दहाव्या वर्षात पदार्पण करतेय गच्चीवरची बाग.


गच्चीवरची बाग आता नऊ वर्षाची पूर्ण होतेय. मार्च २०२१ पासून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

फक्त ऐकले होते शहरी शेती केली जाते. पण ति कशी करतात. काय करतात. काहीच माहित नव्हते. २००५ पासूनच प्रयोगांना सुरूवात झाली होती. पण त्याही आधी मला कचरा व्यवस्थापनात विशेष रूची होती. पुणे मुंबई सारखी नाशिकची स्थिती होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. त्यात नाशिककरांचा सहभाग कसा घेवू शकतो हाच तो काय विचार होता. होम कंपोस्टींगवर प्रयोग करता करता नैसर्गिक, विषमुक्त, रसायनमुक्त भाज्या पिकवण्याकडे अर्थात शेती कडे कल वाढला. पण कंपोस्टींग विषय काही डोक्यातून जात नव्हता. प्रयोग करता करता चिंतनातून या दोनांची सांगड घातली गेली नि मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक प्रयोग यशस्वी होत गेला. गच्चीवरची बाग पुस्तक प्रकाशीत केले. नि याला पूर्णवेळ देवून अर्थाजनाचे साधन होईल याचा कधीही विचार नव्हता. पण बागप्रेमीचा पाठींबा मिळत गेला. भांडवल गुंतवून हळू हळू व्यवसायात अर्थात पूर्ण वेळ काम करण्याचे ठरवण्यात आले.

आज आम्ही तीन विषयात काम करत आहोत.

कंपोस्टींग…

यात होम कंपोस्टींग, झाडपाल्याचे कंपोस्टींग, गुरा ढोरांच्या शेणाचे कंपोस्टींग करत आहोत. हे सारे जैविक कंपोस्टींग करण्यासाठी विविध प्रकारचे सेटअप तयार केले आहे. जे कचर्याच्या स्वभाव, आकार, उपलब्ध जागा, दिला जाणारा वेळ, पैशाची गुंतवणूक व उपलब्ध जागा या नुसार तयार केले आहेत.

गार्डेनिंग...

या विषयात आम्ही ऑरगॅनिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन, फुलझाडे व फळझाडांचे संगोपन व वाढ, उत्पादनावर काम करत आलो आहोत.

स्पेस डेकोरेशेन …

या विषयात विविध उपलब्ध जागेत निसर्गाचे सानिध्य कशा प्रकारे तयार करता येईल या विषयी हॅंडमेड उत्पादने तयार केली जातात. व त्यात निसर्ग फुलवला जातोय.

आज गच्चीवरची बाग नाशिकचे काम पाच विभागात करत आहे.

Grow : ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवतो व उगवून देतो.

Guide : यासाठी इच्छुकांना विविध सोशल मिडीयाव्दारे मार्गदर्शन करतो.

Build: भाज्या उगवण्यासाठी उपलब्ध जागेनुसार सेटअप तयार करतो.

Products : ऑरगॅनिक भाज्या उगवण्यासाठी लागणारे संबधित गोष्टीचे उत्पादनं करतो.

Sale N : ही उत्पादनांची आम्ही ऑनलाईन ऑफलाईन विक्री करतो.

Services : उपलब्ध जागेत फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला उत्पादनांसाठी सेवा सुविधा पुरवितो.

हे विभाग जसे जसे वाढत गेले. तस तसे आमच्या कामाचा विस्तार होत गेला. आजमितीला पाच ठिकाणी आमचे काम विस्तारत आहे. अर्थात ही अशी ठिकाणं आहेत जेथे आमचे काम तुम्हाला पहाता येईल, अनुभवता येईल.

Garden Lab..

गार्डन लॅब म्हणजे आमचे स्वतःचे टेरेस ज्यावर आम्ही आमच्यासाठी ऑरगॅनिक भाज्या उगवतो. ज्यात विविध तर्हेचे प्रयोग केले जातात.

Garden Studio…

गार्डेन स्टुडिओ ज्यात वरील कामासाठी लागणारे साहित्य संग्रह, रोजचे काम, उत्पादनाचे डिस्पले केले जाते. हा स्टुडिओचा आम्ही विविध तर्हेने वापर करत असतो. थोडक्यात ज्याला मल्टीपर्पज स्पेस असे म्हणू शकतो.

Garden Digital…

वरील कामकाज चालण्यासाठी ई माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात सातत्याने जाणीव जागृती होण्यासाठी व्हिडीओ, लेख, पोस्ट करणे असे कामकाज चालते. थोडक्यात यात आम्ही जाहिरात व मार्केटिंग हे विषय हाताळले जातात.

Garden Shopy…

गच्चीवरची बागेव्दारे जे काही उत्पादने केली जातात. ती इतर जिल्हा, राज्यात पोहचण्यासाठी फ्रांचाईजी स्वरूपात गार्डेन शॉपी तयार करण्यात येत आहेत. ज्यात स्थानिकांना सहजतेने गच्चीवरची बागेची उत्पादने खरेदी करता येतील व सहकार्यांना रोजगार मिळेल या उद्देशाने सुरू आहे.

Garden community…

गार्डेन कम्यूनिटी म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी भाजीपाल्याच्या बाग तयार करून दिल्या आहेत ते कुटुंब होय. आजपर्यत आम्ही साडेसातशे ठिकाणी भाजीपाल्याचे उपलब्ध जागे नुसार सेटअप बिल्ड करून दिल्या आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

ईथ पर्यंत प्रवास हा आमच्या एकट्याचा नव्हताच. व पुढचा प्रवास ही एकट्याने करण्यासारखा नाही. हे काम लोकांपर्यत पोहचण्यासाठी प्रत्येकाने आपाआपले पर्यावरणीय सहभाग व पुढाकार नोंदवला आहे. त्या ज्ञात अज्ञात व्यक्तिचां गच्चीवरची बाग मनापासून ऋणी आहे. कारण हा फक्त व्यवसाय (प्रोफेशन) नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी आमची आस (पॅशन) आहे. ज्यात आपण सारेच हातात हात घालून आरोग्य, पर्यावरण संरक्षणाच्या  क्षितीजाकडे जात आहोत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

जिवामृत कसे बनवावे…

जिवामृतसाठी कसे तयार करावे.


खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे जिवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य वापरावे.

दोन दिवस त्यास सकाळ संध्याकाळ घडाळ्याच्या काट्या प्रमाणे एकदा व त्याच्या उलट ते फिरवावे, सावलीत ठेवावे.

एक लिटर द्रावणाला पाच लिटर पाणी टाकून कुंडीला पुरेल एवढे द्रावण द्यावे.

भाजीपाला उगवण्याची ही पध्दत फार उपयोगी | गच्चीवर असावी सुंदर भाजीपाल्याची बाग | Roof Top Farming


गच्चीवर उगवा पपई | Papita / Papaya On Terrace / Kitchen Garden | बागेत उगवा पपई | पपिता | पोपई |


माननिय अमिर खान, पत्रास कारण की..| Letter to Mr. Amir Khan | Swatchmev Jayate | Swatch Bhart Abhiyan | SMART CITY

या पत्राव्दारे मी आपल्याला विनंती करतो की पर्यावरण संवर्धनासाठी, कचरा व्यवस्थापनासाठी माझे व माझ्या कुटुंबाचे हे प्रयत्न पाहण्यासाठी नाशिकला गच्चीवरीची बागेला एकदा भेट द्या. आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटून आपण सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाने समाजात काय प्रेरणा दिली हे सांगायचे आहे. आम्ही फार कष्टाने मेहनतीने हे काम उभे केले आहे. Please एकदा आम्हा सर्वांना भेटायला या… आपल्या येण्याने आमच्या कुटुंबियांचा, मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढेल. आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. कारण या कामाचे संपूर्णतः प्रेरणास्त्रोत आपणच आहात. आपली सत्यमेव जयतेची टीम आहे.


vhan-WA0016 (7).jpgमाननिय अमिर खान..

आपण एक महान कलावंत आहातच पण समाजाप्रती, सामाजिक प्रश्नांप्रती आपल्या अंगी असलेली संवदेनशिलता फार महत्वाची आहे. आपण सत्यमेव जयते या कार्यक्रमाव्दारे सादर केलेले सामाजिक प्रश्नावरील भाग, मुलाखती हे माझे आयुष्य घडवण्यात फार मोलाची मदत केली आहे. हे सांगण्यासाठीच हा पत्र प्रपंच….

मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक. वय वर्ष ४२, आपल्या पर्यंत पोहचण्याचा माझे काम पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फार कमी पडला असे जाणवतेय. पाणी फांऊडेशन मधील काही मित्रांव्दारे आपल्या पर्यंत गच्चीवरची बाग हे काम पोहचावे म्हणून शब्द टाकला. पण फळास आला नाही. हे पत्र आपल्यापर्यंत कसे व कधी पोहचेल हे मला माहित नाही. पण हे पत्र लिहावे असे बरेच दिवसापासून मनात ठरवत होतो. कदाचित हे ई-मायाजाल आपल्यापर्यंत हे पत्र पोहचेल हा विश्वास आहे.

हे पत्र लिहण्याचे कारण म्हणजे आपण २०१२ या वर्षी सामाजिक प्रश्नांबद्दल संवदेनशिलता वाढावी य़ासाठी सत्यमेव जयते हा कार्यक्रम प्रसारित केला. त्यातील सारे भाग मी डाऊनलोड करून ते जपून ठेवले होते. वारंवार पाहिले. त्यावेळेस इंटरनेट, मोबाईल घरोघरी पोहचलेले नव्हते. माझ्यापण घऱी नव्हते. आपण सादर केलेला कचरा व्यवस्थापनावरील एक भाग व Organic  V/s chemical Farming हे भाग पाहिले. विचार मंथन झाले. व त्यातून गारबेज टू गार्डन या संकल्पनेवर आधारीत गच्चीवरची बागेचा जन्म झाला. व हे काम सर्वार्थाने फुलवण्याची प्रेरणा मिळाली.

आपण सादर केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी Life Changing ठरलाय. हे फक्त आपल्याला या पत्रातून सांगायचे आहे. कदाचित हे आपण हा भाग सादर केला नसता, हा विषय निवडला नसता तर गच्चीवरची बाग या कामाची प्रेरणा मिळालीच नसती.

सफाई कामगार, घंटागाडी कामगार या मुद्यावर नाशिकमधे आंदोलन चालू होते. सफाई मित्रांच्या कहाण्या जवळून पाहिल्या, वाचल्या, त्यासोबत राहिलो. नाशिक मधील डंपीग ग्रांऊडला भेट दिली. तेथील विदारक परिस्थिती पाहिली. व कचरा व्यवस्थापन ही सरकार, प्रशासनापेक्षा लोकांची अधिक जबाबदारी आहे. विशेषतः कचरा जर मि निर्माण करतो तर त्याची विल्हेवाट नव्हे तर त्याचे व्यवस्थापन करणे ही माझीच जबाबदारी आहे या विचारातून प्रवासाला सुरवात झाली. या दरम्यान शेतकर्यासोबत सेंद्रियशेतीसाठीच्या कामाची संधी मिळाली.VINEL 2

लोकांना खत तयार करा असे सांगण्या पेक्षा काहीतरी नाविण्यपूर्ण दिले पाहिजे हा विचार करता करता रासायनिक शेतीमुळे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम भयावय आहेत याची जाणीव झाली. घरी कचरा व्यवस्थापनावर प्रयोग सुरू झाले. रसायमुक्त अन्न निर्मितीसाठी या प्रयोगांचा फार मोठा फायदा झाला. कारण बाजारात मिळणारे अन्न, भाज्या या खात्रीशिर विषमुक्त असतील याची खात्री नाही. शेती मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही. कुणीच देवू केली नाही. अशा वेळेस गच्चीवरच भाजीपाला उगवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयोगांना यश मिळत गेले. आता दहा टक्के माती वापरून आम्ही लोकांच्या गच्चीवर भाज्या उगवून देण्याचे काम करत आहोत. नंतर गच्चीवरची बाग नावाचे अनुभवाधारित पुस्तक प्रकाशित केले. लोकांना पुस्तक आवडू लागले पण त्यांना भाजीपाला फुलवण्यासाठी पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या कोण गोळा करणार, त्या कोण आणून देणार म्हणून हे काम आम्हीच सुरू केले. त्यासाठी छोटा हत्ती (टेम्पो) घेतला. आता त्यावर आम्ही स्वच्छमेव जयते, स्वच्छभारत या टॅगलाईन व्दारे लोकांपर्यंत जागृती करत आहोत. येणार्या पिढ्यांना उपलब्ध जागेत विषमुक्त भाजीपाला पिकवावा म्हणून आम्ही पर्यावरण पुरक गच्चीवरची बाग या उद्मशिलेतेला सुरवात केली. त्यासाठी आम्ही देशी गायीचेही पालन केले. परिसरातील, बागेची देखभाल करतांना मिळणारा जैविक कचरा मशिनमधे बारिक करतो व त्यास कुंड्या भरतांना Potting Mix म्हणून वापरतोय. आता माती फक्त १० टक्के वापरतो व ९० टक्के जैविक कचरा वापरतो जो जाळला अथवा फेकला जातो. आता कामाचा व्याप खूपच वाढला आहे. आमचे काम पहावयास, त्याची यू ट्यूबवर फिल्म बनवण्यासाठी बरीच मंडळी येतात. आम्ही त्यांनी कचरा व्यवस्थापन व गारबेज टू गार्डन याची माहिती देत असतोच.

या पत्राव्दारे मी आपल्याला विनंती करतो की पर्यावरण संवर्धनासाठी, कचरा व्यवस्थापनासाठी माझे व माझ्या कुटुंबाचे हे प्रयत्न पाहण्यासाठी नाशिकला गच्चीवरीची बागेला एकदा भेट द्या. आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटून आपण सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाने समाजात काय प्रेरणा दिली हे सांगायचे आहे. आम्ही फार कष्टाने मेहनतीने हे काम उभे केले आहे. Please एकदा आम्हा सर्वांना भेटायला या… आपल्या येण्याने आमच्या कुटुंबियांचा, मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढेल. आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. कारण या कामाचे संपूर्णतः प्रेरणास्त्रोत आपणच आहात. आपली सत्यमेव जयतेची टीम आहे.

मी वाचकांनाही विनंती करतो की हे पत्र माननिय अमिर खान यांच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करावी. कारण हे पत्र तुम्ही पुढे पाठवलेतरच हे पोहचेल. मी एकटा एवढेच करू शकतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

www.gacchivarchibaug.in

www.sandeep-chavan.in

Home Grow Vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक – YouTube

9850569644 / 8087475242

cropped-img-20200610-wa0008.jpg

Six steps to Avoid Poisions vegetable

रोजच्या आहारातील रासायनिक भाज्यां टाळावयाच्या असतील तर या सहा उपाय वाचा.. आपल्याला नक्कीच जमण्यासारखे आहे.


सहाप्रकारे टाळू शकता विषारी भाज्यांचे सेवन...

Sandeep Chavan with Home grow vegetable.
Sandeep Chavan with home Grow vegetable

रासायनिक भाज्यांचे सेवनाने शरिराची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि त्यामागे विविध आजार पिच्छा पुरवतात. या रासायनिक भाज्या रोजच्या जेवणात टाळावयाच्या असतील आपल्याला खालील प गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे. तरच आपले खाणं हे विषापासून दूर ठेवू शकतो.

1. रेड्यूसी फ्री भाज्या विकत घ्या.. रेड्यूसी फ्री म्हणजे शेती क्षेत्रात भाजीपाला उत्पादन वाढीसाठी जे काही रासायनिक खते, कीडनाशक वापरली जातात त्यांच्या अठ्ठेचाळीस तासाने भाजीपाला हा हा बाजारात विक्रीला आणला जावा असे आहे. रसायने फवारल्या नंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासाने रसायनांचा प्रभाव हा कमी होतो. पर्यायाने लोक आपली भाजी कमीत कमी रसायने रसायने सेवन करतील असा हेतू असतो. पण कोणताही शेतकरी अठ्ठेचाळीस तास वाट पाहत नाही. कारण रासायनिक खते व फवारणीने उत्पादीत भाजीपाला हा वेगाने खराब होतो. सडतो. तसेच ताज्या भाज्यांना बाजारात मागणी असते किंवा त्यास लांबचा प्रवास करून इतर बाजारपेठेत पोहचावयाचे असते. त्यामुळे त्यास आदल्या दिवशी रसायनांची फवारणी करून भाजीपाला विकला जातो. पर्यायाने आपण एका अर्थाने अठ्ठेचाळीस तासात आपण विषारी अन्न पोटात गेलेले असते. त्यामुळे हा पर्याय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. जितका शेतकरी छोटा तितके रसायनांचा वापर कमी असे काही लक्षात घेवून स्थानिक शेतकर्याकडून भाज्या विकत घेवू शकतो. पण त्याचीही खात्री नसते. हे लक्षात घेतले पाहिजे.

(पुढे वाचा) 

2. विषमुक्त भाज्याः तुम्हाला रोजच्या आहारात विषमुक्त भाज्यांची गरज असल्यास रसायनांचा वापर न करणारा, नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी असेन तर त्याच्या कडून विषमुक्त भाज्या तुम्ही विकत घेवू शकता. पण त्यासाठी आपल्याला त्यास दत्तक घेणे गरजेचे आहे. थोडक्यात आपण त्यांच्या कौटुंबिक गरजा भागवणे व त्या बदल्यात रसायनमुक्त भाज्या व अन्नधान्य विकत घेणे असा होतो. किंवा अशा खात्रीलायक शेतकर्याकडून जास्त भावात भाज्या विकत घेता येतात.

3. शिळ्या भाज्या विकत घेणे… मी माझ्या एका सन्यांशी मित्रासोबत भाजी विकत घेण्यासाठी गेलो होतो. त्यावर गच्चीवरची भाजीपाला निर्मिती करणारी बाग हे काम चालू केले नव्हते. तो सन्यांशी मित्र शिळ्याभाज्या विकत घेत असे. मी त्याला ताज्या भाज्यांचे महत्व सांगतीले. तर त्याने सांगीतले की या भाज्या रसायनांवर उगवलेल्या असल्या तरी त्या शिळ्या झाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण कमीत कमी रसायन पोटात घेतो हे त्याने समजावून सांगतीले. तर शक्य असल्यास भाज्या शिळ्या विकत घ्या किंवा शिळ्या करून खाव्यात. उदाः फळभाज्या या २-३ दिवस टिकतात. आणि अनुभवाने सांगतो. अशा भाज्या चवीला ताज्या भाज्यांपेक्षा चिवष्ट लागतात. (पुढे वाचा) 

4. रंग, आकार, कीड लागलेल्या भाज्या…. बाजारातील ताज्या भाज्या घेण्याची वेळ आली तर रसायनांचा प्रभाव कमी असलेल्या भाज्या लगेच ओळखू य़ेतात. त्यांचा रंग हा काहीस उतरलेला निस्तेज असतो. मळकट असतो. तर त्यांचा आकार लहान असतो. तसेच त्या काही कोनात वाकलेल्या असतात. उदाः कारली, दूधी भोपळा हा आकाराने छोटा असतो. तर काही अंशी वाकडी झालेली असतात. बरेचदा त्याला कीड लागलेली असते. अशा भाज्यांचा कीडीचा भाग काढून टाकून आपण चांगल्या भाज्यांची भाजी करू शकतो. गवार, वांगी, गिलके, दोडके तसेच पाले भाज्यांमधे छोट्या पानांची, कमी उंचीची भाजी विकत घेवू शकतो. एकदा थायलंड येथे गेलो असता. तेथे कळाले की तेथे कीड,अळी पडलेला फूलकोबी लवकर विकला जातो.. काय कारण असेल… या विचार तुम्ही करा… (उत्तर नाही मिळाले तर फोन करा 9850569644)

5. वाळवलेल्या भाज्या … ताज्या भाज्यांपेक्षा वाळवलेल्या भाज्या या नेहमीच चांगल्या. कारण त्यात विषारी घटक हे बर्यांच अंशी कमी होत जातात. शिवाय त्या बाराही महिने कधीही खाता येतात. तसेच त्या निवडलेल्या व स्वच्छ ही असतात. भाज्या तुम्ही घरीसुध्दा सोप्या पध्दतीने वाळवू शकता. ( पुढे वाचा) 

6.  सर्वात चांगला व खात्रीलायक उपाय म्हणजे.. घरीच भाज्या पिकवा.. घरी पिकवलेल्या भाज्या या आपल्या डोळ्यासमोर उगवलेल्या असतात. अशा भाजीपाला बागेचे मातृत्व आपण स्विकारल्यामुळे आपल्या माहिती असते की आपण त्यात रासायनिक खते, औषधे टाकली आहेत की नाही. त्याला वाढीसाठी लागलेला वेळ आपल्याला माहित असतो. त्यामुळे आज तरी घरीच पिकवलेल्या भाज्यां या सर्वात खात्रीलायक आहेत. आणि आपण थोडी कष्टाची तयारी दाखवल्यास त्या घरच्या घरी उगवणे हे सहज सोपे आहे.

विषमुक्त भाज्यांसेवनासाठी उपाय नक्की करा.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. 9850569644 8087475242

घरीच भाज्या पिकवण्यासाठी वाचा.. Books / E books

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: