ऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…


ऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…

ऑक्टोबर महिना हा बागेसाठी फार महत्वाचा आहे. कारण ऑक्टोबर महिना हा पावसाळा ऋतू संपून हिवाळा ऋतूची सुरवात होणार असते. हिवाळा हा पुढे फेब्रुवारी पर्यंत असतो. या काळात वातावरणातील तापमान बर्यापैकी खाली आलेले असते. या काळात नव्याने बिया रूजणे जरा अवघड असते. त्यासाठी निसर्गाने पावसाळी हवामानानंतर बिज अकुंरण्यासाठी ऑक्टोबर हिटची तरतूद केली आहे. असो..

तर या ऑक्टोबर महिण्यात पुढील प्रमाणे कामे करणे फार गरजेचे आहे.

माती वाळवून घ्या… पावसाळ्यात सतंतधार पावसामुळे म्हणा किंवा रिपरिपीमुळे माती घट्ट झालेली असते. काही भाजीपाला आता पूर्ण तयार होऊन निघालेला असतो. अर्थात काही कुंड्या, वाफ्यातील जागा रिकामी झालेली असते. अशा वेळेस नव्याने बिया लावण्यासाठी किंवा रोपे लावण्यासाठी माती ही वाळलेली असणे फार गरजेचे आहे. माती सतत ओली असल्यामुळे त्यात विषाणूची, मातीतील किडीची वाढ झालेली असते. ही वेळीच नियंत्रण होण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे. माती वाळवण्यामुळे मातीत किड, विषाणू हे मरून जातात. त्यांचे जैवखत हे मातीत मिसळते व त्यांचे खत हे पुढील झाडांसाठी उपयुक्त ठरते. तसेच माती वाळवल्यामुळे बियाणं रूजवण्यासाठी पोषक जागा तयार होते. ओल्यामातीमुळे बियाणं हे रूजत नाही. कारण त्यात काही हानीकारक तत्वांची, रसायनांची गंधाची वाढ झालेली असते. त्यामुळे बियाणें शभंर टक्के रूजण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे.

Advertisements

कोणत्या बियाणे लागवड कराल.. या महिण्यात सर्वच प्रकारच्या बियाण रूजण्यासाठी पोषक असते. तसेच पालक, धने, भेंडी, गवार, कारले या सारख्या नाजूक बियांसाठी ऑक्टोबर हिट पोषक असते. तसेच काकडी, ढेमसे, एक्सोटिक्स भाज्यांची बियाणे व रोपे रूजण्यासाठी पोषक आहेत.

रिपॉंटींग साठी योग्य काळः ऑक्टोबर नंतर तुम्ही जानेवारी पर्यंत कुठल्याही काळात जून्या झाडांची माती बदलावयाची असल्यास थोडक्यात रिपॉटींग साठी योग्य काळ असतो. कारण वातावरणातील गारव्यामुळे रिपॉटींग केलेल्या झाडांच्या मुळांना शॉक बसत नाही. थोडक्यात झाडे मरत नाही.

ही काळजी घ्या.. परतीचा पाऊस लांबला असेल अर्थात तो येत असेन तर थोडा धिऱ धरा. कारण वातावरणात उष्मा वाढलेला असला तरी येणार्या पावसामुळे बियाणे हे सडू शकते. तर कधी कधी ऊन पावसामुळे बियाणे जोमानेही रूजून येते. हे प्रयोग करत राहिले पाहिजे. एकाद्या वेळेस अपयश आले तर माघार घेवू नका.  पुन्हा पुन्हा बियाणे लागवड करत रहावी.

झाडांची कंटीग करावीः उन्हाळ्यात येणार्या फुलांच्या झाडांची आता कंटीग करण्याचा काळ योग्य आहे. वाढल्या तापमानामुळे त्यास जोमाने फुटवा येतो. उदाः मोगरा, गुलाब, कंदवर्गीय फुलेझाडे. इ. तसेच मोठ्या झाडांची हलकी छाटणी करणे गरजेचे असते.

आगावू खताची तरतूद आधीच करून ठेवाः पुढील काही महिण्यात झाडांची अन्न बनवण्याची प्रक्रिया ही मंदावलेली असते. अशा वेळेस त्यांना वरखतातून पोषक द्रव्ये, खतं देणे गरजेचे असते. अशा वेळेस हाताशी उत्तम प्रकारे शेणखत असणे गरजेचे असते.

संदीप चव्हाण, गच्चीवची बाग, नाशिक. 9850569644

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |

चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.


चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

Climbers Fruits


वेगवर्गीय भाज्या ..

IMG_20190324_225337_207.jpg

 

 

 

 

 

 

 

भारतीय उपखंडात येणार्या सर्व प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या उत्तम प्रकारे घेवू शकतो. वेलवर्गात सर्वात जास्त फळभाज्यांचे प्रकार उपलब्ध तर आहेतच. पण गच्चीवर वाफे  पध्दतीत वेलवर्गीय भाज्या जोमाने फोफावतात व  येतात सुध्दा. शिवाय यांची संख्याने खंडीने भरावी एवढे उत्पन्न असते. बरेचदा तज्ञ डॉक्टर आपल्याला वेलर्गीय भाज्या खाण्याविषयी सल्ले देतात. या प्रकारात कारले, दुधी भोपळे, चक्की, डांगर (लाल भोपळा) पडवळ, तोंडली, काकडी, गिलके (घोसाळी) दोडके, वालाचे विविध प्रकार, वटाणे, हे उत्तम प्रकारे येतात. वेल वर्गीयांना चार इंच खोलीची जागा चालते पण ति लांबलचक असणे गरजेचे आहे. म्हणून गच्चीवर वाफे करणे गरजेचे असते. 

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Six steps to Avoid Poisions vegetable

रोजच्या आहारातील रासायनिक भाज्यां टाळावयाच्या असतील तर या सहा उपाय वाचा.. आपल्याला नक्कीच जमण्यासारखे आहे.


सहाप्रकारे टाळू शकता विषारी भाज्यांचे सेवन...

Sandeep Chavan with Home grow vegetable.
Sandeep Chavan with home Grow vegetable

रासायनिक भाज्यांचे सेवनाने शरिराची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि त्यामागे विविध आजार पिच्छा पुरवतात. या रासायनिक भाज्या रोजच्या जेवणात टाळावयाच्या असतील आपल्याला खालील प गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे. तरच आपले खाणं हे विषापासून दूर ठेवू शकतो.

1. रेड्यूसी फ्री भाज्या विकत घ्या.. रेड्यूसी फ्री म्हणजे शेती क्षेत्रात भाजीपाला उत्पादन वाढीसाठी जे काही रासायनिक खते, कीडनाशक वापरली जातात त्यांच्या अठ्ठेचाळीस तासाने भाजीपाला हा हा बाजारात विक्रीला आणला जावा असे आहे. रसायने फवारल्या नंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासाने रसायनांचा प्रभाव हा कमी होतो. पर्यायाने लोक आपली भाजी कमीत कमी रसायने रसायने सेवन करतील असा हेतू असतो. पण कोणताही शेतकरी अठ्ठेचाळीस तास वाट पाहत नाही. कारण रासायनिक खते व फवारणीने उत्पादीत भाजीपाला हा वेगाने खराब होतो. सडतो. तसेच ताज्या भाज्यांना बाजारात मागणी असते किंवा त्यास लांबचा प्रवास करून इतर बाजारपेठेत पोहचावयाचे असते. त्यामुळे त्यास आदल्या दिवशी रसायनांची फवारणी करून भाजीपाला विकला जातो. पर्यायाने आपण एका अर्थाने अठ्ठेचाळीस तासात आपण विषारी अन्न पोटात गेलेले असते. त्यामुळे हा पर्याय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. जितका शेतकरी छोटा तितके रसायनांचा वापर कमी असे काही लक्षात घेवून स्थानिक शेतकर्याकडून भाज्या विकत घेवू शकतो. पण त्याचीही खात्री नसते. हे लक्षात घेतले पाहिजे.

(पुढे वाचा) 

2. विषमुक्त भाज्याः तुम्हाला रोजच्या आहारात विषमुक्त भाज्यांची गरज असल्यास रसायनांचा वापर न करणारा, नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी असेन तर त्याच्या कडून विषमुक्त भाज्या तुम्ही विकत घेवू शकता. पण त्यासाठी आपल्याला त्यास दत्तक घेणे गरजेचे आहे. थोडक्यात आपण त्यांच्या कौटुंबिक गरजा भागवणे व त्या बदल्यात रसायनमुक्त भाज्या व अन्नधान्य विकत घेणे असा होतो. किंवा अशा खात्रीलायक शेतकर्याकडून जास्त भावात भाज्या विकत घेता येतात.

3. शिळ्या भाज्या विकत घेणे… मी माझ्या एका सन्यांशी मित्रासोबत भाजी विकत घेण्यासाठी गेलो होतो. त्यावर गच्चीवरची भाजीपाला निर्मिती करणारी बाग हे काम चालू केले नव्हते. तो सन्यांशी मित्र शिळ्याभाज्या विकत घेत असे. मी त्याला ताज्या भाज्यांचे महत्व सांगतीले. तर त्याने सांगीतले की या भाज्या रसायनांवर उगवलेल्या असल्या तरी त्या शिळ्या झाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण कमीत कमी रसायन पोटात घेतो हे त्याने समजावून सांगतीले. तर शक्य असल्यास भाज्या शिळ्या विकत घ्या किंवा शिळ्या करून खाव्यात. उदाः फळभाज्या या २-३ दिवस टिकतात. आणि अनुभवाने सांगतो. अशा भाज्या चवीला ताज्या भाज्यांपेक्षा चिवष्ट लागतात. (पुढे वाचा) 

4. रंग, आकार, कीड लागलेल्या भाज्या…. बाजारातील ताज्या भाज्या घेण्याची वेळ आली तर रसायनांचा प्रभाव कमी असलेल्या भाज्या लगेच ओळखू य़ेतात. त्यांचा रंग हा काहीस उतरलेला निस्तेज असतो. मळकट असतो. तर त्यांचा आकार लहान असतो. तसेच त्या काही कोनात वाकलेल्या असतात. उदाः कारली, दूधी भोपळा हा आकाराने छोटा असतो. तर काही अंशी वाकडी झालेली असतात. बरेचदा त्याला कीड लागलेली असते. अशा भाज्यांचा कीडीचा भाग काढून टाकून आपण चांगल्या भाज्यांची भाजी करू शकतो. गवार, वांगी, गिलके, दोडके तसेच पाले भाज्यांमधे छोट्या पानांची, कमी उंचीची भाजी विकत घेवू शकतो. एकदा थायलंड येथे गेलो असता. तेथे कळाले की तेथे कीड,अळी पडलेला फूलकोबी लवकर विकला जातो.. काय कारण असेल… या विचार तुम्ही करा… (उत्तर नाही मिळाले तर फोन करा 9850569644)

5. वाळवलेल्या भाज्या … ताज्या भाज्यांपेक्षा वाळवलेल्या भाज्या या नेहमीच चांगल्या. कारण त्यात विषारी घटक हे बर्यांच अंशी कमी होत जातात. शिवाय त्या बाराही महिने कधीही खाता येतात. तसेच त्या निवडलेल्या व स्वच्छ ही असतात. भाज्या तुम्ही घरीसुध्दा सोप्या पध्दतीने वाळवू शकता. ( पुढे वाचा) 

6.  सर्वात चांगला व खात्रीलायक उपाय म्हणजे.. घरीच भाज्या पिकवा.. घरी पिकवलेल्या भाज्या या आपल्या डोळ्यासमोर उगवलेल्या असतात. अशा भाजीपाला बागेचे मातृत्व आपण स्विकारल्यामुळे आपल्या माहिती असते की आपण त्यात रासायनिक खते, औषधे टाकली आहेत की नाही. त्याला वाढीसाठी लागलेला वेळ आपल्याला माहित असतो. त्यामुळे आज तरी घरीच पिकवलेल्या भाज्यां या सर्वात खात्रीलायक आहेत. आणि आपण थोडी कष्टाची तयारी दाखवल्यास त्या घरच्या घरी उगवणे हे सहज सोपे आहे.

विषमुक्त भाज्यांसेवनासाठी उपाय नक्की करा.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. 9850569644 8087475242

घरीच भाज्या पिकवण्यासाठी वाचा.. Books / E books

Fast Food? TMAK Book 5/636

घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.


menu-3206749_1280.jpgमुलं पालेभाज्या खायला नाक का मुरडतात? फास्ट फूड, जे अबाल वृध्दांना का आवडत? थोडा विचार तर करा… संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ५/६३६“अहो आमची मुलं भाज्या खायलाच नाही म्हणतात”. अशी प्रत्येक गृहदक्ष असलेल्या आईची तक्रार असते. आपण फक्त तक्रार करतो. त्यावर उपाय शोधत नाही. अर्थात त्यावर आजच्या बाजारातील उत्पादनांनी बेमालूम तोडगा काढलाय. मुलांना अमूक तमूक पोषणासाठी आमची उत्पादने वापरा. मग काय आपण ती रासायनिक दुधात देवून त्यांना वाढवत असतो. किंवा मुलांना समजायला लागल की दुकानात मिळाणारी दोन मिनटांत तयार होणारा किंवा पॅक्ड असणार्या उत्पादनांना बळी पडतात. त्यात “तेढा है लेकीन मेरा है” पासून तर कुरकुरे, चिप्स पासून सारेच आले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून तयार केलेले पदार्थ व तेही कनिष्ठ अशा प्लास्टिकच्या वेष्टनात मिळायला लागलेत.बरं हे फक्त मूलंच खात नाही. आपल्या मोठ्यांच्या जिभेलाही त्याची चव लागली की ते खावेसे वाटते. बरं ते एवढंस खावून पोट भरणं सोडाच खाल्ल्याचे समाधानही मिळत नाही. अर्थातच त्यात त्यांनी अशा प्रकारचे रसायनं मिसळेली असतात. की ते खात रहावसं वाटतं. याला चटक लागणं नाही तर व्यसन लागणं म्हणतात. तर अशी ही उत्पादने वय झालेल्यांनाही आवडतात. जसे मूलांना कार्टुन बघावसं वाटतं तसेच वृध्दांनाही आवडतं. त्यातलं ढिशुम ढिशुम…पाहण्यातून अबाल वृध्द सारेच आनंद लुटतात. कारण लहान मूल व वृध्द मंडळी याची आवड निवड सारखीच होत जाते. काही वृध्द व्यक्ती तर दुकानात मिळणारी साखरेच्या गोळ्या खातांना पाहिली आहेत. असो…आपण कर्ते म्हणून याचा विचार केला पाहिजे. फक्त वयच तसं आहे म्हणून तो प्रश्न बाजूला सारण्यासारखा नाही. हे सारं चटपटीत खावंस वाटणं हे सारं रासायनिक प्रिर्झेव्हेटीवची कमाल आहे. जी आपल्याला घातक असतात. आपल्या परंपरेत असे फास्ट फूड नाहीच काहो? दोन मिनटातं तयार होणारी पदार्थ. शेवया, पोहे, मुरमुरे, ओली भेळ, राजगिरांचे लाडू… पण हे सारं आपण लक्षात कुठं घेतो. तर असो… मुद्दा होता. मुलं भाज्या खात नाही..माझा एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो…दहा वर्षापूर्वी नुकतीच बागेला गच्चीवर सुरवात केली होती. टेरेसवरच्या बागेत चार टोमॅटो पिकले होते. ते खाली किचनमधे बायकोला आणून दिले. तिनेही नुकतेच बाजारातून टोमॅटो विकत आणले होते. बाजारातले व घरचे टोमॅटो तिने एकत्र करून फ्रिज मधे ठेवून दिले. माझा मुलगा बाहेर खेळून आला व त्याला टोमॅटो खावसा वाटला. बायकोने त्याला घाई गडबडीत हाताला आला तो टोमॅटो त्याच्या हातात दिला. त्याला तो खूप आवडला. त्याला दुसरा खावासां वाटला. तिने दुसरा दिला. पण या वेळेस त्याने तोंडातून थूंकून टाकला. छि… काय हा टोमॅटो, म्हणून खेळायला गेला.नंतर यावर घरात चर्चा झाली. मी जरा चौकशी केली असता. असे लक्षात आले की पहिला टोमॅटो त्याने जो खाल्ला, त्याला आवडला तो बागेलतला विषमुक्त होता. तर दुसरा हा बाजारातला होता. बघा मुलांना खाण्यांच्या बाबतीत जी नैसर्गिक चव आहे त्याला ते किती पटकन प्रतिक्रीया देतात. (बाजारातल्या भाज्या न खाणं म्हणजे त्याला चवच नसते हे मुख्य कारण आहे) आपण मोठ्यांच्या जिव्हा आता बोथट झाल्या आहेत. त्या त्या भाजीचे महत्व आहे म्हणून गिळलं नाही गेलं तरी ते पोटातं ढकलतो आहोत. नेमकं मुलाना काय आवडतं त्याचा कुत्रीम इंसेन्स पॅक्ड् फूड मधे बेमालूमपणे मिसळेला असतो. जो मोठ्यांच्या लक्षात येत नाही. पॅक्ड फूड खाण्यानेच भारतातील मूलांचे लठ्ठपणाचा आजार वाढतोय. गुबगुबीत असणं वेगळं व अंगावर सुज असणं वेगळं हे आपल्या लक्षात येत नाही किंवा जाणून बूजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.घरच्या भाजीचा दुसरा एक अनुभव आहे. आम्ही एका ताईंच्या घरी भाजीपाल्याची बाग फूलवयाला सुरवात झाली. त्यात पान कोबी (कॅबेज) ही लागवड केला. पण घरातली आठवतील जाणारी मुलगी म्हणाली काका बागेत पान कोबी नका लावू. मला अजिबात आवडत नाही. त्या ताईही म्हणाल्या की जागा अडेल व तसेही कुणाला आवडत नाही म्हणून लागवड करूच नका. मी त्यांना आग्रह केला. घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.एकूणच काय हरकत आहे. चार कुंड्यामधे चार भाज्या लावयाला. आपल्याला निसर्गाची घडी बसवून दयावयाची आहे. बाकी सारं काम निसर्गच करणार आहे. माझा अनुभव असा सांगतो की घरचा एक टोमॅटो सुध्दा आपल्या जेवणातील वरण हे चवदार बनवू शकते. बघा… प्रयत्न करून. जमेलच.

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…http://www.gacchivarchibaug.inटीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

वाचकांची प्रतिक्रिया

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: