घरच्या घरी पालक भाजी कशी पिकवाल?

.पण थोडं थांबा.. हे सारं तेव्हांच शक्य आहे, जेव्हा ही पालक भाजी जर घरी उगवलेली असेन तरच ही चव चाखता येईल. कारण बाजारातील पालक भाजी रसायनांवर उगवलेली असते. तिला अजिबात चव नसते. पाणचट भाजी म्हणजे काय त्याचा अस्सल नमुणा म्हणजे बाजारातील पालक भाजी..


पालक ही भाजी तशी सर्वांची आवडती असो वा नसो पण पालकाचे कुरकुरीत भजे तर चविला अप्रतिम. त्यात बाहेर पावसाच्या सरी व गार वातावरण असेल तर विचारायलाच नको.. आणि त्याचे पराठे तर तोंडाला पाणी येईल, तसेच त्याचे सुप, ज्यूस सुध्दा तयार करते येते. शिवाय सलाड म्हणूनही कच्ची पाने खाता येतात अशी चवदार भाजी खायला कोण नाही म्हणणार….पण थोडं थांबा.. हे सारं तेव्हांच शक्य आहे, जेव्हा ही पालक भाजी जर घरी उगवलेली असेन तरच ही चव चाखता येईल. कारण बाजारातील पालक भाजी रसायनांवर उगवलेली असते. तिला अजिबात चव नसते. पाणचट भाजी म्हणजे काय त्याचा अस्सल नमुणा म्हणजे बाजारातील पालक भाजी..

पालक भाजीत लोहाचे प्रमाण अधिक असते. तसेच नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीत जास्त मिठ टाकण्याची गरज नसते.

तर अशी पालक भाजी सहजतेने घरच्या घरी उगवता येते. पालक ही भाजी पालेभाजी या वर्गात मोडते.  पालकाचे शाश्त्रीय नाव स्पिनिसिया ओलेरोसिया असे आहे तर इंग्रजीत तिला Spinach असे म्हणतात. त्यामुळे पालक या भाजी वाढण्यास तास दोन तास उनाची गरज असते. पावसाच्या वातावरणात तर जाम फोफावते.

पालक या भाजीत अनेक प्रकार आहे. प्रदेशाच्या वातावरणानुसार त्याच्या आकारात, चवीत अशंता हा बदल झालेला असतो. तर पालक ही भाजी पालेभाजी या वर्गात येत असल्यामुळे त्यास चार इंच खोलीची कोणतीही कुंडी चालते. एवढेच काय तर घरी उपलब्ध असलेल्या कोल्ड्रींकच्या बाटल्यामधे सुध्दा पालक भाजी उगवता येते.

पालक भाजी ही बियाणांपासून उगवता येते. तसेच बाजारातून आणलेल्या पालक भाजीच्या देठांची आपण पूर्नलागवड केली तर त्यापासूनही पालकभाजी पिकवता येते.

आपण चौकोनी कुंडीत, वाफ्यात पालेभाजीच्या बिया लागवड करणार असाल तर दोन बोटांच्या चिमटीत बसतील एवढी दोन-तीन दाणे पेरभर ( एक इंच) खोलीत रूजवावे. या  बिया रूंजवतांना चार बोटांचे अंतर ठेवले तरी चालते. यात जर आपण शेफूच्या बिया लावल्या तर त्यांची वाढही जोमाने होते. पण आपण शितपेयाच्या बाटलीत लागवड करत असल्यास एकाच ठिकाणी दोन-तीन बियाणं लागवड करावी.

बरेचदा इच्छुक हे एका चौरस फुटात मुठ भर बियाणे पेरतात. त्यांची योग्य ती वाढ होत नाही. अशा रितीने लागवड केलेल्या पालक ही बेबी स्पिनच म्हणून ओळखली जाते.

बिया रूजवून येण्यास सात ते दहा दिवस लागतात. त्यानंतर त्यांची वाढ ही अगदीच संथ असते. पण एकदा का त्याने मूळ धरले की त्याची वाढ वेगाने होते. घरी आलेला पालक हा मुळासहित कधीही काढू नये. त्याची केवळे पाने कापावीत. अशा रितीने आपण पाच-सहा वेळेस खुडे करू शकतो. त्यांनंतर त्यास बियाणांसाठी जाड दांडी येते. आपणास बियाणं हवे असल्यास त्यास पोसू द्यावे. पण त्यापासून आलेले बियाणांपासून पुन्हा पालक येईलच याची खात्री नसते. त्यामुळे असा जाड दांडा अल्यास त्यास वेळीच काढून टाकावे. म्हणजे पुन्हा त्यास पाने येत राहतात. पालकाला आलेले बियाणं हे खूप नाजूक असते. उदाः  पुठ्ठया सारखे मऊ असते. त्यास पाणी अथवा दमट हवामानात ते मलूल होऊन जातात. अधिक पाण्याने अथवा दमट हवामानाने यांची अंकुरण क्षमता नष्ट पावते.

अशा पालकांच्या रोपांवर आपण जर गोलाकर प्लास्टिक बरणीचे आवरण दिल्यास यांची वाढ जलद होते खरी पण त्याची नैसर्गिक चव ही गमावून बसतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

सहश्त्रकातील धैय व गच्चीवरची बाग

Millennium Development Goal आणि गच्चीवरची बाग ( urban Farming ) ची उपयुक्ता नेमकी Local to Global कशी आहे हे वाचा…


Millennium-Development-and-Sustainable-Development-Goalsगारबेज टू गार्डन… Millennium Development Goal

संयुक्त राष्ट्र संघाने या सहस्त्राकात विकसीत व विसनशील देशांनी साध्य करावयाची काही मार्गदर्शक धैये ठरवून दिली होती. ज्याची मुदत २०१५ होती.  जी संघाच्या १९३ सदस्य देशांना स्वैच्छिक होती. खर तर त्यांनी १७ ध्यैयांना मान्यता दिली होती. पण यातील एकही ध्यैय एकाही राष्ट्राला काही अंशानेही गाठता आले नाही. त्याची कारणे शोधणे हा वेगळा विषय आहे. पण ही ध्यैय आता २०३० पर्य़ंत गाठण्याची ठरवले आहे. ( तो पर्यंत आपण बरेच काही गमावलेले असू) त्यातील ध्यैये व त्यांच्या अंतर्गत येणारी उदिष्टे जरा आतंरजाळ्यावर (Millennium Development Goal) शोधून पाहिली, त्याचा खोलात जाऊन अभ्यास केला तर त्याचा व आपण गारबेज टू गार्डन असलेली गच्चीवरची बाग या पर्यावरण पुरक संकल्पनेची गरज व महत्व सहज लक्षात येईल. आम्ही विश्वासाने सांगतो की गच्चीवरची बाग हा उपक्रमासारखे जागतिक पातळीवर चालत असलेले उपक्रम हे संयुक्त राष्ट्राने ठरवून दिलेल्या ध्यैये आणि उदिष्ट गाठण्यासाठी बर्याचं अंशी मदत करत आहे.

अर्थात ही सुरवात आहे. बर्याच देशांतील शहरात शहरी शेतीचे उपक्रम सुरू सुध्दा झाले आहेत. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेली या सहस्त्रकातील ध्यैये ही गच्चीवरची बाग अर्थात शहरीशेतीशी संलग्न आहेत. भूक निर्मुलन, चांगले आरोग्य, शुध्द पाणी आणि आरोग्यदायी स्वच्छता, नुतनी करण्याजोगी स्वस्त ऊर्जा, रोजगार, सर्क्युलर इकोनॉमी, शाश्वत शहरे व समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारी पूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, जमिनाचा शाश्वत उपयोग, सेव्ह सॉईल,  बहुविविधता (वनस्पती, कीड) आणि शाश्वत विकासासाठी जनभागीदारी… अशी ही उदिष्टे आहेत. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय भागात विभागली आहेत. आणि गच्चीवरची बाग उपक्रम या गोष्टींना परिघावरच नव्हे तर आतील गर्भापर्यंत स्पर्श करते हे आवर्जून सांगावेसे वाटते. विशेष म्हणजे ही लोक चळवळ होऊ घातली आहे.  राव न करी गाव करी ही आपल्याकडील प्रचलित म्हण आहे.

क्यूबा सारख्या देशावर जेव्हा आर्थिक निर्बंध आलीत तेव्हा तेथील लोकांनी आपलं अन्न हे दारं, खिडक्या, अंगणात उगवली होती. तसेच सध्या वॉश (water, sanitation & Health) नावाचा उपक्रम विकसन देशात राबवला जात आहे. त्यात पाणी , स्वच्छता व आरोग्य हे मुद्दे आहेत. वरील दोनही उदाःहरणातील ही सारी मुद्दे एकमेंकाशी संलग्न, एकमेकांवर परस्पर अवलंबून आहेत.  ही वरील सारी उदिष्टात आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी एका टिटवीने समुद्र आटवला  या म्हणी प्रमाणे एका उपक्रमाने जागतिक प्रश्नांना उत्तर ठरेल. हा खारीचा वाटा अर्थातच गारबेज टू गार्डन असा शहरी शेतीचा, गच्चीवरची बाग फुलवून आपण उचलू शकता.

प्रगतशील देशातील निवडक चौकात भाजीपाला लागवड करण्यात आला आहे. जो त्याची कुणीही काळजी घेऊ शकतो व त्यातील भाजीपाला घेवू शकतो. हे होईल का हो आपल्याकडे?  रस्त्याच्या दुभाजकात जैविक काडीकचरा सहजतेने जिरवता येऊ शकतो शिवाय त्यावर माती कमी लागेल. परदेशात कचरा हा प्रश्नच नाही आहे. कचरा हा उदयोग आहे. मोठी इंडस्ट्री आहे. पण त्याची सुरवात ही स्वंयशिस्तीने होते. जी व्यवस्था ठरवली जाते त्यात सुधारणा करण्याची नागरिकांत व  प्रशासनातही धमक असते. आपल्याकडे सर्वत्र इच्छेचाच अभाव असतो.

गच्चीवरची बाग ही संकल्पना खरं तर शहरासाठी उपयुक्त आहेत. गारबेज टू गार्डेन हा त्याचा आत्मा आहेच. कचरा ही अशी गोष्ट आहे जी सर्वोतोपरी वापरात आणली तर त्याचं सोनं करता येऊ शकतं तर दुर्लेक्ष झालं तर त्याचा राक्षसही होऊ शकतो. फक्त त्याला वापरावयाचे कसे याचे तंत्र, त्याची वैज्ञानिक मांडणी, महत्व लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. मुळातच एकादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला नेहमीच अनुकुल वातावरण, परिस्थिती असेन असे कधीच नसते. ते तसे असते तर त्या साध्यात आपल्याला मजा, गंमत व शिकायला मिळणारच नाही. जितकी परिस्थतीती प्रतिकुल तितक्या मानवी विचाराच्या, कल्पनेच्या, कृतीच्या कक्षा विस्तारत जातात. निसर्ग तर प्रतिकूल परिस्थीतही फुलण्यास तयार असतो. येथील प्रत्येक गोष्ट मग ती दृष्य असो अदृष्य असो ती पंचमहाभूताशी म्हणजे पृथ्वी (जमीन),आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश येथे सातत्याने सुक्ष्म बदल घडताहेत. प्रत्येक कण नव्याने घडतो, बिघडतो. यामागील या महाभूतांच्या अस्तित्वामुळेच तर जीव जगला आहे व जगणार आहे. हे निसर्गाचे नैसर्गिकरित्या अध्यात्म आपल्यात रूजलं तरच मानवी मनोविकास होणार आहे नाहीतर वैज्ञानिक दृष्ट्या प्रगतशील असू मन मनाने आपण अजूनही अप्रगत काळात आहोत असे समजून घेतले पाहिजे.

या सहस्त्रकाची धैये गाठणे हे फक्त सरकारचे काम नाही. ते प्रत्येक नागरिकाचे आहे. बस त्यासाठी रोज आपला थोडासा वेळ देणं गरजेचे आहे. इच्छा तेथे मार्ग असतो. आपल्या स्थानिक प्रयत्नांनी जगाला भेडसवणारे प्रश्न सुटत असतील तर नक्कीच त्यात  सहभाग घेतला पाहिजे. परदेशात जागतिक परसबाग दिन साजरा केला जातो. (World Kitchen Garden Day) प्रत्येक वर्षाच्या ऑगस्ट महिण्यातील चोथ्या रविवारी,  त्यांच्याकडे परसबाग फुलवणे हा राष्ट्रीय कार्यक्रम असतो. आपल्याकडे पोलीओ डोस हा जसा असतो तसा… प्रत्येक शाळेत, वाडी- वस्तीवर सोनखताव्दारे परसबाग फुलवली जाते. याचा अनुभव झिम्बॉब्वे या देशात प्रत्यक्ष राहून मला अभ्यासण्याची संधी मिळाली होती.  आपल्याकडेही प्रत्येक अंगणवाडी, शाळा येथील मोकळ्याजागेत परसबाग तयार कराव्यात असे फक्त म्हटलं आहे. नाशिक मधील आनंद निकेतन शाळा या विषयाकडे गांभीर्याने पाहत असून मुलांना शिकतं करण्याचा प्रयत्न करत आहे. ३६० अंशाच्या व्याप्तीव्दारे  सर्वस्पर्शी असलेली ही संकल्पना आपण लक्षात घेतली तर  आपण नाशिककर खूप मोठ्या बदलाचे भागीदार व साक्षीदार होऊ यात शंका नाही.

यासाठी गच्चीवरची बाग गेल्या दहा वर्षापासून Grow, Guide, Build, Products, Sale & Services व्दारे काम करत आहे. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

टीप ः सदर लेख सकाळ नाशिक व्दारे हिरवे स्वप्न या सदरात प्रकाशीत झालेल्या लेख मालिकेतील एक लेख आहे.

Return Gift to nature – Lockdown

आताच हालचाल करूया… कारण पावसाळा तोंडावर आला आहे. निसर्गाने दिलेले दान.. त्याच उतराई होईया…


4fd_0लॉकडाऊनच्या काळात आपल्या हाती बराचसा वेळ असण्याची शक्यता आहे. या काळात काय करायचे हे ठरलेले असेलही व त्या बरहुकुम आपण आपला दिवसाचा उपयोग करत असू या बद्दल शंकाच नाही.

मला या लेखाव्दारे आपले लक्ष विशेष मुद्याकडे वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे रोपवाटीका…

कारण पावसाळा जवळ येतो आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही दर वर्षाप्रमाणे करावी लागणार आहेत. वृक्षलागवडीचा कार्यक्रम माहे डिसेंबर जानेवारी पर्यंत चालतो. पण पावसाळा हा उत्तम असतो. तर लॉकडाऊनच्या काळात सरकारी व खाजगी सार्याच रोपवाटीका बंद असणार आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येकालाच आपल्या गार्डेनचा काही भाग झाडांच्या नवीन रोपांसाठी देणे गरजेचे आहे. आता त्यासाठी काय काय करणे व कोणत्या टप्प्यावर करणे गरजेचे आहे हे लक्षात घेवूया..

 

  • बियाणं किंवा रोपाची यादी
  • हुंडी कशी बनवावी
  • त्याचे संगोपन कसे करावे.
  • पाणी कसे द्यावे.
  • समन्वय

 

  • बियाणं किंवा रोपाची यादीः आवळा, आंबा, सिताफळ, बेहडा, उंबर, पिपंळ, वड, चिंच, बोर, विलायती चिंच, रूद्राक्ष, निंब, कडीपत्ता, अशोक, जांभूळ, बेल, पेरू, लिंबू , पपई , चंदन, बकुळ, पारिजातक. पांगरा, पळस, कंदब, सप्तपर्णी,सोनचाफा अशी अनेक झाडाची यादी करता येईल. काही बियांपासून रूजतात तर दूधाळ झाडे ही फांद्यापासून रूजतात. तसेच आपल्या परिसरात काही झाडे असल्यास त्यांच्या बियाणं गोळा करून त्यांचीही रोपवाटीका तयार करू शकतात.
  • बिज रोपनः आपल्या कडे फळे असल्यास त्याच्या बियाणं काढून, पाण्याने स्वच्छ धुवा, त्यास सावलीत वाळवा. त्यातील सशक्त, जड, आकाराने मोठ्या, भरीव बियांचा निवड करा. त्यांना दिवसभर पाण्यात भिजवा रात्री त्याचे प्लास्टिक पिशवीत (हुंडी) रोपन करा.
  • हुंडी कशी बनवावी. काळ्या रंगाची प्लास्टिक बॅग असल्यास उत्तम. उपलब्ध नसल्यास दुधाच्या पिशव्या पण चालतील हे ही नसेल तर पाणी पिण्याच्या बाटल्या, डब्बे, काहीही चालेल. यास तळाशी छिद्र पाडावेत. त्यात नारळाच्या शेड्या, पालापाचोळा थोडा टाकावा. त्यात माती, खत टाकून भरून घ्यावेत. त्यास थोडे आपटून घ्यावे. म्हणजे माती घट्ट बसेल.
  • त्याचे संगोपन कसे करावेः बिज किती मोठं आहे या नुसार त्यास त्याच्या आकाराच्या ३ पट खाली रूजवा. तर दुधाळ फांद्या असतील तर त्यास ती इंच खोल, फांदीला तिरपा छाट देवून रूजवाव्यात. मातीच्या वर ही ३ इंचच असावी. अधिक उंची असल्यास वाळतात. रोज पाणी द्या. उष्ण वारा लागत असल्यास आडोसा तयार करा. सावली तयार करा.
  • पाणी कसे द्यावेः गरजेनुसार दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्यास नक्कीच द्यावी. पाणी हे झारी पध्दतीने द्यावेत. म्हणजे हुंडीतील माती पाण्याच्या वेग व दाबाने बाहेर फेकली जाणार नाही. कारण बरेचदा बिजही माती बरोबर बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते.

 

  • समन्वय आपण रोपवाटीका वाढवाता आहात. त्यात कशा कशाची झाडे आहेत. त्याची संख्या किती आहे. त्याची वाढ किती झाली आहे. याची माहीती आपल्या समाज माध्यमावरील गटात पोहचवा. किंवा आपल्या परिसरातील वृक्षप्रेमी असलेल्या व्यक्तिच्या किंवा गटाच्या संपर्कात रहा. म्हणजे आपण उगवलेली रोपे ही त्यांना उपयोगात येतील. तसेच शाळामधे संपर्क करू शकता.

 

तसेच येणार्या काळात जागा, हवामान उपलब्ध असतील पण रोपे उपलब्ध राहणार नाही असे होऊ नये म्हणून वरील झाडांव्यतिरिक्त ही बागेतील झुडुपांची रोपे तयार करू शकतात. व त्याची देवाण घेवाण करता येऊ शकते. कारण काही काळ तरी हे नर्सरीत उपलब्ध होणार नाहीत किंवा महाग होण्याची शक्यता असेल.  हे सारे काम निसर्गाने आपल्यासाठी सुदृढ आयुष्यासाठी दिलेल्या भेटीची छोटी परतफेड करावयाची आहे. असं हे निसर्ग धन त्याच त्याला परत करूया… कारण आपल्याकडे काहीना काही वेळ आहे.

 

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच शेअर करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644, 8087475242

 

%d bloggers like this: