचरा व्यवस्थापनासाठी खूप मोठी मदत होते. पण यात आणखी एक गोष्टीची माहिती देणे गरजेचे वाटते.मागील वर्षी गच्चीवरची बाग तर्फे बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी केवळ आणि केवळ नारळाच्या शेंड्या गोळ्या करण्याचे आम्ही काम केले होते. जवळपास तीन लोकांनी २ ट्रॅक्टर नारळाच्या शेंड्या गोळा केल्या होत्या.. खर्च फक्त २००० रू. नि शासनाचे ५००० नक्कीच वाचले. असो…तर गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक भाविकाजवळ जावून आम्ही नारळाच्या शेंड्या गोळ्या केल्या. आपण जर ठरवले तर य़ा वर्षी आम्ही भाविकाजवळ जावून शेंडी गोळा करून घेण्यापेक्षा विसर्जनाच्या ठिकाणी आमच्याकडे भाविकांनी फक्त नाशेंड्या आणून दिल्यातर नक्कीच उपयोग होईल. आपल्याला फक्त खालील दोन गोष्टी करावयाच्या आहेत.आपल्या घरी, सोसायटी येथे जे काही नारळाच्या शेंड्या निघतील त्या एका गोणीत गोळा करून ठेवा.. व विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाची आरती झाल्यावर नारळ फोडला जातो त्याच्याही शेंड्या आमच्या कडे सपूर्त करा. नारळाचा प्रसाद असेल तर तो गायीला गोग्रास म्हणून दिला जाईल.आम्ही या वेळेस १) गंगापूर गाव (अमरधाम) २) बालाजी धबधबा, ३) सोमेश्वर,४) नवश्या गणपती. व ५) पपया नर्सरीजवळील नंदीनी पूल. अशा पाच ठिकाणी शेंड्या संकलन होणार आहेत. तेथे माहितीचा बॅनर व आमचे प्रतिनिधी असतीलच ( १२ संप्टेबर २०१९ रोजी दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत)दुसर्या दिवशीपण आपण १३ संप्टेबर रोजी आमच्या मदतीसाठी येवू शकता… चला तर मग आपलं ठरलं असेल तर नक्की या…आपण फक्त एवढच करायचं… ही पोस्ट अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहचवा… हॅश टॅग वापरा… चला होऊन जावू द्या .. एका छोटेसे शेअर बटन हळूच दाबून, खर तर दणक्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण करूया…सविस्तर माहितीसाठी क्लीक करा…संकल्पना.. गच्चीवरची बाग, नाशिक.संदीप चव्हाण. 8087475242

Clean_ganesh_visarjan

कोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे.


#Clean_ganesh_visarjan #coir_collectionगणपती महाराष्ट्राचे अराध्य दैवत. समुद्राला भरती यावी नि उंचउंच लाटा किनार्यावरील लोकांना भिजवावं तसंच अगदी गणेश उत्सवाचे होते. गणेशभक्तांनी गणेशाच्या आगमनापर्यंत उत्साहात लाटामधे भक्तीरसानी न्हाऊन निघावं. खरं तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव आजही त्याच महत्व टिकवून आहे किंबहूना दिवसागणिक वाढत जाणार हे नक्कीच. कारण प्लॅट संस्कृतीत वर्षभर एकमेंकाना न भेटलेली मंडळी या दहा दिवासाच्या उत्सवामुळे भेटतात. चार गोष्टीची देवाण घेवाण होते.thumbnail.jpgकोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे. पण डावी बाजूची प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अनंत चतुर्दशीचा ऊतू जाणारा उत्साह, गर्दी, कचरा निर्मिती.. व दुसर्या दिवशी तो कचरा उचलण्यासाठी भिडलेले प्रशासन व सफाई बांधव…तर आपण या उत्सवाची डावी बाजू जी आहे तिची थोडी पण प्रत्येकाने काळजी घेतली तर आपला उत्सव पर्यावरण पुरक होऊ शकतो. गणेश विर्सजन हे पर्यावरण पुरक व्हावे म्हणून गच्चीवरची बाग, नाशिक तर्फे मागील वर्षी नारळाच्या शेंड्या संकलन करण्याचा कार्यक्रम केला होता.नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठावरील सोमेश्वर धबधबा येथे प्रचंड गर्दीने गणेश भक्त गणेश विसर्जन करण्यासाठी येतात. गणेशाची आरती झाली की नारळ फोडले जाते. बरेचदा अनवधानाने नारळशेंड्या तेथेच ठेवून ( काही मंडळी आमच्याकडे आणून देत होते) देत. आम्ही प्रत्येकाच्या पायाजवळून त्याचे संकलन करत होते. मागील वर्षी तीन लोकांनी मिळून २ ट्रॅक्टर एवढ्या नारळाच्या शेंड्या गोळ्या केल्या होतो. नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्याधिकार्यांनी आमचं कौतुकही केलं होते.अर्थातच या शेंड्या शहरी परसबाग फुलवण्यासाठी उपयोग करतो. ( नारळ शेंड्यांचा उपयोग हा भाजीपाल्याचे वाफे किंवा कुंड्यामध्ये तळाशी भरल्या जातात. कोकोपीठ वापरत नाही. कारण हे एकतर दक्षिण भारतातून येते. व त्याचा केवळ seedling साठी उपयोग होतो.)तर या वर्षी नारळ शेंड्या गोळ्या करण्याचा हा उपक्रम आम्ही या वेळेस पाच ठिकाणी व स्टेप फाऊंडेशन, नाशिक या संस्थेच्या मदतीने राबवणार आहोत.या वर्षी १२ संप्टेबंर या दिवशी अनंत चतुर्थी आहे. १२ सप्टेंबर व १३ सप्टेंबर १९ या दोनही दिवशी नारळ शेंड्या गोळा करण्यात येणार आहेत. नाशिक येथील गंगापूर रोडवर ४ ठिकाणी ( गंगापूर गावातील अमरधाम, बालाजी मंदीर येथील धबधबा, सोमेश्वर व नवश्या गणपती) व त्र्यंबक रोड वरील एका ठिकाणी ( पपया नर्सरी जवळील नंदीनी पूल) येथे नारळ शेंड्या जमा करण्यात येणार आहे. आम्हाला खात्री आहे. या पाच ठिकाणाहून जवळपास १० ट्रॅक्टर नारळ शेंड्या गोळ्या होतील.याठी श्रमदान, वस्तूदान, समयदान व अर्थदान व एकलव्याचा अंगठा ( जो सोशल मीडियावर प्रचार प्रसारासाठी हवाय) स्वंयसेवक, कचरा वेचक महिला, समन्वयक असतील त्यांच्या कडे आपण नारळ शेंड्या द्याव्यात ही विनंती आहे. त्यासाठी आपण एका वेगळ्या पिशवीत दहाही दिवसाच्या व विसर्जनाच्या दिवशी नारळ फोडल्यानंतरच्या शेंड्या जमा करून आमच्याकडे द्याव्यात. कृपया त्यात नासलेले नारळ, प्रसाद, खोबर्याचा प्रसाद, प्लास्टिक, निर्माल्य देवू नये. या सार्यासाठी म.न.पा.ची वेगळी घंटागाडी असणार आहे. आम्हाला खात्री आहे हा लेख व आमची विनंती नाशिक करांपर्यंत पोहचवाल.संस्थांची माहिती व दान देण्याविषयीचे सविस्तर पोस्टमध्ये दिलेच आहे. ति आपण काळजीने वाचावलच.. Share पण करा… सविस्तर माहितीची PDF file पहा…sandeep Chavan, http://www.gacchivarchibaug.in8087475242

%d bloggers like this: