पुदीना लागवड कशी करावी. Mint PLANTATION at home

पुदीना ही औषधी वनस्पती आहे. तिच्या लागवडी विषयी जाणून घ्या. घरच्या घरी चवदार पुदीना कसा पिकवावा.


पुदीना लागवड

पुदीनी तोंडाला चव आणणारी स्वादिष्ट वनस्पती आहे. तिच्या बहुविध गुणांमुळे तिचा समावेश हा भारतीय व्यजंनामधे जाणीव पूर्वक केला गेला आहे. पुदीना ही तापहारी वनस्पती आहे. त्यामुळे त्याचा वापर ताज्या भाजीत केला जातोच शिवाय त्याची चटणी सुध्दा केली जाते. ताप आल्यास त्याचा विविध प्रकारच्या काढ्यामधे त्याचा उपयोग केला जातो. किंबहूना त्याचा रस हा तळहाताला व तळपायांना सुध्दा लावला जातो.

पुदीना ही वनस्पती ही कमी पाण्यावर येणारी, भूआच्छादन करणारी थोडक्यात जमीनीवर पसरणारी वनस्पती आहे. शिवाय ही ड्रयूप होणारी ( लोबकळणरी) वनसप्ती सुध्दा आहे.

गोलाकार पसरट कुंड्या, पाण्याच्य बाटल्या, जमीनीवर त्याची लागवड केली जाते. पुदीनाला बाजारात प्रचंड मागणी आहे. पुदीना शेती ही रोकड मिळवून देणारी शेती आहे. त्याचा खाद्य पदार्थामधे होणारा वापर लक्षात घेता त्यास हॉटेलींग लाईन मधे प्रचंड मागणी आहे.

त्याचा मागणीचा विचार करता शेतकरी रसायने टाकून त्याचे उत्पादन वाढवतात पण रसायनांमुळे त्याची चव ही पाणचट तर होतेच. शिवाय त्याचे औषधी गुणधर्म सुध्दा कमी होतात.

त्यामुळे घरचा पुदीना हा चवदार, तिखट व औषधी गुणांनी समृध्द असतो. त्यामुळे त्याला घरीच लागवड करणे हे नेहमीच फायद्याचे ठरते.

पुदीनाची घरीच लागवड कशी करावी….

बाजारातून आणलेली पुदीण्याची जुडी निवडून घ्यावी. त्यातील आगपेटीच्या काडी एवढी जाड असलेली काडी ही पूर्नलागवडीयोग्य असते. अशा काड्यानां आपण खतयुक्त मातीत मातीला समातंर अशी अर्धी माती अर्धी आकाशाकडे लागवड करू शकता. या काड्या बोटा एवढ्या लांबीच्या असाव्यात. या काड्यांना छोचे केसतंतू सारखे मुळ्या सुध्दा असतात. असा मुळया असलेल्या काड्या रूजवण्यासाठी उत्तम ठरतात.

बरेचदा या काड्या बशीमधे चार पाच दिवस ठेवल्यास त्यास पांढर्या मुळ्या फूटतात. अशा मूळ्या फूटलेल्या काड्य मातीत लावाव्यात. काही दिवस कुंडी सावलीत ठेवावी. ( पुढे लेख वाचा)

बरेचदा पुदीण्याची पाने ही आखडली जातात. त्यास मुरडा पडणे असे म्हणतात. यासाठी या कुंडीला रिपॉटींग करणे गरजेचे असते. वरील रोग येण्याची दोन कारणे आहेत.

  • कुंडीला पाणी जास्त होते आहे हे लक्षात घ्यावे
  • कुंडीतील पाण्याचा निचरा योग्य तर्हेने होत नाही.

पुदीण्याची पाने मोठी होण्यासाठी नेहमी त्यास जमीनीपासून दोन इंच उंचीवर कापणी करत रहावी. म्हणजे नव्याने येणारे धुमारे हे गतीने वाढतात. तसेच पानांचा आकार वाढतो.

पुदीण्याला तुम्ही शित पेयांच्या बाटलीतही लागवड करू शकता. या बाटल्याचा खालील भाग कापून त्यात पुदीना लागवड तर करता येतेच शिवाय या बाटल्यांना आजूबाजूने ठराविक अंतरावर छिद्रे करून त्यात पुदीना लागवड केल्यास महिना दोन महिण्यात बाटलीच्या बाहेरील भाग पुदीन्याने बहरून येतो.

परसबागेत अधिकचा पुदिना तयार झाल्यास याची पावडर करून तुम्ही गरजेनुसार स्वयंपाक करतांना वापरू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

भाजीपाला उगवण्याची ही पध्दत फार उपयोगी | गच्चीवर असावी सुंदर भाजीपाल्याची बाग | Roof Top Farming


सावधान ! कडीपत्ता जमनीत लावताय ? कडीपत्ता कसा फुलवावा, कोणती द्राव्य खते वापरावीत ?

सावधान ! कडीपत्ता जमनीत लावताय ? कडीपत्ता कसा फुलवावा, कोणती द्राव्य खते वापरावीत, त्याचे फायदे काय? सुंदरता, तरूणाई व आयुष्य वाढवणारा कड्डीपत्ता बद्दलची माहिती…


खात्री नव्हती एवढ्या उथळ वाफ्यामधे पपई उगवेल का ? पण खरचं गच्चीवरची बाग म्हणजे जादू आहे

जाणून घ्या, नाशिक मधील रहाळकर कुटुंबियांनी नैसर्गिकरित्या विषमुक्त भाजीपाला कसा पिकवला… कमीत कमी वेळ देवून निसर्गाच्या कलेने घेत शेतीचा अनुभव कसा घेतात..


योजकः तत्र दुर्लभः | Garbage to Garden | Sandeep Chavan | कचर्यातून कांचन | Organic Grown Vegies

नाशिकची नित्या पाटील हिने गच्चीवरची बाग हा विषय निवडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रजत पदक विजेती ठरली. तिचे गच्चीवरची बागेबद्दलचे अभिमत..
योजकः तत्र दुर्लभः Meaning is “The Person Who can see the Utility of Things & use them properly is rare”


organicfood | terracefarming | Sandeep Chavan | A Organic Vegetable Farmer | Special Story @ InstaFarm


Its TRULY GROW CHEMICAL free VEGETABLE


Sandeep Chavan with Home grow vegetable.
Sandeep Chavan with home Grow vegetable

आम्ही गच्चीवर बाग फुलवून देतो. पण हे सर्वच खरचं रसायमुक्त असते का… या साठी कोणतेच रासायनिक औषधे वापरली जात नाही का असे प्रश्न विचारली जातात.

हो हे खरयं. आम्ही वाफे भरण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो. त्यात सुरवातीला कुठेही व नंतरही भाज्या उगवतांना रासायनिक खताचा, औषधांचा वापर ही केला जात नाही. एक वेळ भाज्या कमी आल्या (खरे तर असे होत नाही) किंवा नाहीच आल्या तरी त्यात रसायनांचा वापर आम्ही करत नाही व करू देत नाही. कारण सुंगधी माती तयार होणे खूप गरजेचे असते. बरेचदा कीड वाढते अशा वेळेसही आम्ही गोमय आधारीत औषधांचा, किड वेचण्याचा, मानवी हस्तक्षेपाचा पर्याय निवडला जातो पण रासायनिक अंश कुठेही वापरली जात नाही. आम्ही पंचस्तरीय पध्दतीने भाज्याचे प्रकारांचे लागवड करतो. तसेच Vegetable Forest (भाजीपाल्यांचे जंगल) तयार करावयाचे तत्व वापरतो. जी पधद्त जंगलात निसर्ग वापरत असतो. तर अशा प्रकारे आम्ही नैसर्गिक पधद्तीने भाज्या उगवतो. म्हणूनच आम्ही आपल्या डोळ्यासमोर उगवून दिलेल्या भाज्या या चविष्ट व समाधान देणार्या व आरोग्यदायी असतात. ज्या आम्ही संजीवन औषध म्हणून उगवतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

11 article


सकाळ वृत्तपत्रातील हिरवे स्वप्न या सदरातील गच्चीवरची बाग या विषयावरील अकरावा लेख…

https://bit.ly/2XfFe4M

संदीप चव्हाण गच्चीवरची बाग नाशिक

How to avoid this Five types of dangerous Foods …

वरील पाचही पदार्थ हे विविध महागडी आजारपण वाढवण्यास मुख्यतः काम करत आहेत. बरेचदा डॉ. हे पदार्थ कमीतकमी सेवन करण्याचे सुचवतात.


cropped-cropped-1-38-2

How to avoid this Five types of dangerous Foods …

गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे घरच्या घरी नैसर्गिक पध्दतीने अर्थातच रसयानमुक्त पध्दतीने भाज्या पिकवून देतो व त्यासाठी आम्ही मार्गदर्शन ही करतो.
पण या भाज्या घरी पिकवल्याने नेमका आपल्या आरोग्यात काय बदल होतो ते येथे नमूद करणार आहे. घरी पिकवलेल्या भाज्यांचे सेवन केल्याने पाच प्रकारचे खाद्यपदार्थ हे आपल्या जेवणातून हळू हळू कमी होतात व नंतर बाद होतात. जे आज सर्वाथाने विषारी आहेत. किंवा विषं टाकूनच आपल्या खाण्यातून पोटात जातात.

 

१)साखरः घरच्या भाज्या सेवन होत असल्या की आपल्या रोजचा चहातील साखर ही कमी कमी होत जाते. मी याचा अनुभव स्वतः घेतला आहे. किंवा इतरांच्या घरी चहा घेतांना त्यात साखर अधिक प्रमाणात वापरल्याचे लक्षात येते. तसेच बरेचदा paid Consultancy साठी जातो तेव्हा तेथील चहा, कॉफीतील साखरेचे प्रमाण जास्त असते. तेथे भाजीपाला लागवड केल्यानंतर काही महिण्यांनी चहातील साखरेचे प्रमाणात लक्षात येईल एवढे कमी झाल्याचे आढळून आले आहे. कारण नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या भाज्या, फळातून आपल्याला सर्व प्रकारचे अन्नतत्व मिळत असल्यामुळे कुत्रिम साखर सेवन करण्याची इच्छा होत नाही. तोच अनुभव गुळ सेवनाबद्दल आला. साखर ही सफेद रंगाच्या पदार्थात येते. जे अधिक रसायने वापरून तयार करण्यात येते. आपल्याला साखर टाळावयाची असल्यास शक्यतो गुळ खावा…

२)दूधः दुध हे हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे आहे. पण आता A2, A1 दुधांचा फरक शास्त्रज्ञांनी स्पष्ट करून सांगीतला आहे. देशी गायीचा दूध हे आधुनिक आजार वाढवण्यास पुरक ठरताहेत. आणि गावरान, देशी गायीचे दूध सर्वत्र उपलब्ध होत नाही. आणि झालेच तर ते बरेचदा हारमोन्स वाढीचे इंजेक्शन दिल्यामुळे ते शरिरालाही घातक ठरतेय. पण घरच्या भाज्यांचे सेवन केल्यास दुध सेवन करण्याची इच्छा होत नाही. हा फरक मुख्यत्वे स्वानुभवावरून लक्षात आला आहे.

३)मासांहारः आज मासांहाराचे प्रमाण समाजात वाढलेले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंजेक्शनं देवून त्यांची अत्पावधीत जिवांची वाढ करतात. व ते लोकांना खावू घातले जाते. पण घरच्या भाज्या सेवन सुरू झाले तसे दर आठवड्याला होणारा मांसाहार हा महिण्यावर गेला नंतर तो बंदच झाला. आता इच्छा होत नाही.. ही कमाल फक्त घरच्या भाज्यांनीच केली आहे हे मी सांगू शकतो.

४)मीठः आज आहारात मीठाचे प्रमाण वाढले आहे. जे काही फास्टफूड आहेत त्यात प्रचंड प्रमाणात मीठ टाकलेले असते. घरच्या भाज्या सेवन केल्याने आहारातील मीठ सुध्दा कमी कमी होत गेले याचा अनुभव मला व माझ्या कुटुंबियांना आला आहे. किंबहूना वरून अतिरिक्त मीठ घेण्याची गरज पडत नाही. अतिरिक्त मीठ सेवनामुळे तब्बेत वाढतच नाही तर अंगाला सुज दिसते.

५)शेल्फ फूडला सुट्टीः घरच्या भाज्या सेवन केल्याने बेकरी प्रोडक्टस,जंक फूडस, पॅकेट्स फूड, तळलेले पदार्थ यांनाही आपोआप फाटा फुटतो. याचाही अनुभव आला आहे.
वरील पाचही पदार्थ हे विविध महागडी आजारपण वाढवण्यास मुख्यतः काम करत आहेत. बरेचदा डॉ. हे पदार्थ कमीतकमी सेवन करण्याचे सुचवतात.

घरच्या भाज्या खाल्यांने सर्व प्रकारचे नैसर्गिक तत्व त्यात आल्याने रात्रीची झोप शांत लागते व दिवसभर उत्साहही जाणवतो. छोट्या छोट्या आजारांना गुडबाय म्हटले जाते. थोडक्यात आपला दवाखाण्याचा खर्च वाचतो व त्याचा अनुभव माझे कुटुंब घेत आहे.
घरी उगवलेली भाजी ही थोडी असली तरी ती समाधानाने पुरते याचाही अनुभव बरेचदा घेतला आहे. आता नविन प्रयोग सुरू केला आहे. घरी उगवलेल्या भाज्यांची भाजी रात्री केली ती खाल्ली, व उरलेली भाजी पुन्ही सायंकाळी व रात्री खाल्ली तर आणखीच चवदार लागते याचा अनुभव येवू लागला आहे. शिवाय ती नासत नाही.
त्यामुळे आपल्याल शक्य असल्यास उपलब्ध जागेत जमेल तेवढ्या भाज्या पिकवा. त्यांचे आठवड्यातून एक-दोनदा सेवन झाले तरी ते औषधासारखे नक्कीच काम करू लागते.

गच्चीवरची बाग, नाशिक.
८०८७४७५२४२

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

“की फरक पैंदा”?

घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही…


<a href=”http://Image%20by Gordon Johnson from Pixabay.wordpress.com/2019/05/ekg-2069872_1280.png” target=”_blank” rel=”noopener”>

ekg-2069872_1280.png

“की फरक पैंदा”?“क्या फरक पडता है”। “काय फरक पडतो”? असे आपले रोजच्या जीवनात कुठे ना कुठे एकदा तरी म्हणत असतो. एकाद्या व्यवहारात आपण तडजोड करतो तेव्हा हे वाक्य हमखास आपल्या डोक्यात येते. आता “की फरक पैंदा है” असं आणि आपल्या गच्चीवची बागेचा येथे का संबध असं आपल्या मनात आले असणार.. आलेच पाहिजे.. कारण अत्तर सोडून आपण कुत्रिम सुंगध वापरतांना सुध्दा फरक पडत असेन तर आपल्या रोजच्या जगण्यात ज्या भाज्या बाजारातून ताटात येतात. त्याचा सुध्दा आपल्या शरिरावर नक्कीच फरक पडत असतो.गेल्या सहा वर्षापासून रसायमुक्त भाजीपाला पिकवून देण्याचे नाशिक मधे पूर्ण वेळ काम चालू आहे. त्याआधी घरच्या गच्चीवर विषमुक्त भाज्या पिकवण्याचे प्रयोग चालू होते. काही ना काही रोजची भाजी मिळत होती. रोजच्या डोळ्यासमोरच्या भाज्या खाल्यामुळे घरातल्या छोट्या छोट्या आजारावंर होणारा खर्च बराच आटोक्यात आला होता. पण मागील वर्षी घरच्या बागेकडे दुर्लक्ष केले (खर तर या काळात इतरांच्या ठिकाणी भाज्या उगवण्याचं प्रमाण वाढलं होत) त्यामुळे साहजिकच घरी उगवलेल्या भाज्या या ताटात येणं कमी झालं. (त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज होता पण प्रयोग करून पहायचं होत) आणि झाला तसचं. घरच्या भाज्या खाणं कमी म्हणजे जवळ जवळ नाहीच झालं. नि दिवाळीमधे बायकोला हायपरटेशंनमुळे आठवडा भर अडमीट कराव लागलं. नको तेवढा पाण्यासारखा पैसा दवाखान्यात खर्च झाला. मनस्ताप झाला तो वेगळाच. (कळत असूनही विषाची परिक्षा घेतली) त्या काळात काम बुडालं ते नुकसान वेगळचं. तसंच शरिरात रासायनिक औषधांचा मारा झाला तो वेगळाच. घरी भाज्या न पिकवणं हे एकूणच महागात पडलं होतं.शक्यतो रोज संध्याकाळी वरण भात हा ठरलेला असतो. इतर कडधान्याच्या भाज्याही होतातच. (बाजारातल्या ताज्या भाज्या पेक्षा कडधान्यात कमी विषतत्व असतात. कारण बाजारात आलेल्या भाज्यावर रसायनं मारून २४ तासाच्या आत त्या शिजवून पचवलेल्या असतात. रेसुड्यू फ्री नसतात) त्यामुळे घरच्या हिरव्या भाज्या आठवड्यात तीन –चार असल्यातरी पुरेशा होतात. पण त्याहीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं. याचा मला चांगलाच अनुभवाचा चटका लागलाय.

आपण बाजारातून रोजच्या भाज्या खातो त्यात कुठेना कुठे त्यात रसायनांचे अंश हे आपल्या पोटात, पचसंस्थेतून रक्तात मिसळतात. त्यातल्या त्यात आपलं रोजचा व्यायाम नसतोच. त्यातून हायपरटेशंन सारख्या गोष्टी घडतात. मी प्रयोग म्हणून केलेला हा प्रयत्न करतांना मी पण असेच म्हणालो होतो की काय फरक पडतो. पण फरक पडतो…. घरी उगवलेल्या भाज्या या मूठभर असल्यातरी तरी त्या औषधांच काम करतात. नि बाजारातल्या भाज्या स्लो पाईझनचे काम करतात. तेव्हा निवड तुमची आहे. ‘’की फरक पैंदा’’ म्हणून बेफिकीर होऊन चालणार नाही…. एकादे वस्त्र हे जसे सुक्ष्म धाग्यानीं विणून तयार होतं. तसचं आपल शरीर, आपलं जगणं सुध्दा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच समृध्द, सुदृढ होत असतं. ते आपल्या लक्षात येत नाही… घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही… हे लक्षात घेवूनच आपल्या रोजच्या जगण्यात, धडपडण्यात घरच्या भाज्या घरीच पिकवण्याचा प्रयत्न करा. हळू हळू त्यात मास्टरकी येणारच.

वरील चित्रफितीत दाखवल्या प्रमाणे आम्ही जमीनीवर किंवा गच्चीवर विटांच्या वाफे बनवून रसायनमुक्त भाज्या पिकवून देतो.लेख आवडला तर नक्की लाईक,शेअर, व कंमेट करा…संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.9850569644/ 8087475242www.gacchivarchibaug.in

जाहिरात: उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवा. गच्चीवरची बाग पुस्तक (व्दितीय आवृत्ती)
घरपोहोच by post 240/-
WTS app 9850569644 / 8087475242
http://www.gacchivarchibaug.in


संदीप चव्हाण नाशिक.

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: