बागेतील माती वाळवणे का गरजेचे आहे

आपले पूर्वज हे मोसमानुसार शेती करायचे तेव्हां शेतातील माती वाळवून घ्यायचे. काळी माती तर अधिक पाणी धरून ठेवते. तो तिचा गुणधर्मच आहे. त्यामुळे ही माती फेब्रुवारी महिण्यानंतर पावसाळ्यापर्यंत वाळवून घेत असत. कडक उन


भाजीपाल्याची बाग फुलवायाची म्हणजे काही कामे ही ठराविक वेळाने करणे फार गरजेचे असते.

त्यातील महत्वाचे काम म्हणजे बागेतील माती वाळवणे. विटांच्या वाफा असेल, अन्नपूर्णा बॅग असो वा कुंड्या असोत.

माती वाळवणे का गरजेचे आहे…

  • सातत्याने पाणी दिल्याने अथवा संततधार पावसामुळे कुंडी, वाफा, बॅग्जसमधील माती ही तळापासू त्यात मातीचे सुक्ष्म कण साचत जातात. तसेच सुक्ष्म कणांनी माती ही घट्ट होत जाते. माती घट्ट झाल्यामुळे ती कडक होत असते. (अर्थात बिशकॉम हे पॉंटीग मिक्स वापरल्यामुळे एवढी कडक होत नाही.) त्यात हवा खेळती असणे फार गरजेचे आहे. जेवढी हवा खेळती राहिल तेवढे पांढर्या मुळ्यांची संख्या वाढून फळधारणा चांगली होते. त्यामुळे कडक होणारी माती हे वाळवल्यानंतरच ति हलकी, भुसभुशीत होते. त्यामुळे माती वाळवणे गरजेचे आहे. माती भुसभुशीत नसेल तर मुळ्यांची वाढ ही चौफेर होत नाही. पर्यायाने झाडं हे खुरटून जाते.  पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पर्याने अधिक पाण्यामुळे झाडे रोगांना बळी पडतात.
  •  कुंडी, वाफा अथवा बॅगेत आपण खतं पाणी देत असतो. खत ही वरच्या भागात अधिक असतात. तर खालील भागात पाणी दिल्यामुळे ते वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे थरानुसार वेगवेगळे खतांची मात्रा साचण्याची शक्यता असते. तसेच तिची सुपिकतेचे भिन्न भिन्न थर बनतात. व भिन्न थरात झाडांची योग्यरित्या वाढ होत नाही. अशा वेळेस माती बाहेर काढून एकत्र करून वाळून घ्यावी. म्हणजे संपूर्णतः मातीत पोषकत्व हे पसरवता येते.
  • सततच्या पाण्यामुळे माती ही चिकट होते. अथवा त्यात पाणीजन्य सुक्ष्म विषाणूंची वाढ झालेली असते किंवा एकाच प्रकारच्या उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे सुध्दा झाडांची वाढ पूर्ण क्षमतेने होत नाही. अशा वेळेस त्यातील सुक्ष्म विषाणू व जिवाणू हे माती उन्हात वाळवल्याने मृत पावतात. त्यांचे सुक्ष्म खत नंतरच्या झाडांना पोषक होते.

या वरील तिन कारणांमुळे माती वाळवणे हे फार गरजेचे आहे.

आपले पूर्वज हे मोसमानुसार शेती करायचे तेव्हां शेतातील माती वाळवून घ्यायचे. काळी माती तर अधिक पाणी धरून ठेवते. तो तिचा गुणधर्मच आहे. त्यामुळे ही माती फेब्रुवारी महिण्यानंतर पावसाळ्यापर्यंत वाळवून घेत असत. कडक उन लागल्यामुळे मातीतील विषाणू हे मृत पावतात. त्यांचे खत तयार होते. तसेच काळ्यामातीचे ढेकळे हे मोठे मोठे असतात. ऊन लागल्यामुळे त्यांचा आपोआप चुरा होतो. माती भुसभुशीत होते. पण सध्याच्या बारमाही शेती मुळे शेतीत कीड वाढण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच माती चिकट होणे त्याचे ढेकळे होतात. म्हणूनच अधिक अश्वशक्तिचे  टॅक्ट्रर वापरले जाते आहेत. अर्थात रसायनांच्या वापरामुळेही हे होत आहे पण त्या खालोखाल कारण म्हणजे माती न वाळवणे हाच आहे.

वर्षायु झाडं असलेल्या कुंड्यातील माती ही वर्षा दोन वर्षातून पुर्नभरण करावे. पण भाजीपाल्याचे अन्नपूर्णा बॅग्जस व कुंड्यातील माती संपूर्णत वाळवणे गरजेचे आहे., विटांचा वाफा जशी जागा मिळेल तसे माती वाळवणे गरजेचे असते.

माती कधी वाळवावी….

साधरणतः माती वर्षातून तीन वेळा वाळवणे गरजेचे आहे.

  • ऑक्टोबर महिना… ऑक्टोबर महिण्यात कडक ऊन असते. ऑक्टोबर हिट मधे माती महिणाभर तरी वाळवून घ्यावी.
  • फेब्रुवारी महिण्यात माती वाळवावी.
  • मे किंवा जून महिण्यात माती वाळवावी. 

वाळलेल्या मातीत उत्तम प्रकारचे शेणखत, बिशकॉम हे पॉटींग मिक्स एकत्र करावे. कुंड्या व अन्नपूर्णे बॅग ही भरभरून भाजीपाला देतात.

गच्चीवरची बाग संशोधित एरो ब्रिक्स व्हेजेटेबल बेड म्हणजे विटांच्या वाफा हो दोन वर्षानी पुर्नभरण करणे गरजेचे आहे. पण बाराही महिने काहीना काही भाजीपाला असतोच. अशा वेळेस वाफेतील ठराविक तुकडा किंवा जागा सुचवलेल्या महिण्यात झाडे असतील तर त्याच्या आजूबाजूची माती वाळवून घ्यावी. त्यात बिशकॉम मिक्स करावे, किंवा तळाशी सुका पालापोचोळा किंवा वाळवलेले किचन वेस्टची भर टाकावी.

बागेतील जूनी माती फेकू नये…

बरेचदा कुंडीतील माती बदलावयाला सांगतात. म्हणजे आधिची माती ही फेकून देतात. पण तसे करू नका. कारण या मातीत आपण खते पाणी दिलेले असल्यामुळे माती फेकून दिल्यामुळे तो खर्च, मेहनत वाया जातो. अशा वेळेस माती वाळवणे शक्य नसल्यास ति काढून नवीन माती जरूर वापरा. पण आधिची माती वाळवून गोण्यात भरून ठेवा. म्हणजे ती परत आपल्याला वापरता येईल.

माती कशी वाळवावी…

कुंड्या, अन्नपूर्ण बॅगेतील माती बाहेर काढा. त्यातील ढेकळे फोडून घ्या. तिला उपलब्ध जागेच्या एका कोपर्यात ढिग करा, दोन चार दिवसातून त्यास फावड्याने वरखाली करा. कण नि कण कडक उन्हात वाळवून घ्या. माती हलकी व रिचार्ज होते.

आपल्याला लेख आवडला तर नक्कीच शेअर, लाईक व कॉमेंट करा.

या संकेतस्थळाचा वार्षिक खर्च हा जवळपास २५ हजार एवढा आहे. आमचे काम आपल्याला आवडल्यास संकेतस्थळ चालवण्यासाठी आर्थिक मदत करू शकता. किंवा यासाठी मदत करणार्या दानशूरापर्यंत हा संदेश पोहचावा ही विनंती…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

innovative way जुsssगाsssड… 

गोष्ट किती खरी आहे माहीत नाही. विनोदांच्या अंगाने सांगितल्या गेलेल्या गोष्टीत खरं तर मोठा अर्थ होता.


abstract-1484531_1280.pnginnovative way जुsssगाsssड…

गोष्ट किती खरी आहे माहीत नाही. विनोदांच्या अंगाने सांगितल्या गेलेल्या गोष्टीत खरं तर मोठा अर्थ होता. गोष्टीला मी गंभीरतेने घेतल्यामुळे त्याचा मोठा प्रभाव माझ्यावर व माझ्या कामावर पडला आणि गोष्टीत सांगितलेला अर्थानेच सारी गच्चीवरची बाग साकारली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

कोण्या एका देशात प्लास्टिक पाऊच मधे वेफर्स पॅकींग केले जात होते. काही पॅकेट्स मधे वेफर्स एेवजी हवा भरलीच जात होती. हे ओळखायचे कसे म्हणून तेथे सेन्साॅंर डेव्हलप केले होते. हे तंत्र खूपच महाग होते. तेथे आपल्या भारतीयाने वर उद्भवलेल्या अडचणीवर कल्पकतेने मात केली. जेथे वेफर्स पॅक होऊन बाहेर येत होते तेथे एक स्टॅंडचा पंखा चालू केला. वजनाने हलके, पण हवाच भरलेले पॅक हे हवेने उडून जावू लागले व वेफर्स असलेले जड पॅकेट्स पुढे पट्ट्यावर मोठ्या खोक्यात पॅँकीग होवू लागले. अशी ही सोपी कल्पना राबवली. जुगाड तंत्र वापरले. खरं तर जुगाड करणे गरजेचे आहे. जुगाडावरच तर सारं जग चालत आलयं असं माझ म्हणणं आहे.

जुगाड या शब्दाची oxford dictionaries मधे सुंदर व्याख्या  दिली आहे… “A flexible approach to problem-solving that uses limited resources in an innovative way.”

गच्चीवरची बाग उद्योग म्हणून विकसीत करतांना अशाच विविध जुगाडी तंत्राचा वापर केला जातो. जेथे शक्य आहे तेथे आम्ही कमीत कमी खर्चातले तंत्र वापरले आहे. बाग फुलवण्यासाठी पालापाचोळा, वाळलेले किचन वेस्टचा वापर करणे, कंपोस्टींगसाठी माठाचा, बादल्यांचा वापर करणे, डेव्हील डायजेस्टर (आल इन वन वेस्ट) डेव्हलप करणे) कमी खर्चात व पाण्यात झाडांना ड्रीप करणे. उन्हाळ्यात बागेसाठी शेड बनवणे. कमी साहित्य वापरल्यामुळे कमीत कमी खर्चात हे काम पूर्ण होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या सोप्या करून लोकांना सांगत आहोत. विकसीत केल्या आहेत. करत आहोत. अर्थात त्यात विज्ञान कसे काम करते हे समजून घेतले तर आपल्या अनेक पर्याय शोधता येतात. त्यातूनच आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासोबत, लोकांना शिकवत व सहभागी करत रोजगाराची पायभरणी करत आहोत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४

http://www.gacchivarchibaug.in

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: