गच्चीवरची बाग हा पर्यावरणपुरक व्यवसाय जाने २०२२ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या दहावर्षात आम्ही गारबेज टू गार्डन ही संकल्पना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला व त्याला पर्यावरणीय संवेदनशील असणार्या मंडळीनी भरभरून प्रतिसाद दिला. या दहा वर्षात नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक मराठी व हिंदी बंधू व भगीनीपर्यंत पोहचता आले. नुसत्या नाशिकरापर्यंतच हा विषय पोहचला नाहीतर त्यातून पाच हजार लोकांनी तो अंगीकारला आहे. त्यातून जवळपास दीड हजार मंडळी कचरा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

जैविक अर्थात कुजणारा नैसर्गिक कचरा हा बाग फुलवतांना तर वापरला जातोच पण त्याचे खत, कंपोस्टपण करणे हे गरजेचे आहे. कारण त्यातून झाडें, बांग यांच्यासाठी वरखताची गरज भागून जाते.

मुळातच कंपोस्टींग ही पांरपरिक पध्दत आहे. व फक्त कंपोस्टींग केल्यानेच कचरा व्यवस्थापन होईल असे नाही. ते गरजेचे आहेच. पण कचरा व्यवस्थापनासाठी विविध मार्ग उपलब्ध असल्यास त्यात लोकसहभाग वाढतो. हे आमच्या आजवरच्या कामातून लक्षात आले आहे.

हे विविध मार्ग कोणते…

  • कुजणार्या, नैसर्गिक कचर्याचे उपलब्ध साधनांत कंपोस्टींग करणे.
  • नैसर्गिक कचरा वाळवून तो कुंड्या व वाफे भरण्यासाठी करणे
  • वाळलेल्या कचर्याचे परसबाग तयार करण्यासाठी वापर करणे
  • ओल्या कचर्याचा डिरेक्ट फिडींग म्हणून कुंड्याना, झाडांना देणे
  • वाळलेल्या कचर्याचे बिशकॉम बनवणे. ( पालापाचोळ्याचा चुरा तयार करणे)

नैसर्गिक कचरा हा अनेक प्रकारचा असतो. त्यात जेवढे प्रकार तेवढे त्याचे परिमाण, त्याची गुणवत्ता, त्यांचे विरजनाचे आयुष्य, त्यांची कंपोस्टीग व वापरण्याच्या पध्दती या वेगवेगळ्या असतात. उठ सूठ त्याच खत बनवणं म्हणजे फक्त हरबर्याच्या डाळीचे भज्या तळण्यासारखं आहे. खरंतर हरबरा डाळीचे अनेक पदार्थ तयार होतात. तसेच नैसर्गिक कचर्याचे सुध्दा अनेक पध्दतीने उपयोग करता येतात. हे अजून बर्यांच जणांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

अशा कचर्याचा विविधतेने वापर करतांना त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज लागते व ति आम्ही गच्चीवरची बाग व्दारे परिपूर्ण करतो. एकतर कचरा म्हटले की त्या बद्दलचा तिटकारा, भिती वाटते. कारण एकतर ते घरा जवळ ठेवा. काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर काय करायचं ही भिती प्रचंड असते. त्यावर त्यांना मार्गदर्शनाची गरज लागते. असे झालेले खत हे वरखत म्हणून कुंड्याना वरचेवर देणे गरजेचे आहे. कुंड्या भरण्यासाठी मातीत ते मिसळवणे गरजेचे असते.

बरेचदा मंडळी झाडांना खत हवे म्हणून एकाच प्रकारचे खत वापरतात. ते विकत आणतात. पण होम कंपोस्टींग करणेही गरजेचे आहे. व ते सहज शक्य आहे. उदाः बदाम हे आरोग्यासाठी चांगले आहेत व ते रोज खाणे परवडले तरी आपण रोज खातो का… नाही ना… मग शेणखत हे चांगले आहे म्हणून केवळ तेच बागेला वापरले तर चालेल का असे सांगून झाडांनाही विविध खतांची गरज असते हे पटवून देतो. व त्याचा परिणाम दिसू लागला की लोक होम कंपोस्टींगला सुरवात करतात.

तसेच हरबरा डाळ ही सारख्याच वजनाची, सारखेच पाणी टाकून आपण खुल्या पातेल्यात, मातीच्या भांडयात व कुकुर मधे शिजवली तर त्यांची चव सारखीच असेन का, त्यातील सत्व हे सारख्याच प्रमाणात उपलब्ध होतील का… तर नाही ना…

मग होम कंपोस्टींग करतांना ही साधनात सुध्दा विविधता असणे गरजेचे आहे. उदाः कचरा वाळवणे, त्याचे प्लॅंन्ट फिडींग करणे तसेच होम कंपोस्टींह हे  प्लास्टिक ड्रम, मातीचा माठ, विटांचा वाफा अशा साधनांची विविधता लागते.

एकाच प्रकारच्या साधनात एकाच प्रकारचे खत सातत्याने करत राहिलो तर एकाच प्रकारचे जिवाणू मातीत प्रविष्ट होत राहतात. परिणामी मातीचा सामू स्थिर होतो. व त्यातून अपेक्षीत परिणाम दिसून येत नाही. म्हणून साधन हे बदलत राहणे गरजेचे आहे.

कंपोस्टींग करतांना अनंत अडचणी येत असतात. त्यात वैज्ञानिक पध्दतीचा वापर करणे फार गरजेचे आहे. फक्त कानो कानी आलेली माहिती गोळा करून कंपोस्टींग करणे म्हणजे अंधश्र्ध्दा बाळगण्यासारखे आहे ज्यातून वेळेचा, पैशाचा अपव्यय तर आहेच शिवाय मनस्ताप करून घेण्यासारखं आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कल्चर, जिवाणू लागतात. अर्थात ते अगदी घरातल्या स्वयंपाक घरातही उपलब्ध असतात. पण या सार्यांना मर्यांदा असते. तर बाजारात मिळणारे अनेक कंपोस्टींग कल्चर आहेत. पण ते फत्त उपलब्ध असते. अडचणी आल्याकी त्यावर कस्टमर सर्व्हिस नसते वा  म्यूनुअल नसते. या सार्यांचा विचार करता तुम्हाला कंपोस्टींग गुरू असणे गरजेचे आहे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.