बोनमिल म्हणजे काय रे भाऊ…

बोनमिलला असलेला माझा विरोध. ते खत म्हणून उत्तमच आहे. त्या बद्दल वादच नाही. पण ते ज्या कारणामुळे तयार होते त्याला विरोध आहे. अर्थात मी सफेद रंगाची टूथपेस्ट वापरतच नाही. मी सारेच मजंण एकत्र करून दात घासतो. असो. विरोध यासाठी आहे की आपण एका बाजूला गोधन वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. पण त्याना ज्या मासांहारासीठी जिवंत कापले जाते. त्यासाठी ज्या पध्दतीने त्यांची तस्करी होते त्यांचे मांस विकले जाते त्यांच्याच हाडातून तयार होणारे हे खत झाडांना वापरणे हे खरचं किती अर्थाने नैतिक आहे.


बोनमिल म्हणजे काय ?

ते कसे तयार होते ?

बोनमिल हे नैसर्गिक खत आहे का ?

त्याचा कुंड्यातील झाडांना कसा उपयोग करायचा?

ते उन्हाळ्यात वापरले तर चालते का ?

बोनमिलला पर्याय आहेत ?

या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

बोनमिल या नावावरूनच ते कशापासून बनलेले असावे याचा अंदाज येतो.

अर्थातच हाडांचा हा चुरा असतो. कत्तलखान्यात मारल्या जाणार्या जनांवरांची जी हाडे उरतात. त्याचा चुरा तयार केला जातो. अर्थात ही हाडाचा चुरा दात घासण्यासाठी ज्या ब्रॅंडेड टूथपेस्ट तयार होतात त्यातही वापरली जाते. तर हाडांमधे फॉसस्परस अर्थात गंधक व कॅल्शियमचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. झाडांना फुले येण्यासाठी नैसर्गिक गंधकाची गरज असते. अर्थात फूल येण्यासाठी बोनमिल हाच एक पर्याय आहे असे नाही. मी गेल्या दहा वर्षापासून भाजीपाला उगवून देण्याचे काम करत आहे पण एकदाही बोनमिल वापरलेले नाही. याचे कारण म्हणजे….

बोनमिलला असलेला माझा विरोध. ते खत म्हणून उत्तमच आहे. त्या बद्दल वादच नाही. पण ते ज्या कारणामुळे तयार होते त्याला विरोध आहे. अर्थात मी सफेद रंगाची टूथपेस्ट वापरतच नाही. मी सारेच मजंण एकत्र करून दात घासतो. असो. विरोध यासाठी आहे की आपण एका बाजूला गोधन वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. पण त्याना ज्या मासांहारासीठी जिवंत कापले जाते. त्यासाठी ज्या पध्दतीने त्यांची तस्करी होते त्यांचे मांस विकले जाते त्यांच्याच हाडातून तयार होणारे हे खत झाडांना वापरणे हे खरचं किती अर्थाने नैतिक आहे. हा माझा प्रश्न आहे. याचे समांतर उदाहरण म्हणजे मला माझा देश, परिसर स्वच्छ असावा म्हणायचे व त्यासाठी आग्रही धरतो पण मीच येता जाता कचरा कुठेही फेकला तर याला काय म्हणायचे. याला भ्रमित व्यक्तिमत्व मानले जाते.  तर बोनमिल बद्दल हे माझे मत आहे. ते तुम्ही वापरून नये असा आग्रह नाही. ज्याला त्याला स्वांतत्र्य आहे.  तर असो…

कुंड्यामधील झाडांना व परसबागेतील झाडांना खत देण्यात विविधता असावी हे मी बरेचदा सांगितले आहे. त्या विविधतेत बोनमिला समावेश करता येईल पण हाच एक पर्याय आहे असे नाही. गंधक हे भुरू भूरू जळते. ते सर्वच प्राण्याच्या हाडात जसे सापडते तसे ते कोणत्याही काष्ट वा झुडुपाच्या वाळलेल्या काड्यामधेही आढळते. जे झाडांत आहे ते पानांतही असणारच त्यामुळे गंध पुरवण्याची व्यवस्था निसर्गाने आपसूच केली आहे. निसर्गाने हा ईनबिल्ट प्रोग्राम केलेलाच आहे. पण माणूस म्हणून आपली बुध्दी तोडकी पडतेय. जे विकलं जातय तेच वापरलं जातय हा आजच्या अर्थव्यस्थेचा तकलादू पाया आहे. असो..

खत कोणते आहे त्यावर त्याचे झाडांना देण्याचे प्रमाण ठरते. बोनमिल, तंबाखू पावडर, राख,  निमपेंड हे एका चौरस फुटाला एक चमचा भर द्यावे. शक्यतो ते सायंकाळी द्यावे, माती उकरून दिल्यास उत्तमच. म्हणजे उत्तमपणे ते मातीखाली झाकले जाते वा मिक्स होते.  कारण तिव्र उन्हामुळे कोणत्याही खतातील घटक हे करपू शकतात. किंवा दिल्या नंतर मोजके पाणी द्यावे. म्हणजे ते अधिकच्या पाण्यामुळे वाहून जाणार नाहीत. तसेच जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल या मधेही गंधक व कॅल्शियमचे प्रमाण असते.

खतं कोणतही असोत ती मोजक्याचा स्वरूपात द्यावी. कारण हे वर खत आहेत. वरखतं ही जेवणातील तेल मिठ, मिरची, लोणच्या सारखी असतात. किंवा बडी शोफ सारखी असतात. ती योग्य प्रमाणात सेवन केली तरच त्याला चव असते व त्याचा योग्य परिमाणात योग्य तो परिणाम साध्य करता येतो.

कोणत्याही दोन खतात ७ ते १५ दिवसांचे अंतर असावे. अर्थात त्यात खतांत विविधता असावी. एकच एक खत टाकल्यानेही झाडं किडीना बळी पडतात.

गंधक हे कंपोस्ट खतातून मिळते. तसेच गारबेज इंजाईम मधूनही मिळते. तसेच देशी गायीचे शेणखतातही असते. खरं तर डॉक्टर आपल्याला वरून साखर वा मिठ खायला सांगत नाही. त्यांचे म्हणणे असते की जे नैसर्गिक रित्या फळातून धान्यातून भाजीतून मिळते ते खरं मिठ साखर. तुम्हाला माहित असेन की घरची पालकात नेहमी प्रमाणे मिठ टाकून चालत नाही. कारण तिच्यात नैसर्गिकरित्या मिठाचे प्रमाण हे अधिक असते.

तर सारी व्यवस्था ही निसर्गात आहे. त्याचा वापर करायला आपण शिकले पाहिजे. काही मंडळीना हा लेख एकांगी वाटेलही पण थोडा विचार करून पहा.. आपल्याला निसर्ग फुलवायचा आहे. निसर्ग जपण्यासाठी तेही निसर्गालाच सोबत घेवून.. जे निसर्गाने त्यागले आहे त्याचा पूर्नवापर करण्याची अक्कल ही फत्त माणूस प्राण्यालाच दिली आहे. त्याचा वापर करायला आपण सर्वानी शिकले पाहिजे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

9850569644 / 8087475242

 www.gacchivarchibaug.in

होम कंपोस्टींग लाईव्ह सेशन भाग २ होम कंपोस्टींग

येत्या रविवारी १९ संप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान होम कंपोस्टींग या विषयावर लाईव्ह सेशन होणार आहे.


यूटयूबवर लाईव्ह सेशन With गच्चीवरची बाग, नाशिक.

लाईव्ह सेशन भाग २

विषयः होम कंपोस्टींग गतीने कसे करावे.

येत्या रविवारी १९ संप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान होम कंपोस्टींग या विषयावर लाईव्ह सेशन होणार आहे. यात आपण खालील प्रमाणे विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कचरा व्यवस्थापन की विल्हेवाट यातील फरक, सोपे काय आहे?

नैसर्गिक कचरा (किचन वेस्ट, गार्डेन वेस्ट, खरकटे अन्न असे प्रकार

कचर्याचा स्वभाव, नेचर, वैशिष्टय, प्रक्रिया..

चुकीच्या पध्दती, समजूती व प्रॅक्टीसेस..(माती, पालापाचोळा, सर्वच एकत्र करणे)

अभ्यासाचा अभाव…

होम कंपोस्टींगचे साधने, गतीने कंपोस्टीग करण्यासाठी त्याची काळजी, गोमय कल्चरचा वापर कसा करावा.

अशा मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

लाईव्ह सेशन भाग १: कुड्या अशा भरा… (व्हिडीओ)
All in one composting setup

Home composting Culture

जिवामृत कसे बनवावे…

जिवामृतसाठी कसे तयार करावे.


खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे जिवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य वापरावे.

दोन दिवस त्यास सकाळ संध्याकाळ घडाळ्याच्या काट्या प्रमाणे एकदा व त्याच्या उलट ते फिरवावे, सावलीत ठेवावे.

एक लिटर द्रावणाला पाच लिटर पाणी टाकून कुंडीला पुरेल एवढे द्रावण द्यावे.

गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक…


गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक… ( Difference Between organic Fertilser )

बरेचदा आपण हौशी बागप्रेमी गच्चीवरील बागेला विविध खते पुरवत असतो. या खतांमधे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खतांचा समावेश असतो. या तिनही खतांमधे बराच फरक आहे. एकाद्या आजारी पेशंटला आपण चांगल खावू घाला असे म्हटले की आपण फळं, नारळपाणी असे देतो सहसा जे आपल्या रोजच्या आहारात कमी असते. पण बागेतील आजारी, रूसलेल्या झाडांना चांगली खते द्या असे म्हटले की मंडळी नेहमी जी खतं देतात त्यातीलच खतांचा डोस वाढवतात. हे चुकीचे आहे. त्यांना खतांमधे वेगळेपण गरजेचे असते.

कंपोस्टखत हे एसिडिक ( Acidic) असते. ते फुल झाडांना, फळ येणार्या झाडांना गरजेचे असते. तर गांडूळखत हे गांडूळांनी तयार केलेले असते. असा नैसर्गिक कचरा जो अर्धेवट कुजलेला असतो तो गांडूळ खातात व त्यांची जी विष्टा असते त्यास गांडूळखत असे म्हणतात. या खतात झाडांना जी खनिजद्रवे गरजेची असतात ती त्यातून मिळतात. बरेचदा मंडळी सुकलेले गांडूळखत वापरतात. मित्रांनो जे खत कोरडे झाले आहे. ते त्यात गांडूळांची अंडी कशी जिवंत राहतील किंवा त्यातील जे पोषण द्रवे असतात ही हवेत विरून जातात. त्यामुळे गांडूळखत हे नेहमी निमओले, ताजे असावे. म्हणजे त्यातील अंडी ही जिवंत राहतात. तसेच त्यातील घटक पाण्यात विरघळून ते झाडांना मिळतात.

शेणखत हे गांडूळांचे उत्तम अन्न आहे. एकतर ते मऊसूत व कुजलेले असल्यामुळे ते पचवू शकतात. त्यांचे ते आवडते अन्न असते.

बागेत शेणखत टाकल्यामुळे बागेत गांडुळांची संख्या वाढते. त्यांचा आकारसुध्दा वाढतो. तसेच झाडांच्या फळांचा आकार वाढतो.

त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते. आपल्याला फक्त झाडाना पोषण देवून चालत नाही. मातीतील जे काही सुक्ष्म जिवाणू, गांडूळे आहेत त्यांनाही पोषक ठरतील असे अन्न द्रवे (खतं) देणं गरजेचे असते.

वर्मी कंपोस्टः वर्मी कंपोस्ट व वर्मी कल्चर व गांडूळखत हे वेगवेगळे आहे. वर्मी कंपोस्ट म्हणजे नैसर्गिक कचर्याचे खत बनवतांना आपण जर गांडूळाचा वापर केला असेल तर वर्मी + कंपोस्ट बनते. तयार कंपोस्ट खत हे गांडूळांचे खाद्य नाही. कारण कंपोस्ट म्हणजे पूर्णपणे कूजलेला पालापाचोळा होय. त्यामुळे त्याचा वापर केला तरी त्यात गांडूळे उत्तम प्रकारे वाढू शकत नाही.

वर्मी कल्चर म्हणजे एकाद्या खताच्या प्रकल्पात आपल्याला गांडूळं प्रविष्ट करावयाचे असल्यास त्यास वर्मीकल्चर असे म्हणतात.

गांडूळखत हे वर सांगतीलेच आहे.  तेव्हा. आपल्या कुडींत वाफ्यात कशा पध्दतीने गांडूळे तयार होतील, ते वाढीस लागतील अशी कृती करा.

खतातील प्रकार ओळखायला शिका. झाडांना कोणत्या काळात काय गरजेचे आहे त्यानुसार खतांचा वापर करा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

पावसाळ्यात बागेला खत द्यावे की नाही व कोणती द्यावीत.

खरं तर ही दोनही कारणांना वैज्ञानिक मूळाधार नाही. कारण ही वर वर विचार करता ती सहज मनात येणारी कारणे आहेत. खरं तर पावसाळ्यातही खतं देण्याची गरज असते. यात दोन प्रकार येतात.


पावसाळ्यात बागेला खतं द्यावीत की नाही या बाबत बरेच लोकांच्या मनात व्दिधा मनस्थिती असते. याची कारणे म्हणजे पावसाळ्यात सर्वत्रच जीवसृष्टी बहरते. त्याला मिळणारे नैसर्गिक पाणी व वातावरण तयार झाल्यामुळे आपसुकच बहरतात मग कशाला द्या खतं पाणी असा एक विचार मनात असतो. तर दुसरे कारण म्हणजे दिलेली खते वाहूनच जाणार आहेत मग कशाला द्यावीत खतं. असा एका दुसरा विचार असतो. (पुढे वाचा)

खरं तर ही दोनही कारणांना वैज्ञानिक मूळाधार नाही. कारण ही वर वर विचार करता ती सहज मनात येणारी कारणे आहेत. खरं तर पावसाळ्यातही खतं देण्याची गरज असते. यात दोन प्रकार येतात.

एक कुंड्या किंवा वाफ्यामधील बाग व दुसरे म्हणजे जमीनीवरील बाग होय. कुंड्या किंवा वाफ्यामधे झाडांना एक ठराविक अवकाश असतो. त्यांना गरज असली तरी मुळं कुंडी बाहेर जावून अन्न शोधू शकत नाही. तसेच पावसामुळे जी काही त्या कुंडीत पोषण द्रवे असतात ति वाहून जाण्याची शक्यताच अधिक असते. अशा वेळेस त्यांना खतं पाणी देणे गरजेचे असते. तरच दिलेल्या खतांची मात्रा बिनचूक लागू पडते. कारण या काळात नैसर्गिक पाण्यामुळे कुंडीतील मातीचा कण न कण भिजलेला असतो. त्यामुळे खतं हे सर्वदूर पोहचायला मदत तर होतेच तसेच मातीत नैसर्गिक जिवाणूची निर्मिती होत असते. त्यांना पोषक म्हणून खतं देणे म्हणजे त्या सुक्ष्म जिवांना अन्न पूरवणे होय. जे मृत पावल्यानंतर त्यांचे खत झाडांना मिळणार आहे.

तसेच या काळात वातावरण अनुकूल असल्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. अशा वेळेस त्यांना अन्न संग्रहीत करण्यासाठी नवीन खतांची गरज लागते. खतंच दिली नाहीतर ते संचयीत अन्न वापरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कुंडीतील झाडांना पावसाळ्यातही खतं देणे फार गरजेचे आहे. (पुढे वाचा)

तसेच जमीनीवरील झाडांना तर पावसाळ्यात खतं पाणी देणे फार गरजेचे असते. कारण एक तर खोलवर झाडांभोवतालची जमीन ही भिजलेली असते. त्यामुळे दिलेली खंत ही खोलवर म्हणजे मुळांपर्यंत सर्वदूर पोहचतात. मातीतील गांडूळांना नैसर्गिक खतांची (शेणखत, निंमपेंड) गरज असते. त्यांचे पोषण उत्तम झाले तरच ते कार्यरत राहतात. तसेच त्यांची विष्टा ही म्हणजे गांडूळ खत लागू पडते. ताजे गांडूळखत हे सर्व खतांमधे उत्तम ठरते. कारण त्यातील पोषण द्रव्यांचे अंश पुन्हा मुळापर्यंत पावसाच्या पाण्यामुळे पोहचण्यास मदत होते. (पुढे वाचा)

आता या काळात कोणती खते द्यावीत असा विचार आपल्या मनात येत असतात.

पावसाळ्यात द्राव्य खतं व विद्राव्य खतं दोन्हीही द्यावीत. कारण द्राव्य खते ही टॉनिक सारखी काम करतात. ते लगेच लागू पडतात. कुंड्या मधे द्राव्य खत देतांना पावसाची उघडीप असणे फार गरजेचे आहे. संततधार पाऊस असल्यास खतं देणे टाळावे. तो पैशाचा अपव्यय ठरेन.  मात्र जमीनीवर असलेल्या झाडांना खतांत केलेली गुंतवणूक ही फायदेशीरच ठरते. कारण पाणी खाली खोल मुरत असते. येथे मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ति म्हणजे आपल्या बागेतील पाणी वाहून जात नाही ना याची खबरदारी घ्यायला हवी. बागेत पडणारे पावसाचे पाणी हे बागेतच मुरवायला शिका. कारण आपण देत असलेले नळाचे पाणी हे सहसा फिल्टर होऊन येते. त्यातील नैसर्गिक घटकांवर प्रक्रिया झाल्यामुळे झाडांना पोषक अशी द्रवे नष्ट झालेली असतात. बोअरवेलचे पाणी देत असाल तर उत्तमच आहे. (पुढे वाचा)

लेंडी खत, शेणखत (उकीरड्यावरचे नको ते अर्धे कच्चे असते), निंमपेंड ही उत्तम ठरते. कारण ही खतं गांडूळांना फार आवडतात. तसेच ते पावसाच्या पाण्यात हळू हळू झिरपतात. त्यामुळे या खतांचा वापर आवश्यक करावा.

द्राव्य खतांमधे जिवामृत, गोमुत्र पाणी, ह्यूमिक जलचा अवश्यक वापर करावा. त्यांच्या वापरामुळे झाडांना ताबडतोब ऊर्जा प्रदान होते. एक गोष्ट लक्षात घ्या. पावसाळ्यात प्रत्येक झाडांचा पर्णसंभार वाढतो. जेवढा पर्णसंभार वाढणार आहे तेवढे दिलेल्या खतांचे अन्नात रूंपातरीत होऊन खोडात संग्रहीत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचे फुल, फळांच्या रूपात परतावा मिळणार आहे. तेव्हां पावसाळ्यातही द्राव्य व विद्राव्य खतांचा वापर आवश्यक करावा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या उत्पादनाच्या सविस्तर माहितीसाठी www.gacchivarchibaug.in हे संकेतस्थळ अभ्यासावे.

 उत्पदनांचे मुळ विक्री किमत व आताची कमी केलेली रक्कम यांची यादी खालील प्रमाणे

(सदर उत्पादनातील काही उत्पादने ही डिजिटल स्वरूपात आहेत. तर पुस्तके, ग्रो बॅग्जस, बियाणे ही  ही  बाय पोस्ट ने पाठवली जातील. बाकीची उत्पादने ही आपल्याला गच्चीवरची बाग एक्सटेंशन येथून आपल्याला घेवून जावे लागतील, कारण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आम्हाला आमची उत्पादने १५ मे पर्यंत घरपोहोच पोहचवता येणार नाहीत)

  • Bishcom ( Potting Mix) 15 Kg –  Offer Price 10 Kg
  • गच्चीवरची बाग छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
  • तुम्हाला माहित आहे का ? छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
  • डॉ. बगीचा (पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
  • तुम्हाला माहित आहे का ? ( पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
  • जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल, फ्रुट इंजाईम 21 रू. प्रति लिटर – Offer Price 11/- प्रति लिटर.
  • दशपर्णी 25 रू. लिटर Offer Price 15 रू. लिटर.
  • ग्रो बॅग्जस 16/- प्रति नग
  • भाजीपाला बियाणे 11 रू.
  • निमपेंड 51 रू किलो.
  • तंबाखू पावडर 51 रू. किलो.
  • लाल माती सिमेंट गोणी भरून 120 रू. Offer Price 100/-

टीपः वरील साहित्य आपल्याला हवे असल्यास पण आता घेवून जाणे शक्य नसल्यास तर तुम्ही साहित्याची यादी प्रमाणे आगाऊ पेमेंट करता येईल. त्याची तुम्हाला पावतीपण देण्यात येईल. तुमच्या सवडीने ते केव्हांही घेवून जाता येईल.

घरपोहोच पोहचवणे शक्य झाल्यास पूर्वीचीच किंमत + डिलेव्हरी चार्जेस आकारले जातील

  • Online स्वरूपात तुमच्या कुंटुबासाठी गच्चीवरची बाग ही कार्यशाळा आयोजीत करता येईल. त्याची 2500/- ऐवजी 1500 रू. फी असेन. (एक तास)

वरील उत्पादने नाशिक अथवा नाशिक बाहेरील व्यक्तिनां व्यवसायीक स्वरूपात विक्रि करावयास दयावयाची आहेत. त्यांनी कृपया संपर्क साधावा. इच्छुकांना केवळ वस्तूची विक्री केली तरी चालणार आहेत. वस्तूच्या वापरा विषयी अथवा ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्याकडून सेंट्रल सपोर्ट केला जाईल.

आमच्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक आव्हानांसाठी व तुमच्या सकारात्मक प्रतिसादासाठी वाचा

पुढील लेख वाचा

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644 / 8087475242

पत्ते पिले क्यूं पडते है?

पेड पौधे जब सुकने, मरने के स्थितीमें हो उस वक्त पत्ते पिले पडते है। चिंतीत होना स्वाभाविक है। लेकीन सही कारण का अनुमान लगा नही लेते तब तक चिंतीत होना व्यर्थ है।


tomato-yellow-leaves-1200-630-FB-03312019-min

WHY GREEN LEAVES TURN IN YELLOWISH

बारिश के मोसम में पेड पौधे के पत्ते पिले पडते है। बागप्रेमी अक्सर पत्तों के पिला पडने से चिंतीत होते है। खासकर पेड पौधे जब सुकने, मरने के स्थितीमें हो उस वक्त पत्ते पिले पडते है। चिंतीत होना स्वाभाविक है। लेकीन सही कारण का अनुमान लगा नही लेते तब तक चिंतीत होना व्यर्थ है। पत्ते पिला पडने के अनेक कारण है। उसके क्या क्या कारण होते है। उसे प्राथमिकता के साथ अगर आप निष्कर्ष करेगें तो उसका पता चल जाता है।

घोंघा का नियंत्रण कैसे करे

अगर बारिश के मोसम के बाद पत्ते पिल्ले पड रहे है तो समझो उनको खाद की जरूरी है। मिट्टी के उपजावू तत्वों में असंतुलन आ गया है। अक्सर बारिश के वजह से मिट्टी के सुक्ष्म तत्व बह जाते है। उनको खाद के रूप में या टॉनिक के रूप में पर्यांप्त मात्रा में खाद देना जरूरी है। तो तरूंत उचीत मात्रा में (एक चौरस फूट के लिए अधा या पाव किलो गोबर खाद डालना जरूरी है। अगर आपके पास गोबरखाद, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट है तो उसको एक साथ मिला ले या एक सिमीत कालावधी के बाद अलग अलग ही दे सकते है। ) बारिश में अक्सर द्रव्य liquid खाद देना जरूरी है क्यूं की जमीन निचे तक पानी से गिली रहती है। उसके साथ द्राव्य खादों की मात्रा सर्वदूर पहूंच जाती है।

खाद के प्रकार और उनके उपयोग

ऑक्टोबर हिट में तो पत्ते का पिला पडना आम बात है। ईस मोसम में उनको कडी धूप या तापमान से बचाना चाहिए। इसके लिए जालीदार हरा कपडा आता है। ५० प्रतिशत धूप निचे आने वाले जालीदार कपडो का चयन करे या खाद के रूप में ह्यूमिक जल का ईस्तेमाल करे ईससे ऑक्टोबर हिट से बगीचा का रक्षण भी होगा और उत्पादन भी बढेगा। ह्यूमिक जल के ईस्तेमाल के बाद आपके जालीदार हरा कपडा लगाने की जरूरत नही ।

पत्तो का पिला पडना ईसके और भी कही कारण होते है। अगर पत्ते जड से पिले पड रहे है तो समझो वो अभि परिपक्क हो गये है। उनको निकालकर मिट्टी में दबा दे। या उसको कैची से छोटे छोटे तुकडे करके उसको भी मिट्टी में मिला दे। उससे इसका खाद बन जाएगा। खाद का अभाव दूर हो जाएगा।

दो मोसम के बिच में पौधो की पाचक व्यवस्था बदलती रहती है। वो मोसम नुसार खुद में बदलाव लाते है। कारण एक, ज्यादा बारिश में या दुसरा थंडी के मोसम में परावर्तित होने के मध्यकाल में भी पत्ते पिले पडते है। झडते है। जैसा थंडी के मोसम के बाद कडी धूप सहने के लिए पेड पौधो को पत्तों का नया बहार आता है। यह स्वाभाविक है।

घमलों को कैसे भरे

पेड पौधों को पाणी की मात्रा कम होने कारण भी पत्ते पिले पडते है। आप पाणी के वारंवारिता बढा दिजिए। या ज्यादा पाणी देने के कारण भी पिले पडते है। ज्यादा पानी देने से पत्ते पिले पड रहे है तो जड सडने की संभावना होती है। ऐसे स्थिती में पौधा मर जाता है।

बारिश का पाणी treated नहीं होता. वह पाणी पौधे सह लेते है लेकीन घमले अगर पाणी ठिक तरह drain नहीं हो रहा, ठहर जाता है तो पौधा जड के सडने के कारण भी पत्ते पिले होते है।

उपर बताएं कारणो में कोई कारण या दर्शक हो तो तुरंत उपाय किजिए। अनाश्यक चिंता करने की जरूरत नही। पेड पौधे को जड को किडा लगेने से भी पत्ते पिले पडते है। ऐसे स्थिती में आपको निमखली का समय समय में ईस्तेमाल करना जरूरी है।

खाद की विविधता को और कौनसा खाद किस समय देने के लिए ये लेख आवश्य पढे। Garden Care Basket

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

NIM cake/ Nimpend

हे झाडांना पुरक असते. दर आठवडा-पंधरा दिवसाला चमच्या प्रमाणे दिल्यास झाडे ही उत्पादनशील होतात. मुळ कुज रोगापासून झाडांचा बचाव होतो.


निमपेंड हे नैसर्गिक खत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी प्रसाद म्हणून खडी साखरेबरोबर खाल्ला जाणारा कडूनिंबाचे झाड म्हणजे निम होय. या झाडाला येणारी फळे वाळली की त्याचे तेल काढले जाते. व त्याचा उरलेला चोथा म्हणजे पेंड होय. निमतेलाचा वापर नैसर्गिक पध्दतीने कीड नियंत्रणासाठी शेतीत केला जातो. तसेच निमपेंडीचा (निमखली) उपयोग केला जातो. बाजारात वेगवेगळ्या प्रतीच्या निमपेंडी मिळतात. काही बिस्कीट स्वरूपात तर काही पावडर स्वरूपात. पावडर स्वरूपात वापरलेली उत्तम म्हणजे तिचा चुरा करण्यात श्रम वाया जात नाही. शिवाय ती माती व पाण्याबरोबर सहज मिसळते. निमपें काही काळ वातावरणाशी संयोग झाल्यास तिला सफेद रंगाचा (बुरा) फंगस लागते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उलट तिचा लवकर परिणाम होतो. मातीत कमी वेळात एकरूप होते. तर निमपेंड ही तपकीरी तेलकट रंगाची असते. जेवढी तेलकट तेवढी ती लवकर सफेद होते. त्यास कडवट गंध असतो.

निमपेंड ही भूरभूरल्यासारखी भाजीपालावर टाकावी. एका चौरस फुटाच्या कुंडीला हाताच्य चार बोटावर घेता येईल एवढीच टाकावी. मोठ्या फळ झाडांना जिवामृत वापरत असल्यास निमपेंड आवश्यक टाकावी.

निमपेंडीचे फायदे…. निमपेंड कडवट असल्यामुळे इतर शत्रू किटकांना ती मारक ठरते. कडवट गंधामुळे कीड पळून जाते. तर गांडूळांना ते पुरक ठरते. निमपेंड मातीत टाकल्यामुळे मातीचा पोत सुधारतो. तसेच फळांचा आकार वाढतो. फळे चविष्ठ होतात. नारळ व आंब्याच्या झाडांसाठी नेहमी वापरावी. निमपेंडीमधे जे काही दहा बारा प्रकारेचे नैसर्गिक रसायने असतात. त्यांचा उपयोग झाड निरोगी राहण्यासाठी उपयोगी होतो. तसेच हुमणी अळी होऊ नये म्हणून तिच्या प्रतिबंधासाठी निमपेंडीचा हमखास वापर करावा.

बाजारात निमखत व निमपेंड हे दोन वेगवेगळे प्रकार मिळतात. निमखत हे खूपच स्वस्त असते. तेच निमपेंड म्हणून विक्री केले जाते. त्यात माती, रासायनिक खते मिक्स केलेली असतात. पण दर्जेदार निमपेंड ही तेलकट दिसते. तिचे प्रमाण हे कमी वापरले तरी झाडांना त्याचा चांगला परिणाम मिळतो. चांगली निमपेंड ही ६० रू. किलो मिळते तर ऑनलाईन मागवल्यास ती १५० ते १८० रू. किलो मिळते.

निमपेंडमधे खालील घटक असतात.

20200817_103106 (1)
Nim cake Details

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

%d bloggers like this: