कृपया लेख वाचण्यासाठी थोडा वेळ द्या…

नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.


नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.

गच्चीवरची बाग नाशिक Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच विभागात काम करत आहे. (सध्या कोव्हीड १९ मुळे फक्त क्रं दोनचं काम Guide जोरात सुरू आहेत) तर लोकांना विविध माध्यमांव्दारे मार्गदर्शन करणे, त्यांचे शंका निरसन करणे, त्यांना घरी भाजीपाला उगवण्यासाठी व कचरा व्यवस्थापनासाठी प्रेरीत करणे हे काम सुरवातीपासूनच करत आहोत. पुढेही करत राहणार आहे.

विविध सोशल मिडीयावर लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत.  या माध्यमात You Tube हे व्यासपिठ सुध्दा येते. गच्चीवरची बाग विषयी काम सुरू झाले तेव्हां या माध्यमांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात त्यातले काही कळत नाही, ते अवघड आहे, तांत्रिक साधनांची गरज असते. या मुळे त्यावर गच्चीवरची बाग विषयी व्हिडीओ टाकणे टाळत होतो. पण कोव्हीड १९ मुळे हाताशी वेळ मिळाला. तसेच जे टाळायचे होते ते करावेच लागले. म्हणजे यू ट्यूब चॅनलवर फिल्म विषयी शिकत, सवरत ते माध्मय लोकांपुढे न्यावे लागले. कारण लेख लिहणे हे सोपे व यात हातखंडा असला तरी लिखाण हे माध्यम सर्वांनाच आवडते असे नाही. पण यूट्यूब हे माध्यम सर्वांनाच आवडते.

या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे जितके लोक व्हिडीओ पाहतील त्यातून थेंब थेंब पैसे साचून पैशाच्या रूपात परतावा मिळतो. ( खरं तर पैशा पेक्षा ही प्रक्रिया एकदाची पूर्ण करणे गरजेचे आहे)आम्ही या माध्यमांवर काम करायला सुरवात केली. कारण यातून गच्चीवरची बाग या पर्यावरणीय उपक्रमाला आर्थिक हातभार लागेल म्हणून जानेवारी २०२१ पासून पूर्ण क्षमतेने सुरवात केली.  आता या कामाला नऊ महिने पूर्ण होताहेत.

या माध्यमातून पैसे मिळवायचे असतील तर काही अटी असतात. एक हजार सब्जक्राईबर पूर्ण होणे. तो आम्ही नुकताच पूर्ण केलाय. दुसरी अट असते. चार हजार तास पूर्ण करणे. त्यातील फक्त नऊ महिण्यात दीड हजार तास पूर्ण झाले आहे. येत्या शंभर दिवसात म्हणजे ३१ डिंसेंबर २०२१ पर्यंत अडीच हजार तास पूर्ण करायचे आहेत.

आणि त्यासाठी तुमची रोजच मदत लागणार आहे. कारण हे तीन महिण्यात पूर्ण झाले नाही तर पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार. आणि हे फार टफ वर्क आहे. त्यासाठी पुन्हा वेळ मिळणे कधीच शक्य होणार नाही.

हे अडीच हजार तास पूर्ण करण्यासाठी आपली पुढील प्रमाणे मदत हवी.

या यूट्यूब चॅनेलचे सब्सक्राईब्रर वाढीसाठी याचे सदसत्व घेणे.

Home Grow vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे प्रकाशीत झालेले अथवा तुमच्या पर्यंत आलेले व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करणे,

व्हिडीओ खाली आपल्या प्रतिक्रिया देणे. (चांगली वाईट काही चालेल पण मनापासून द्या)

बरीच मडळी व्हाट्स अपवर प्रतिक्रिया नोदंवतात.

 या माध्यमांतून मिळणारी मदत ही पुढील कामासाठी वापरण्यात येणार आहे.

  • ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
  • http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो  आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे.
  • फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
  • एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.
  • ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
  • http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो  आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे. पण हे संकेतस्थळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. तसेच खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहे.
  • फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
  • एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.

गच्चीवरची बाग हा व्यावसायिकरित्या जरी चालवत असलो तरी त्यामागील खरे काम लोकांना शिक्षित करणे हाच आहे. व ते निशुल्क करत आहोत. खर ती आमची खाज (पॅशन) आहे. तिला जिवंत ठेवण्यासाठी प्लीज लेखात सांगितल्या प्रमाणे आमचा चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. हे फक्त ३१ डिंसेबंर २०२१ पर्यतंच करायचे आहे.

हे आता नाही तर कधीच होणार नाही. आणि आम्ही पण या माध्यमांवर पुन्हा काम करणार नाही असे ठरवले आहे. कारण यात तन,मन, धन सारेच गुंतवले आहे. याहून जास्त गुंतवणूक आता होणार नाही. कारण वाढत्या वयात दृष्टी अधू होत चाललीय. तासन तास संगणकावर बसणे त्रासदायक होत आहे.

तेव्हां हे सारे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे.

कारण हे पर्यावऱण संवर्धनाचे काम आहे. कृपया लेखात सांगीतल्या प्रमाणे मदत करावी. किमान हा लेख तरी इतरांपर्यत पोहचवा. ही कळकळीची विनंती.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

आंबुशी रानभाजी

आपल्याच बागेत उगणारे तण हे तण नसून तो रानभाजी असू शकते. केवळ अज्ञानामुळे आपण ती फेकून देतो. अशाच एका आंबुशी गुणकारी रानभाजीची माहिती लेखात दिली आहे.


आंबुशी ही रानभाजी आहे. बारमाही येणारी ही जमीनीलगत (ground Cover) पसरणारी नाजूक वनस्पती आहे. तीन पाकळ्यासाऱखी आकर्षक पोपटी रंगाची दिसणारी पाने कालांतराने तपकीरी रंगाची होतात. ही जेथे ओलावा असतो त्याठिकाणी नेहमीच उगवून येते. खरं तर कुंड्या, जमीनीत येणारे हे तण म्हणून त्यास काढून टाकले जाते. चविला आंबट असणारी ही भाजी कच्ची खाल्ली तर उपयोगी असते. आंबुशी या भाजीला इंग्रजीत इंडीयन सॉरेल असेही म्हणतात. याची स्थानिक नावे ही वेगवेगळी आहेत. पण त्यास आबंटी, आंबुटी, आंबोती (गुजराती भाषेत)  चांगेरी, भुईपर्पटी, हिंदीत तिनपतीयाअसेही म्हणतात.

या हेतू ठेवून उगवता येत नाही. कारण निसर्गचे त्यांना वरदान आहे. अशा अनेक रानभाज्या आहेत ज्या आपण तण म्हणून काढून टाकतो. पण खरं तर त्या आपल्या आरोग्यासाठीच आपल्या परिसरात उगवलेल्या असतात. त्याचा अभ्यास करा.

आंबुशीच्या सेवनाने भूक वाढते. पचनास हलकी असते. क जिवनसत्व असेलेली ही भाजी आरोग्याला फार उपयुक्त आहे. याचे गुळपाण्यात सरबत फार चविष्ट लागते.

आपल्या बागेत येत असल्यास त्याचा उपयोग करा. भाजीत वापरता येते. तसेच त्याचा ठेचा सुध्दा चविष्ट लागतो.  इंटेरनेटवर आंबुशी नावाने शोधल्यास त्याच्या अनेक रेसीपी येतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

दुर्वा बहुपयोगी औषधी वनस्पती..

भगवान गणेशांना दुर्वां प्रिय आहेत. कारण दुर्वा ही बुध्दी वर्धक आहे. ती शित आहे. तिच्या सेवनाने आजार बरे होतात. ही कमी पाण्यात तग धरणारी व अधिक पाण्यातही जोमाने वाढणारी असते.


गणेश आपल्याला प्रिय व गणेशाला दुर्वा प्रिय. खरंतर हिंदू संस्कृतीत जेवढे काही देव देवता आहेत. हे त्या त्या काळातले समाजसेवक, समाज रक्षक, संशोधक, शास्त्रज्ञ होते. माणून उत्क्रांत होत गेला. पण त्याला समाज म्हणून सामाजिक बांधणीसाठी या सार्यांनी फार मोठ योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानामुळेच ते आपल्याला प्रातःसमयी वंदणीय आहेत.

भगवान गणेशांना दुर्वां प्रिय आहेत. कारण दुर्वा ही बुध्दी वर्धक आहे. ती शित आहे. तिच्या सेवनाने आजार बरे होतात. ही कमी पाण्यात तग धरणारी व अधिक पाण्यातही जोमाने वाढणारी असते.

पण आपणं माणसं तिचा उपयोग फक्त पुजेसाठी, देवाला वाहण्यासाठी करतो. तसे न करता तिचे सेवन केले पाहिजे. गव्हांकुराचा रस जसा शरिराला शक्तिवर्धक व कर्करोगास रोखणारा आहे. तसाच दुर्वांकुराचा रस मेंदुला ताकद देणारा आहे.

असे दर्वांकुर आपण घरी सुध्दा लागवड करता येते. ही वनस्पती तशी चिवट असते. ति मुळासहित आणून लावावी म्हणजे लवकर लागवड होते. फांदीपासून सहसा मातीत रूजत नाही.

यास चार इंच खोलीची जागा सुध्दा पुरेशी आहे. स्वच्छ व भरपूर उन असल्यास वेगाने वाढते. पाण्याचा निचरा होणारी जागा लागते. दुर्वा व हरळी एकच असते. पण लॉन्सचे गवत यात फरक आहे. दुर्वी ही आकाशाकडे झेपावणारी वेलवर्गीयात मोडते. जिचे पाने तलवारीसाऱखे असतात.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

चंदन बटवा व चाकवत भाजीतील फरक ओळखा | चंदन बटुवा | चंदन बथुवा | रानभाजी | आर्युवेदिक भाजी |

चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.


चंदन बटवा प्रतिकार शक्ति वाढते, निरोगी राहण्यासाठी या भाजीचे सेवन फार महत्वाचे असते. शुक्रवर्धक म्हणून याचा फार मोठा उपयोग होतो. पोट स्वच्छ होते, ताकद व उर्जा मिळते. पोटाचे विविध आजार बरे होतात. मुतखड्यावर (किडनी स्टोनवर) रामबाण इलाज आहे. मासिक पाळीत उपयोग होतो.मुत्रामार्ग स्वच्छ होतो. पोटातील जंतू मरतात. त्वचा रोगात उपयोग होतो.

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

गवती चहा बाग व मानवी आरोग्यासाठी फायदेशीर औषधी वनस्पती | lemon grass | Medicinal Plant

गवती चहा आपल्या बागेत असणे फार गरजेचे आहे. आपले व बागेच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असते. आपल्याकडे ही वनस्पती असावीच.


गवती चहा आपल्या बागेत असणे फार गरजेचे आहे. आपले व बागेच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असते. आपल्याकडे ही वनस्पती असावीच.

products store https://www.instamojo.com/gacchivarch…

सावधान ! कडीपत्ता जमनीत लावताय ? कडीपत्ता कसा फुलवावा, कोणती द्राव्य खते वापरावीत ?

सावधान ! कडीपत्ता जमनीत लावताय ? कडीपत्ता कसा फुलवावा, कोणती द्राव्य खते वापरावीत, त्याचे फायदे काय? सुंदरता, तरूणाई व आयुष्य वाढवणारा कड्डीपत्ता बद्दलची माहिती…


गव्हांकूर, तृणरसाचे फायदे


Important of wheat-grass

img_20200826_125602_9912399347673925291542.jpg

दूर्वाकूंर हे गणेश देवाला पुजा करतांना वाहिले जाते. गणेशदेवानां दुर्वांकूर वाहत असावे याचे काय कारण असावे?. खर तर ते त्यांचे आवडते गवत. दुर्वांकुराचा रस हा थंड असतो.. तसेच मेंदुच्या सुक्ष्म पेशीचे आयुष्य वाढतो. त्यामुळे बुध्दीला चालना मिळते. दुर्वांकूर हे देवाचा प्रसाद म्हणून आपणच त्याचा रस सेवन केला पाहिजे. कारण दुर्वांकूराचा तृणरस भूक वाढवते. या दिवसामधे भूक वाढली तरी पचन संस्थेचे कार्य मंदावलेले असते. दुर्वांकुरांच्या सेवनाने पंचन कार्य सुधारते. … हे झाले दुर्वांकुरांबद्दल…

दुर्वांकुरांच्या खालोखाल जर कोणती वनस्पती येत असेल तर ती म्हणजे गव्हांकूर…गव्हांकुरात तर कर्करोगात नुकसान पावलेल्या पेशी ही पूर्ववत होतात. गव्हांकूराला ग्रीन ब्लड, Green Blood म्हणतात. रक्ताभिसरणाची गती वाढवते. अनेक छोटया मोठ्या व असाध्य अशा तिनेशे हून अधिक आजारावर मात केल्याचे संसोधनाने सिध्द झाले आहे. गव्हाकुराला नैसर्गिक पूर्नांन्न असे म्हटले जाते.

गव्हांकूर रस बाजारातही मिळतो. पण संसर्ग, त्यात वापरली जाणारी रसायने याचा काही शाश्वती नसते. तसेच पॅकींग स्वरूपातील गव्हांकूर रस टाळावा. कारण ताज्या रसातच औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे गव्हांकूर हा घरीच उगवावा. रासायनिक खते वापरू नये. सेंद्रीय खताचा वापर करावा. घरीच उगवलेला गव्हांकराचा ताजा ताजा रस पिता येतो.

तर असे गव्हांकुर कसे, कुठे लागवड करावेत… कशा रितीने त्याचा रस तयार करावा… हे आपण या लेखात पाहणार आहोत.

आपल्या प्रत्येकाच्या घरी चार कुंड्या असतातच. त्यातीतच माती भुसभुशीत करून तुम्ही त्यात चिमुट चिमुट भर दाणे पेरावेत. सात दिवसांनी त्याचे पाती कापून मिकसर मधे त्याचा ज्यूस तयार करू शकतो. लक्षात ठेवा. सुरवातीला बचकभर गव्हाची पाती घेवून घट्ट असा रस तयार करू नका. तो आपल्या घशाखाली उतरणार नाही. त्यापेक्षा कमीत कमी रस पिण्याच्या पाण्यात जितके पातळ करून पिता येईल तेवढे प्यावे. गव्हाकूंराने चेहरा उजळतो. कार्यक्षमता वाढते. गव्हांकूरा मधे जीवनसत्वे, पाचक रस, क्षार व खनिजे असतात. Food Supplement म्हणूनही त्याचा वापर करता येतो. बरेचदा कॅल्शीयमच्या गोळ्या घेतो. गव्हांकूर घेत असल्यास त्याची कमतरता भरून निघते. आर्यन, मॅगेन्शीयम मिळते. गव्हांकुरात क्लोरोफिल जास्त प्रमाणात असते. ते नैसर्गिकरित्या जंतनाशकाचे काम करते.

आपण गच्चीवर बाग तयार केली असेन, रोज जाणे कंटाळवाणे वाटत असेन तर गव्हांकूराच्या रसाची सेवन करावे. त्या निमित्ताने रोज गहू लावणे, रोज पाती घेवून येणे हे होत जाईल. आपण रोज बागेत येता. झाडांशी बोलता याने झाडांनाही छान वाटेल. ते आपआपल्याला भरभरून परतावा देतील. एकदा चिमूटभर गहू लावले की त्याचे दोनवेळा काप घ्याव्यात तिसर्या कापामधे एवढे सत्व नसते. आपणाकडे वेळ, जागा असल्यास एकदाच काप घेतला तर उत्तम. तर एक – दोन कापानंतर गहू उपटून तेथेच खत म्हणून टाकून देवू शकता. गव्हाकूर लागवडीला कमीत कमी चार इंच खोलीची कोणतेही साधन चालते. उदा श्रीखंडाचे डब्बे, पसरट ट्रे असे काहीही चालते. एवढेच काय नवरात्रात मातीच्या गडू भोवती गहू लावले जातात. गव्हांकुराच्या महत्वामुळेच ते नवरात्र महोत्सवात त्याचे महत्व प्राप्त झाले आहे. पण आपण त्याचा फक्त पुजापाठसाठीच उपयोग करतो. त्यामुळे ती पण पध्दत चालू शकते. गव्हांकूराचा रस हा सकाळी उपाशी पोटी घ्यावा. तरच ते परिणामकारक ठरते. कफ प्रवृत्तीच्या लोकांनी हे टाळावे. कारण सर्दी, कफ वाढण्याची शकयता असते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

उकीडवे बसण्याचे फायदे…

आपल्याला घुडगे दुखीचा त्रास असेन, निरूत्साह वाटेल असेन तर हा लेख नक्की वाचा… आपले वर आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी….


उकीडवे बसण्याचे फायदे…

images

मला जसे कळायला लागले.. तेव्हापासून वडील नेहमी बाहेरून आल्यानंतर सांगायचे बसून पाणी प्यावे.. हा विषय मी त्यांच्याशी बरेचदा बोललो पण त्याचे काही त्यांना तर्कशुध्द उत्त्तर देता आले नाही. पण कालांतराने हा विषय माझ्या डोक्यात बसला तो बसलाच… नि अभ्यास सुरू झाला.

पाणी पितांना का बसावे … याची उत्तरे शोधतांना काही बसण्याच्या स्मृती लक्षात आल्या..

जेवतांना, चहा पितांना, शौचास, लघवीला बसतांना, अंगोळीला, पुरूष व स्त्रिया सुध्धा बसतांना उकीडवे बसतात. उदाः अगदी भारतीय आदीवासी गावात फिरतांना, आफ्रीकेतील झिंम्बॉबें येथे वास्तव्यास होतो तेथेही लक्षात आले.

काही दिवसापूर्वी माझे घुडगे दुखू लागले. माझ्या लक्षात आले की आपण जे दिवसभर पाणी, चहा, सरबत पितो हे विषेशता उभे राहून पितो.. त्यात बदल करणे गरजेचे आहे.

मी महिनाभर उकीडवे बसून पाणी पिऊ लागलो. माझी घुडगे दुखी गायब झाली. मला वडीलांचे शब्द आठवले. मी पुन्हा उभे राहून पाणी पिऊ लागलो. तर पुन्हा घुडगे दुखी सुरू झाली. आता मी उकीडवे बसूनच चहा, पाणी पितो. (फक्त घरी कारण समाज शिष्टाचार म्हणून उकीडवे बसावे हे शोभणार नाही)

मी नाशिक परिसरात काही आदीवासी गावात विषमुक्त शेतीसाठी जाणीव जागृतीचे काम करत होतो. तेथे एकदा सहभोजनाचा कार्यक्रम होता. त्यांनी आपापले जेवण ताटात घेवून बांध्यावर जावून उकीडवे बसून खाल्ले. मला तेव्हा खूप राग आला होता.. की काय हा असंस्कृतपणा… हा बसण्याचा विषय तेव्हाही डोक्यात राहिला.

आजही गावात, आठवडी बाजारात गेला तर वृध्द मंडळी चहा, पाणी, नाष्टा एव्हांना हातावर चटणी भाकर घेवून उकीडवेच बसतात. आफ्रीकेतील झिंम्बॉबें येथे गेलो तेव्हां सुध्दा तेथील स्थानिक लोक उकीडवे बसूनच जेवतात.

एवढच काय कामाख्या मंदीराला भेट दिली तेव्हा सुध्दा कामाख्या देवीची मूर्ती सुध्दा उकीडवे बसूनच प्रसवतांना दिसते. काय कारण आहे… या उकीडव्या बसण्यामागे…

काही गोष्टी लक्षात आल्या.. उकीडवे बसून चहा पाणी, नाष्टा केल्याने ओटी पोटाचा भागावर दाब येतो. भोजनाचे सेवन कमी होते. शौच्याला व लघवीला बसतांना ओटी पोटीवर दाब येऊन त्याज्य गोष्टी त्यागण्यास मदत होते. बाळ जन्माला घातलांना प्रसव वेदना कमी होत असाव्यात, ओटी पोटी वर दाब येऊन बाळ लवकर बाहेर येण्यास मदत होत असावी.

उकीडवे बसून पाणी, चहा पिल्याने घुडगे दुखी तर जातेच काम करण्यास उत्साह व हुशारी येते. हुरूप वाढतो. मुतखड्याच्या त्रास असणार्या पुरूषांनी तर लघूशंकेस जातांनाही उकीडवे बसून केल्यास हा त्रास जन्मात कधीच होणार नाही असे वैद्यानी सांगीतले होते. (सार्वजनिक ठिकाणी हे शक्य नाही. पण घरी नक्कीच हा प्रयोग करता येईल) आजही ग्रामीण भागात धोतर घातलेली मंडळी बसूनच लघवी करतात.

आपली भारतीय संस्कृती ही अनुभवाने शिकत आली आहे. त्यांना नाडी परिक्षणावरून आरोग्याच्या तक्ररी काय आहेत हे कळत असे… तेव्हा आजच्या साऱखी तंत्रज्ञान विकसीत नव्हते तरी लोक आपआपले आरोग्य सांभाळत होते. भले त्यांच्या कडे त्याचं रास्त कारण नसेल पण आपण शिकलेल्या मंडळींनी ते शोधणे, त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.

या गोष्टी टाळा…

सहभोजनासाठी डायनिंग टेबल टाळावा. उकीडवे बसण्याच्या खालोखाल मांडी घालून बसणे हे उत्तर बैठक व्यवस्था आपल्या कडे प्रचलीत आहे. शौचासाठी भारतीय बैठकच, शौचाचे भांडे वापरावीत. परदेशी पध्दतीचे भांडे टाळावे. अंगोळीला शॉवर खाली उभे राहून, छोट्या बैठ्या टेबलावर बसून अंगोळ करण्यापेक्षा उकीडवे बसूनच अंगोळ करावी.

बघा आपणही हा प्रयोग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. आपल्याला काय परिणाम येतात. हे कळवा..

सावधानः ज्यांना घुडगे दुखीचा खूपच त्रास असल्यास त्यांनी हा प्रयोग आपल्या जबाबदारीवर करावा. ज्यांना या त्रासाची सुरवात आहे.. त्यांनी नक्कीच करून पहावा.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

 

How can grow immunity power

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा लेख वाचाच.. सौदा फायदे का..


रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवाल…

vegies collage

Corona Virus या आजाराशी आपण सारेच लढत आहोत. योग्य ती काळजी घेत आहोत. मागील चार महिण्यापासून येत असलेल्या बातम्या, बरे झालेल्या रूग्णाचे अनुभव, डॉक्टारांचे प्रयत्न या सार्यातून काही उपचाराच्या पध्दतीत एक प्रकारचा Pattern दिसून येत आहे. या साथीच्या रोगावर काहीही रामबाम उपाय सध्या नाही. ज्या उपचाराच्या पध्दती आहेत त्या केवळ आपली प्रतिकार शक्ती वाढल्यानेच या आजाराची तिव्रता कमी शकतो किंवा त्याला आपण दूर ठेवू शकतो. तर आज आपल्या हाती शरिराची प्रतिकार शक्ती वाढवणे हे गरजेचे आहे.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक काढे, औषधे, पुरेशी झोप असे अनेक पर्याय आहेत. पण खरा मुद्दा आपण काय सेवन व कसे सेवन करत आहोत. हाच मुख्य गाभा आहे.

आपल्या जेवण हे चौरस आहार असावा. जेवणात असलेले पदार्थ, त्याची प्रक्रिया काय केली याला खूप महत्व आहे. जेवण व खाण्यातील पदार्थाचे प्रक्रिया करावयाचे अनेक प्रकार आहे.

  • शिजवलेले पदार्थः (भात, भाजी)
  • अर्धेशिजवलेले पदार्थ (पोळी, भाकरी,)
  • वाफवलेले पदार्थ ( कंदमुळे, भाज्या)
  • आहे तसे (कच्चे) पदार्थ (फळे, कंदमुळे)
  • तळलेले पदार्थ (भजी, वेफर्स)
  • भाजून खाण्याचे पदार्थ (कंदमुळ, वांगी, बटाटे)
  • अंबवलेले पदार्थ (इडली, मेदूवडा)
  • तव्यावर किंवा कढईत परतवलेले पदार्थ (कारले, वांगेची काप)
  • पातळ कच्चे द्रव्य (फळांचा ज्यूस, गव्हांकुर,)
  • पातळ गरम द्रव्य (टोमॅटो, फुलकोबीच्या पानांचे सूप, विविध काढे)
  • भिजवलेले वा मोड आलेले पदार्थ- कडधान्य़, तेलबिया.
  • अंकूरीत पदार्थ
  • दूग्ध जन्य पदार्थ (दूध, दही, खोबर्याचे दूध)
  • पारंपरिक फास्ट फूड (मुरमुरे, फुटाणे, लाहया)
  • ड्रिहायड्रेड केलेल्या भाज्या… वाळवणांचे पदार्थ..

यातील आपल्या रोजच्या आहात काय काय असते याचा विचार करण्याची आज गरज आहे.

काही सुत्र दतो…

  • शरिराला रोज षड रसांची गरज असते.
  • सर्व भाज्यांची एकत्र भाजी करून खाव्यात. गणेश उत्सवात २१ भाज्यांचा प्रसाद खातो. त्या प्रसादामागे नेमके काय सुत्र असावे याचा सुक्ष्म अभ्यास केला असता सहज येईल की त्यातून षढ रस आपल्या शरिराला मिळते.
  • त्या घरीच उगवलेल्या असल्यास उत्तम म्हणजे कच्चे खाल्या तरी रसायनांचे सेवन टाळता येईल. आजारांना दूर ठेवता येईल. भाज्या कच्च्या खाव्यात. एकदा थायंलडला मुक्कामी असतांना तेथे वांग्याचे काम सलाड म्हणून देत असतं. खूप नवल वाटले. हे असे खातात. पण तेथे खाऊन पाहिले. खूप छान लागते.
  • बरेचदा मंडळी हायड्रोफोनिक्स पध्दतीने उगवलेल्या भाज्या खातात. पण पंचमहाभूंतानी निर्मीत झालेला झाडपालाच आपल्यात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करू शकतो.

आपल्याकडे पदार्थांच्या खूप सारी विवधता आहे. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. प्रत्येक घरातील स्वंयपाक घर हे खरे तर औषधाचा खजिना आहे. जो हजारो वर्षापासून त्याची परंपरा टिकून आहे. त्याला आता जाणीव पूर्वक पून्हा जोपसले पाहिजे.

शिजवलेले अन्न हे पूर्णतः वर्ज नाही. पण आहारात शिजवलले अन्नच असावे असेही नाही. ते कमीत कमी प्रक्रिया झालेले असावे. फास्ट फूड, हॉटेलचे पदार्थ हे अधिक वेळ शिजवलेले असते. शिजवल्यानंतही अधिक काळ संग्रहीत केलेले असते. त्यावर असंख्य अशा प्रक्रिया झालेल्या असतात. असे प्रोसेड्ड फूड टाळलेले उत्तम..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644, 8087475242

%d bloggers like this: