रासायनिक भाज्यांचे सेवनाने शरिराची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि त्यामागे विविध आजार पिच्छा पुरवतात. या रासायनिक भाज्या रोजच्या जेवणात टाळावयाच्या असतील आपल्याला खालील प गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे. तरच आपले खाणं हे विषापासून दूर ठेवू शकतो.
1. रेड्यूसी फ्री भाज्या विकत घ्या..रेड्यूसी फ्री म्हणजे शेती क्षेत्रात भाजीपाला उत्पादन वाढीसाठी जे काही रासायनिक खते, कीडनाशक वापरली जातात त्यांच्या अठ्ठेचाळीस तासाने भाजीपाला हा हा बाजारात विक्रीला आणला जावा असे आहे. रसायने फवारल्या नंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासाने रसायनांचा प्रभाव हा कमी होतो. पर्यायाने लोक आपली भाजी कमीत कमी रसायने रसायने सेवन करतील असा हेतू असतो. पण कोणताही शेतकरी अठ्ठेचाळीस तास वाट पाहत नाही. कारण रासायनिक खते व फवारणीने उत्पादीत भाजीपाला हा वेगाने खराब होतो. सडतो. तसेच ताज्या भाज्यांना बाजारात मागणी असते किंवा त्यास लांबचा प्रवास करून इतर बाजारपेठेत पोहचावयाचे असते. त्यामुळे त्यास आदल्या दिवशी रसायनांची फवारणी करून भाजीपाला विकला जातो. पर्यायाने आपण एका अर्थाने अठ्ठेचाळीस तासात आपण विषारी अन्न पोटात गेलेले असते. त्यामुळे हा पर्याय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. जितका शेतकरी छोटा तितके रसायनांचा वापर कमी असे काही लक्षात घेवून स्थानिक शेतकर्याकडून भाज्या विकत घेवू शकतो. पण त्याचीही खात्री नसते. हे लक्षात घेतले पाहिजे.
(पुढे वाचा)
2. विषमुक्त भाज्याः तुम्हाला रोजच्या आहारात विषमुक्त भाज्यांची गरज असल्यास रसायनांचा वापर न करणारा, नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी असेन तर त्याच्या कडून विषमुक्त भाज्या तुम्ही विकत घेवू शकता. पण त्यासाठी आपल्याला त्यास दत्तक घेणे गरजेचे आहे. थोडक्यात आपण त्यांच्या कौटुंबिक गरजा भागवणे व त्या बदल्यात रसायनमुक्त भाज्या व अन्नधान्य विकत घेणे असा होतो. किंवा अशा खात्रीलायक शेतकर्याकडून जास्त भावात भाज्या विकत घेता येतात.
3. शिळ्या भाज्या विकत घेणे… मी माझ्या एका सन्यांशी मित्रासोबत भाजी विकत घेण्यासाठी गेलो होतो. त्यावर गच्चीवरची भाजीपाला निर्मिती करणारी बाग हे काम चालू केले नव्हते. तो सन्यांशी मित्र शिळ्याभाज्या विकत घेत असे. मी त्याला ताज्या भाज्यांचे महत्व सांगतीले. तर त्याने सांगीतले की या भाज्या रसायनांवर उगवलेल्या असल्या तरी त्या शिळ्या झाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण कमीत कमी रसायन पोटात घेतो हे त्याने समजावून सांगतीले. तर शक्य असल्यास भाज्या शिळ्या विकत घ्या किंवा शिळ्या करून खाव्यात. उदाः फळभाज्या या २-३ दिवस टिकतात. आणि अनुभवाने सांगतो. अशा भाज्या चवीला ताज्या भाज्यांपेक्षा चिवष्ट लागतात. (पुढे वाचा)
4. रंग, आकार, कीड लागलेल्या भाज्या…. बाजारातील ताज्या भाज्या घेण्याची वेळ आली तर रसायनांचा प्रभाव कमी असलेल्या भाज्या लगेच ओळखू य़ेतात. त्यांचा रंग हा काहीस उतरलेला निस्तेज असतो. मळकट असतो. तर त्यांचा आकार लहान असतो. तसेच त्या काही कोनात वाकलेल्या असतात. उदाः कारली, दूधी भोपळा हा आकाराने छोटा असतो. तर काही अंशी वाकडी झालेली असतात. बरेचदा त्याला कीड लागलेली असते. अशा भाज्यांचा कीडीचा भाग काढून टाकून आपण चांगल्या भाज्यांची भाजी करू शकतो. गवार, वांगी, गिलके, दोडके तसेच पाले भाज्यांमधे छोट्या पानांची, कमी उंचीची भाजी विकत घेवू शकतो. एकदा थायलंड येथे गेलो असता. तेथे कळाले की तेथे कीड,अळी पडलेला फूलकोबी लवकर विकला जातो.. काय कारण असेल… या विचार तुम्ही करा… (उत्तर नाही मिळाले तर फोन करा 9850569644)
5. वाळवलेल्या भाज्या … ताज्या भाज्यांपेक्षा वाळवलेल्या भाज्या या नेहमीच चांगल्या. कारण त्यात विषारी घटक हे बर्यांच अंशी कमी होत जातात. शिवाय त्या बाराही महिने कधीही खाता येतात. तसेच त्या निवडलेल्या व स्वच्छ ही असतात. भाज्या तुम्ही घरीसुध्दा सोप्या पध्दतीने वाळवू शकता. ( पुढे वाचा)
6. सर्वात चांगला व खात्रीलायक उपाय म्हणजे.. घरीच भाज्या पिकवा..घरी पिकवलेल्या भाज्या या आपल्या डोळ्यासमोर उगवलेल्या असतात. अशा भाजीपाला बागेचे मातृत्व आपण स्विकारल्यामुळे आपल्या माहिती असते की आपण त्यात रासायनिक खते, औषधे टाकली आहेत की नाही. त्याला वाढीसाठी लागलेला वेळ आपल्याला माहित असतो. त्यामुळे आज तरी घरीच पिकवलेल्या भाज्यां या सर्वात खात्रीलायक आहेत. आणि आपण थोडी कष्टाची तयारी दाखवल्यास त्या घरच्या घरी उगवणे हे सहज सोपे आहे.
रताळी (sweet Potato) हे भारतीय उपवासातील महत्वाचे सात्विक पदार्थ आहे. उपवासात योग्य ते पोषण मुल्य मिळावे म्हणून यास महत्वाचे स्थान दिले गेले आहे. तंतुयुक्त पदार्थ (Fiber rich) म्हणून त्यास महत्व स्थान तर आहेच. पण इतरही त्याचे महत्वाचे पोषणमुल्य आहेत. पिळदार, काटक शरीर बनण्यासाठी रताळीचे सेवन गरजेचे आहे.
तसेच ते मेंदूच्या कार्यप्रणालीला गतीशील बनवण्याचे काम करते. आणि महत्वाचे म्हणजे ते प्रतिकार शक्ती वाढवण्यात मद्तगार ठरते. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या सेवनाने वजनही कमी करण्यास मदत करते कारण ते सकाळी नाष्टाला कच्चे खाल्ले तरी दिवसभर भूक लागण्याची खूप कमी शक्यता असते.
माझा अनुभव सांगतो. सकाळी नाष्टा करायला वेळ नसतो. तसेच दुपारच्या जेवणाची सोय नसेल तेव्हा कच्चे रताळी सोबत घेवून जायचे. भूक लागली की रताळी खायचो वर पाणी पिले की दिवसभर भूकेची आठवण यायची नाही. त्याचे पदार्थः यास बटाटे सारखे गोल काप करून विषमुक्त गुळात उकडून खाता येतात. त्याचा गुळ टाकून शिरा करता येतो. किस करता येतो.
रताळी ही दोन प्रकारचे असतात. एकाचे पान हे हाताच्या पंजासारखे दिसतात. पण यात सुध्दा दोन रंगाचे रताळी असतात. एक पांढरट गुलाबी रंगाचे व दुसरे अगदी गडद राणी रंगाचे असते. सलाड म्हणून त्याचा जेवणात समावेश करू शकतात. तसेच त्यास वाफ देवून ही त्याच्या चकल्या खाता येतात.
रताळीच्या पानानुसार दुसरा प्रकार म्हणजे हे पान गोलाकार असते. त्याची रताळी सुध्दा गडद राणी रंगाचे असते.
लागवड कशी करावी…
पध्दत १… आपण बटाटेचे काप करतो तसे गोल आकारात पण चार चार इंचाचे काप केल्यास त्यास मातीखाली ३-४ इंच दाबावे. त्यास अंकूर फूटतात. मातीच्या आच्छादनासाठी Ground Covering महत्वाचे काम करते.
पध्दत २.. आपल्याकडे रताळीचा वेल असल्यास त्याच्या २-३ पेरांच्या काड्या कापून त्यात मातीत आडव्या दिशेने रूजवाव्यात त्यास अंकूर फूटतात.
रताळी हे चार महिण्याचे पिक आहे. यास कंपोस्टखत, शेणखत दिल्यास त्याची वाढ भरपूर प्रमाणात होते.
कुंडी किंवा वाफा कसा भरावा..
९ इंच कुंडीत, वाफ्याच्या तळाशी ३ इंच नारळाच्या शेंड्या वापराव्यात. ६ इंच पालापाचोळा वापरावा. नारळ शेंड्या नसल्यास ९ इंच पा.पा. वापरला तरी चालेल. त्यात वरून २ इंच माती, खत वापरावे. रताळीला गादीवाफा किंवा वाफसा येणारी भुशभुशीत पोषण माती गरजेची असते.
ही काळजी घ्या… त्यास १०-१२ इंच कुंडीत, ग्रो बॅग्जस (आमच्या कडे उपलब्ध आहेत) मधे लागवड करता येते. पण कुंडी किंवा बॅग गच्चीवरची बागच्या तंत्राप्रमाणे भरलेली असावी. त्यास येथे योग्य त्या पोषणामुळे वाढीस वाव असल्यास त्याचा वेल म्हणूनही पसरवता येतो. पण जमीन असल्यास उत्तम.. कारण त्याच्या नवीन मुळाना रताळी येतात. थोडक्यात त्याचे उत्पादन वाढते.
रताळीच्या पानांचे मुटकुळे व वड्या… कोंथबिरीच्या जशा वड्या करतात. तशा प्रकारे रताळीच्या पानांचे वडया ही चवीला छान लागतात. तसेच त्याच पिठाचे मुटकुळे वाफून घेतल्यास त्याचेही सेवन करता येते.
I am Feeling proud of this forum for give a chance to interact with other city farmers.
u can listen my interview …
Agriculture Information connects growers, buyers, and experts.
We are one of the earliest (founded in 2000) agriculture website on the internet. We have more than 300,000 members using this platform.
The information on this website is also available as print magazines in various languages.
Our discussion forums have more than 100,000 individuals threads and posts on thousands of agriculture-related topics.
We conduct online meetings and discussions with successful (and not successful!) agriculture entrepreneurs, farmers and business people. They talk about their experiences. You can also join these meetings from wherever you are and participate in the discussions.
We are one of the most respected, independent agriculture media platform in India today. We are pro-farmer, not funded by any university or corporate with a vested interest. We carry interviews and articles with a wide range of people ranging from actual growers, entrepreneurs, academic experts, professionals and senior political leaders.
Agriculture Information is headed by Kartik Isvarmurti, a graduate of Delhi School of Economics and Oxford University, UK.
You must be logged in to post a comment.